पाणी सोडणे अशक्य

By Admin | Updated: December 1, 2015 23:00 IST2015-12-01T22:59:48+5:302015-12-01T23:00:42+5:30

फैसला प्राधिकरणाच्या हाती : चणकापूर, हरणबारी पाण्याची सुनावणी पूर्ण

Impossible to relieve water | पाणी सोडणे अशक्य

पाणी सोडणे अशक्य

नाशिक : चणकापूरसह चार धरणांमधून जळगाव जिल्ह्यासाठी समन्यायी पाणीवाटप कायद्यान्वये पाणी सोडण्याबाबत मंगळवारी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणासमोर जळगाव व नाशिक जिल्ह्याच्या वतीने युक्तिवाद करण्यात येऊन सुनावणी पूर्ण करण्यात आली. यावेळी नाशिक जिल्ह्यातील धरणांमधील उपलब्ध पाणी व त्याचे पिण्यासाठी करण्यात आलेले आरक्षण समसमान असल्याने पाणी सोडणे योग्य होणार नसल्याची बाजू मांडण्यात आली.
चणकापूर, हरणबारी, केळझर व पुनंद या चार धरणांमधून जळगाव जिल्ह्यासाठी गिरणा धरणात पाणी सोडण्याचा प्रस्ताव असून, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणासमोर त्याची सुनावणी सुरू आहे. जळगाव व नाशिक या जिल्ह्यांनी यासंदर्भात म्हणणे मांडण्यासाठी मंगळवारी मुंबईत त्याची सुनावणी घेण्यात आली. तत्पूर्वी गेल्या सुनावणी दरम्यान नाशिक जिल्ह्याच्या वतीने धरणातील पाण्याचे अद्याप आरक्षण जाहीर झाले नसल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर पाणी आरक्षणाची बैठक झाल्यामुळे मंगळवारच्या सुनावणीत जिल्हाधिकाऱ्यांनी पाणी आरक्षणाबाबत झालेली बैठक व करण्यात आलेले आरक्षण याची माहिती प्राधिकरणासमोर सादर केली.

Web Title: Impossible to relieve water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.