अवकाळी पावसाने २६ हजार हेक्टर बाधित

By Admin | Updated: December 28, 2014 00:54 IST2014-12-28T00:53:59+5:302014-12-28T00:54:11+5:30

कृषी खात्याचा अहवाल : ६०० जनावरे मृत्यूमुखी

Incessant rains disrupted 26,000 hectares | अवकाळी पावसाने २६ हजार हेक्टर बाधित

अवकाळी पावसाने २६ हजार हेक्टर बाधित

 नाशिक : डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्'ात सिन्नर वगळता सर्व दूर झालेल्या अवकाळी पावसाने २६ हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकाचे नुकसान झाल्याचा अहवाल कृषी विभागाने शासनाला सादर केला असून, शासनाने ठरवून दिलेल्या मदतीच्या निकषाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. या अवकाळी पावसाने घरांची पडझड व शेकडो जनावरे दगावण्याच्याही घटना घडल्याचे पंचनाम्याअंती स्पष्ट झाले आहे. कृषी, महसूल खात्याने संयुक्तरीत्या प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन केलेल्या पंचनाम्यानुसार २६५ गावांमधील ४४ हजार ८८ शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान होऊन १५ हजार १२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यात सर्वाधिक नुकसान दिंडोरी व निफाड तालुक्यांतील द्राक्ष पिकांचे झाले असून, नांदगाव, इगतपुरी वगळता जिल्'ात ७५४० हेक्टर क्षेत्रातील द्राक्षबागा उद््ध्वस्त झाल्या आहेत. त्या खालोखाल कांदा पिकाचे ५२५७ हेक्टर क्षेत्र नष्ट झाले. या पावसाने १२०८ हेक्टरवरील डाळींबबागाला फटका बसला आहे. गव्हाचे ४१२ हेक्टर, भाताचे ३२५, भाजीपाला ३९, कापूस ७६ व इतर पिकांचे २४ हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झाले आहे.

Web Title: Incessant rains disrupted 26,000 hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.