शहरं
Join us  
Trending Stories
1
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
2
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
3
स्मृती मंधानाचा ट्रॉफी सोबतचा फोटो, हातावर टॅटू..., होणारा नवरा पलाश मुच्छलची पोस्ट व्हायरल
4
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा
5
VIDEO: "दीदी, हा कप तुमच्यासाठी....", हरमनप्रीतचा माजी दिग्गजांसोबत मैदानात जल्लोष
6
व्होडाफोन आयडियाला पुन्हा अच्छे दिन येणार? अमेरिकेन कंपनी गुंतवणूक करण्याच्या तयारीत; पण एका अटीवर
7
एका पैशाचा खर्च नाही, संकटे-समस्या संपतील; २१ दिवस १ मंत्राचा जप करा, अशक्यही शक्य होईल!
8
३० कोटींच्या उधळपट्टीचा घोटाळा सिद्ध, मुख्यमंत्र्यांचीही परवानगी नाही; रोहित पवार म्हणाले, 'हिवाळी अधिवेशनात सरकारची धिंड काढणार'
9
पशुपतिनाथाचे अवतार आणि रक्षेतून प्रगट झाले असे गोरक्षनाथ यांची जयंती; वाचा त्यांचे कार्य!
10
'हेरा फेरी'मधील बाबूरावच्या भूमिकेला कंटाळले परेश रावल, म्हणाले - "५०० कोटींची..."
11
वैकुंठ चतुर्दशी २०२५: श्रीविष्णू-महादेवांचे वरदान, पुण्य लाभेल; ‘असे’ करा व्रत, शुभच घडेल!
12
नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
13
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
14
आणखी एक मोठा बस अपघात, भरधाव ट्रकने बसला समोरून दिली धडक, २० जणांचा मृत्यू
15
मोठा निष्काळजीपणा! सरकारी रुग्णवाहिकेचा टायर पंक्चर, १ तास मिळाली नाही स्टेपनी; रुग्णाचा तडफडून मृत्यू
16
मुंबईकर अमोल मुजुमदारची शांतीत क्रांती! भारतीय महिला संघाला असं बनवलं वर्ल्ड चॅम्पियन  
17
“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
18
अखेर 'बिग बॉस'मधून प्रणित मोरेची Exit! सलमान खानलाही बसला धक्का, म्हणाला- "तू एलिमिनेट झाला नाहीस, पण..."
19
याच महिन्यात लाँच होणार ई-आधार ॲप; पाहा घरबसल्या काय-काय अपडेट करता येणार?
20
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?

ठाकरेंच्या सेनेत सवंगड्यांनाच बनविले घरगडी; मुख्यमंत्र्यांचा घणाघात, नाशिक येथे पदाधिकारी मेळावा

By suyog.joshi | Updated: May 8, 2024 20:02 IST

शिवसेना-भाजप ही नैसर्गिक युती होती, परंतु सत्तेच्या मोहापायी ती तुटली, असे शिंदे म्हणाले.

नाशिक : ‘राजा का बेटा राजा नही होता, जो काम करेगा वो राजा बनेगा’ असेच धोरण आमच्या पक्षात असून जो काम करेल तोच पदाधिकारी, कार्यकर्ता मोठा होतो, आमच्याकडे कोणीही मालक नाही असे सांगत उलट उध्दव सेनेत सवंगड्यांनाच घरगडी बनविले जात असल्याचा आरोप करत त्यांच्या या वागणुकीला कंटाळूनच अनेक नेते पक्षाबाहेर पडल्याचा घणाघाती प्रहार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. नाशिक येथे बुधवारी (दि.८)आयोजित शिवसेना पदाधिकारी-कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री बाेलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री दादा भुसे, उपनेते अजय बोरस्ते, आमदार सुहास कांदे, उपनेते विजय करंजकर, उमेदवार हेमंत गोडसे आदी उपस्थित होते. 

यावेळी शिंदे म्हणाले, उद्वव ठाकरे यांच्या पक्षपाती धोरणाला कंटाळूनच छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे, राज ठाकरे व सर्वात शेवटी मी खासदार, आमदारांना घेऊन बाहेर पडलो. आम्हाला एवढा टोकाचा निर्णय का घ्यावा लागतोय याचाही विचार व्हायला हवा. शिवसेना-भाजप ही नैसर्गिक युती होती, परंतु सत्तेच्या मोहापायी ती तुटली. बाळासाहेब ठाकरे यांच्याच हाती रिमोट कंट्रोल होता, ते किंग मेकर होते. त्यांच्यापुढे मुख्यमंत्रीपद हे नगण्य होते. मात्र उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदासाठी सुप्त इच्छा होती. केवळ फोटोगाफी करून, फेसबूक लाईव्ह करून व घरात बसून सरकार चालवता येत नाही असाही टोलाही मुख्यमंत्र्यांनी ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. आज बाळासाहेब ठाकरे असते तर काँग्रेसला दूर ठेवले असते, उलट आता उद्धव ठाकरे यांनी त्यांना जवळ केले आहे. त्यामुळे शिवसेनेचे खच्चीकरण झाले असून एका खूर्चीमुळे शिवसेना अडचणीत आली आहे.

राऊतांना राज्यसभेवर पाठवल्याचा पश्चातापराज्यसभेच्या निवडणुकीत माझा अपमान केला. त्याचवेळी इतर सहकारी संजय राऊत यांच्या विरोधात होते. मात्र आम्ही त्यांना मत देऊन राज्यसभेवर पाठवले. त्याचा पश्चाताप आता होत असून पुन्हा संधी मिळेलच असा इशारा देत राऊत सरपंचही निवडून येऊ शकत नाही अशी जोरदार टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. ठाकरेंवर हल्लाबोलपंचवीस राज्यातले लोक माझ्यासोबत असून राजस्थानातील चार अपक्ष आमदारही माझ्या सोबत आहे.नुसतं गद्दार व खोके म्हणून चालत नाही. उद्या तुम्ही कोर्टाला व मतदारांना गद्दार म्हणायला कमी करणार नाही,अशी टीकाही त्यांनी ठाकरेंवर केली. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीतही खंजीर खुपसला, असा आरोप शिंदे यांनी केला.

टॅग्स :NashikनाशिकEknath Shindeएकनाथ शिंदेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४