शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

ठाकरेंच्या सेनेत सवंगड्यांनाच बनविले घरगडी; मुख्यमंत्र्यांचा घणाघात, नाशिक येथे पदाधिकारी मेळावा

By suyog.joshi | Updated: May 8, 2024 20:02 IST

शिवसेना-भाजप ही नैसर्गिक युती होती, परंतु सत्तेच्या मोहापायी ती तुटली, असे शिंदे म्हणाले.

नाशिक : ‘राजा का बेटा राजा नही होता, जो काम करेगा वो राजा बनेगा’ असेच धोरण आमच्या पक्षात असून जो काम करेल तोच पदाधिकारी, कार्यकर्ता मोठा होतो, आमच्याकडे कोणीही मालक नाही असे सांगत उलट उध्दव सेनेत सवंगड्यांनाच घरगडी बनविले जात असल्याचा आरोप करत त्यांच्या या वागणुकीला कंटाळूनच अनेक नेते पक्षाबाहेर पडल्याचा घणाघाती प्रहार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. नाशिक येथे बुधवारी (दि.८)आयोजित शिवसेना पदाधिकारी-कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री बाेलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री दादा भुसे, उपनेते अजय बोरस्ते, आमदार सुहास कांदे, उपनेते विजय करंजकर, उमेदवार हेमंत गोडसे आदी उपस्थित होते. 

यावेळी शिंदे म्हणाले, उद्वव ठाकरे यांच्या पक्षपाती धोरणाला कंटाळूनच छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे, राज ठाकरे व सर्वात शेवटी मी खासदार, आमदारांना घेऊन बाहेर पडलो. आम्हाला एवढा टोकाचा निर्णय का घ्यावा लागतोय याचाही विचार व्हायला हवा. शिवसेना-भाजप ही नैसर्गिक युती होती, परंतु सत्तेच्या मोहापायी ती तुटली. बाळासाहेब ठाकरे यांच्याच हाती रिमोट कंट्रोल होता, ते किंग मेकर होते. त्यांच्यापुढे मुख्यमंत्रीपद हे नगण्य होते. मात्र उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदासाठी सुप्त इच्छा होती. केवळ फोटोगाफी करून, फेसबूक लाईव्ह करून व घरात बसून सरकार चालवता येत नाही असाही टोलाही मुख्यमंत्र्यांनी ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. आज बाळासाहेब ठाकरे असते तर काँग्रेसला दूर ठेवले असते, उलट आता उद्धव ठाकरे यांनी त्यांना जवळ केले आहे. त्यामुळे शिवसेनेचे खच्चीकरण झाले असून एका खूर्चीमुळे शिवसेना अडचणीत आली आहे.

राऊतांना राज्यसभेवर पाठवल्याचा पश्चातापराज्यसभेच्या निवडणुकीत माझा अपमान केला. त्याचवेळी इतर सहकारी संजय राऊत यांच्या विरोधात होते. मात्र आम्ही त्यांना मत देऊन राज्यसभेवर पाठवले. त्याचा पश्चाताप आता होत असून पुन्हा संधी मिळेलच असा इशारा देत राऊत सरपंचही निवडून येऊ शकत नाही अशी जोरदार टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. ठाकरेंवर हल्लाबोलपंचवीस राज्यातले लोक माझ्यासोबत असून राजस्थानातील चार अपक्ष आमदारही माझ्या सोबत आहे.नुसतं गद्दार व खोके म्हणून चालत नाही. उद्या तुम्ही कोर्टाला व मतदारांना गद्दार म्हणायला कमी करणार नाही,अशी टीकाही त्यांनी ठाकरेंवर केली. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीतही खंजीर खुपसला, असा आरोप शिंदे यांनी केला.

टॅग्स :NashikनाशिकEknath Shindeएकनाथ शिंदेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४