शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

पिकांवर भुरी करपा, डावणी रोगांचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 5:41 PM

पाटोदा :- मागील काही वर्षांपासून दुष्काळाशी सामना करीत जतन केलेल्या द्राक्षबागा यंदा पडलेल्या परतीच्या पावसामुळे अडचणीत सापडल्या आहेत. बागांवर भुरी,करपा, डावणी या रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्याचप्रमाणे पावसाच्या उघडिपीनंतर पडत असलेल्या गेल्या धुक्यामुळे तसेच पहाटेच्या थंडी व दवबिंदूमुळे कुज तसेच गुंडाळी होऊन घड जागेवरच विरघळत आहेत.

ठळक मुद्दे शेतकरी हवालदिल : पाटोदा मंडलातील ७०० हेक्टरवरील द्राक्षबागा धोक्यात

पाटोदा :- मागील काही वर्षांपासून दुष्काळाशी सामना करीत जतन केलेल्या द्राक्षबागा यंदा पडलेल्या परतीच्या पावसामुळे अडचणीत सापडल्या आहेत. बागांवर भुरी,करपा, डावणी या रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्याचप्रमाणे पावसाच्या उघडिपीनंतर पडत असलेल्या गेल्या धुक्यामुळे तसेच पहाटेच्या थंडी व दवबिंदूमुळे कुज तसेच गुंडाळी होऊन घड जागेवरच विरघळत आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. बागा जागविण्यासाठी शेतकरी जिवाचे रान करीत असून, महागडी औषधे फवारणी करूनही उपयोग होत नसल्याने पाटोदा मंडलातील ७०० हेक्टरवरील द्राक्षबागा धोक्यात आल्या असून, शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे.एकट्या पाटोदा कृषी मंडळात सातशे चार हेक्टर द्राक्ष बागांची शेतकऱ्यांना लागवड केली आहे.आॅक्टोबर छाटणी नंतर आलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागेवरील सुमारे ऐंशी ते नव्वद टक्के घड खराब झाले.त्यामुळे द्राक्षउत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.उर्वरित घडही धुके व दविबंदूमुळे धोक्यात आले आहे. सध्या हवामानात बदल झाल्यामुळे रोज सकाळ दुपार संध्याकाळ अशी तीन वेळ औषध फवारणी करावी लागत आहे.दिवसाकाठी एक एकर द्राक्षबागेवर सुमारे पाच हजार रु पयांची औषधे लागत आहे.कर्ज काढून बागा वाचिवण्यासाठी धडपड करूनही रोग आटोक्यात येण्याऐवजी वाढत असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे. द्राक्ष बागांसाठी शेतकºयांनी लाखो रु पयांची गुंतवणूक केली त्यासाठी शेतकरी वर्गाने,बँका,पतसंस्था तसेच खाजगी सावकारांकडून मोठया प्रमाणत कर्ज उचलले आहे.तसेच यावर्षीच्या हंगामासाठी व निर्यातक्षम द्राक्ष पिकविण्यासाठी हेक्टरी पाच ते सहा लाख रु पयांचा खर्च केला मात्र परतीच्या या अवकाळी पावसाने शेतकºयांचे हेक्टरी वीस ते बावीस लाख रु पयांचे नुकसान झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी देशोधडीला लागला आहे. परतीच्या पावसाने द्राक्ष उत्पादक शेतकºयांचे वाटोळे केले आहे बागांवर डावणी तसेच भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे दिवसाकाठी एकरी पाच ते सात हजार रु पयांचे महागडी औषधे फवारणी करावी लागत आहे ही औषध फवारणी करूनही बदलत्या हवामानामुळे रोगांचा प्रादुर्भाव कमी होन्याऐवजी वाढतच आहे त्यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.-रवींद्र शेळके, द्राक्ष उत्पादक शेतकरी ठाणगाव कोरड्या दुष्काळाचा सामना करीत द्राक्ष उत्पादन करणाº्या द्राक्ष उत्पादक शेतकº्यांना यावर्षी ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.या ओल्या दुष्काळामुळे संपूर्ण द्राक्ष बागा शोभेच्या झाल्या आहेत. तब्बल महिनाभर पावसाने धुमाकूळ घातल्याने या बागांमध्ये अद्यापही चिखल व दलदल आहे.येवला तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातीलपाटोदा,दहेगावपाटोदा,ठाणगाव,पिंपरी,धुळगाव,कानडी,विखरणी,आडगाव रेपाळ,शिरसगाव,लौकी,वळदगाव,पिंपळगावलेप, जऊळ्के,सतारे आदि भागात द्राक्ष पिकांचे मोठया प्रमाणात उत्पादन घेतले जात आहे.पाटोदा कृषी मंडळात सुमारे सातशे हेक्टर द्राक्ष बागांची शेतकरी वर्गाने लागवड केली आहे मात्र परतीच्या पावसाने या संपूर्ण द्राक्ष बागा धोक्यात आल्या आहे .त्यांच्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे .कृषी विभागाच्या वतीने द्राक्ष उत्पादक शेतकर्यांना औषध फवारणी बाबत मारगदर्शन केले जात आहे,- प्रकाश जवणे, कृषी सहाय्यक पाटोदा कृषी मंडळ.