शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

ग्राम बालविकास केंद्रांमुळे कुपोषित बालकांमध्ये सुधारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 17:51 IST

सिन्नर तालुकाभर महिन्यासाठी सरू असलेल्या ग्राम बाल विकास केंद्रांमुळे कुपोषित बालकांमध्ये समाधानकारक सुधारणा बघावयास मिळाली. केंद्रात दाखल झालेल्या २३२ अतितीव्र कुपोषित मुलांपैकी १२६ मुले मध्यम श्रेणीत गेली. ७३ मुले साधारण श्रेणीत आली आहेत. तर ८७४ मध्यम तीव्र कुपोषित मुलांपैकी ७०१ मुले ही साधारण श्रेणीत आली आहे.

उपचार घेवून देखील सुधारणा न झालेल्या कुपोषित मुलांसाठी ग्रामीण आरोग्य केंद्रांच्या स्तरावर पोषण पुर्नभरण केंद्र सुरु करावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांनी केली आहे. शिव सरस्वती फाउंडेशनच्या वतीने तालुकाभर कुपोषण निर्मूलनावर काम करत असताना तालुकाभर ग्राम बाल विकास केंद्रांना कोकाटे यांनी भेटी दिल्या. अनेक ० ते ६ वयोगटातील मुले ३ वर्ष वय झाले की इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातात. त्यामुळे त्यांना पालक हे आंगणवाडीत पाठवत नाहीत. त्यामुळे अशी मुले अतितीव्र कुपोषित किंवा मध्यम कुपोषित असून देखील पालक याबाबत अनभिज्ञ आहेत. अशा मुलांची जबाबदारी इंग्रजी माध्यमांच्या शाळांवर द्यावी. या खासगी शाळांमध्ये ग्राम बाल विकास केंद्रासारखे उपक्रम राबविण्याची गरज असल्याच्या त्या म्हणाल्या. वारंवार सूचना करून देखील उंचीच्या पट्ट्या व वजनाचे काटे नादुरूस्त आहेत. अनेक ठिकाणी अंगणवाड्या या झाडाखाली व पत्र्याच्या शेडमध्ये भरतात. ३४८ मोठ्या आंगणवाड्यांपैकी फक्त २३६ अंगणवाड्यांना इमारती आहेत. काही ठिकाणी सेविका व तर काही ठिकाणी मदतनीस यांच्या जागा रिक्त असल्याने एका व्यक्तीची फरपट होत होत आहे. तेव्हा रिक्त जागा भरणे व बचतगटांचे देयके वेळेत द्यावे, अशी मागणीही कोकाटे यांनी केली आहे. 

टॅग्स :Healthआरोग्य