शहरं
Join us  
Trending Stories
1
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
2
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
3
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
4
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
5
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
6
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
7
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
8
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
9
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
10
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
11
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
12
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
13
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
14
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
15
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
16
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
18
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
19
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
20
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं

सुरगाणा तालुक्यातील खेळाडूंच्या प्रकृतीत सुधारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 3:17 PM

सुरगाणा : अमरावतीच्या बोरगाव मंजूजवळ झालेल्या अपघातात जखमी झालेल्या नाशिक विभागातील संघ, सुरगाणा तालुक्यातील खेळाडूंच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, गुरुवारी (दि.२८) संध्याकाळी जखमींना योग्य उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले. या अपघातातून बचावलेल्या खेळाडूंनी स्पर्धेतील उपान्त्य फेरीचा सामना जिंकून अंतिम फेरी गाठली आहे.

ठळक मुद्दे अंतिम फेरीत धडक : अपघातातून बचावलेल्या खेळाडूंनी जिंकला सामना

सुरगाणा : अमरावतीच्या बोरगाव मंजूजवळ झालेल्या अपघातात जखमी झालेल्या नाशिक विभागातील संघ, सुरगाणा तालुक्यातील खेळाडूंच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, गुरुवारी (दि.२८) संध्याकाळी जखमींना योग्य उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले. या अपघातातून बचावलेल्या खेळाडूंनी स्पर्धेतील उपान्त्य फेरीचा सामना जिंकून अंतिम फेरी गाठली आहे.सुरगाणा तालुक्यातील अलंगुण येथील खा- खो चा संघ अमरावती येथे राज्य स्तरीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दोन जीपमधून जात असताना बोरगाव मंजूजवळ खेळाडूंच्या एका जीपला समोरून येणाऱ्या ट्रकने जबर धडक दिली होती. त्यामुळे झालेल्या अपघातात इयत्ता आठवीत शिकणारे विद्यार्थी कल्पेश सहारे (रा. धामणकुंड), प्रभाकर धूम (हातरु ंडी), तर शिक्षक टी.आर. गावित, एम.डी. पवार, जीप चालक सुरेश गावित (अलंगुण) हे जखमी झाले होते. अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या पाच जखमींवर उपचार करण्यात आले. सद्यस्थितीत या सर्वांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती त्यांच्यासोबत असलेले क्रीडाशिक्षक एन. एस. तायडे यांनी दिली.या अपघातात सुखरूप असलेल्या उर्वरित खेळाडूंनी स्पर्धेत उत्तम खेळ केला. दडपण असूनही या खेळाडूंनी अमरावती विरोधात असलेला पहिलाच सामना अलंगुण संघाने म्हणजे नाशिक विभागाने दोन गुणांनी विजय संपादन केला. त्यानंतर सेमी फायनलमध्ये मुंबई संघाविरु द्ध दणदणीत विजय संपादन केला असून, शुक्रवारी (दि. २९) लातूर संघाविरु द्ध अंतिम फेरीचा सामना होणार आहे. मोठा अपघात होऊनही या खेळाडूंनी अपघाताचे दडपण न ठेवता अंतिम सामन्यापर्यंत बाजी मारलीआहे.अलंगुण येथील आदर्श समता शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक व माजी आमदार जे.पी. गावित यांचे सुपुत्र हिरामण गावित यांना अपघाताचे वृत्त समजताच थेट अमरावतीमधील अकोला गाठून अपघातातील सर्वांची आपुलकीने विचारपूस केली. हिरामण गावित यांच्यासह प्राचार्य के. एल. वाघचौरे, शिक्षक एन.जी. लांडगे, रामभाऊ थोरात, बाळू गावित, एन.एस. तायडे हे त्यांच्यासोबत असून, रु ग्णालयातून पाचही जणांना सोडण्यात आल्यानंतर त्यांना घरी घेऊन निघाले होते.अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अकोला प्रकल्प अधिकारी हिवाळे तसेच जिल्हा क्र ीडा अधिकारी यांनी रु ग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.उर्वरित सर्व मुले सुखरूप असून, अमरावती येथे स्पर्धेत खेळत आहे. चिंतामण चौधरी (रा. बाफळून), मच्छिंद्र वाघमारे (रा. कुकुडमुंडा), श्याम गायकवाड (रा. कोठूला), किरण जाधव (रा. तोरडोंगरी), रोशन सहारे (धामणकुंड), उत्तम गवळी (गाळबारी), चेतन चौधरी (धुरापाडा), कौशिक चौधरी (बाफळून), श्याम गायकवाड (वांगण), नीलेश भुसारे (तोरडोंगरी) अशी त्यांची नावे आहेत.