शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

आयएमएचा मिक्सोपॅथीला विरोध - डॉ. समीर चंद्रात्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 20:58 IST

नाशिक : आयुर्वेद हे आपल्या देशातील शास्त्र असून त्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. किंबहुना आयुर्वेदात अधिकाधिक संशोधन होण्याची आवश्यकता आहे. मात्र, त्याबाबत काहीही न करता अचानकपणे आयुर्वेदाचार्यांना ६८ शस्त्रक्रीया करण्याची परवानगी देण्याचा निर्णय सेंट्रल काैन्सिल ऑफ इंडियन मेडीसीनकडून (सीसीआय) घेण्यात आला. अशा मिक्सोपॅथीला आमचा विरोध असल्यानेच आयएमएने शुक्रवारी एक दिवसाचा लाक्षणिक संपाचा निर्णय घेतला असल्याचे नाशिक आयएमएचे अध्यक्ष डाॅ. समीर चंद्रात्रे यांनी सांगितले.

ठळक मुद्देआयएमएच्या वतीने आज एक दिवसाचा लाक्षणिक संपइमर्जन्सी रुग्ण तसेच कोविड रुग्णांच्या उपचारांची सुविधा कायम

नाशिक : आयुर्वेद हे आपल्या देशातील शास्त्र असून त्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. किंबहुना आयुर्वेदात अधिकाधिक संशोधन होण्याची आवश्यकता आहे. मात्र, त्याबाबत काहीही न करता अचानकपणे आयुर्वेदाचार्यांना ६८ शस्त्रक्रीया करण्याची परवानगी देण्याचा निर्णय सेंट्रल काैन्सिल ऑफ इंडियन मेडीसीनकडून (सीसीआय) घेण्यात आला. अशा मिक्सोपॅथीला आमचा विरोध असल्यानेच आयएमएने शुक्रवारी एक दिवसाचा लाक्षणिक संपाचा निर्णय घेतला असल्याचे नाशिक आयएमएचे अध्यक्ष डाॅ. समीर चंद्रात्रे यांनी सांगितले.

या संपातही आयएमएच्या वतीने इमर्जन्सी रुग्ण तसेच कोविड रुग्णांच्या उपचारांची सुविधा कायम ठेवली जाणार आहे. मात्र, या निर्णयाला त्यांचा विरोध असल्याचे शासनाला समजावे, यासाठीच या लाक्षणिक संपाचे आयोजन करण्यात आले असल्याचेदेखील डॉ. चंद्रात्रे यांनी सांगितले. या संपाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी साधलेला हा संवाद.

प्र. आयुर्वेदाच्या पदव्युत्तर पदवीधारकांना शस्त्रक्रियेबाबतची मान्यता देण्यास आयएमएचा विरोध का ?

डॉ. चंद्रात्रे - आयुर्वेद ही स्वतंत्र प्रणाली असून त्यांच्या अभ्यासक्रमात त्यांना मॉडर्न सायन्सबाबत तितकेसे सखोल ज्ञान दिले जात नाही. मान्यता दिलेल्या शस्त्रक्रीयांसाठी त्यांचे पुरेसे प्रशिक्षणदेखील झालेले नसते. त्यामुळे अशी सरमिसळ केली जाऊ नये, इतकेच आमचे म्हणणे आहे.

प्र. आयुर्वेदासारख्या स्वदेशी पॅथीला या निर्णयामुळे चालना मिळणार असेल तर आक्षेप कशासाठी ?

डॉ. चंद्रात्रे - आयुर्वेदाला या निर्णयाने कोणताच फायदा होणार नसून उलट विदेशांमध्ये ॲलोपॅथी आणि आयुर्वेदीकच्या पदवीधारकांचे भिन्न महत्व उरणार नाही. आयुर्वेद करणाऱ्यांना पूर्णपणे शुद्ध आयुर्वेदाचे उपचार आणि शास्त्र अनुसरु द्यावे तर मॉडर्न सायन्सला त्यांचे ॲलोपॅथीचे शास्त्र कायम ठेवू द्यावे. त्यात खिचडी करण्याचा प्रयत्न केला जाऊ नये, दोघांचे स्पेशलायझेशन स्वतंत्र ठेवून त्या दोन्ही शास्त्रांना वाढण्याची संधी कायम ठेवायला हवी, असेच आमचे म्हणणे आहे.

प्र. या निर्णयाऐवजी मग सीसी्आयने काय करायला हवे होते, असे तुम्हाला वाटते ?

डॉ. चंद्रात्रे - आयुर्वेदाचा आम्ही आदरच करतो. पण त्यात अधिकाधिक संशोधन होण्याची आवश्यकता असून या मूलभूत गोष्टींमध्ये सीसीआयने लक्ष घालण्याची आवश्यकता होती. किंवा मग आयुर्वेदाला स्वतंत्र ठेवून एखादा नवीन अभ्यासक्रम विकसित करण्याची आवश्यकता होती. त्यामुळे शैक्षणिक प्रणालीचा मूळ ढाचा न बदलता सर्व पॅथींना स्वतंत्र ठेवून एकमेकांचा आदर राखून काम व्हायला हवे होते, असे मला वाटते.

टॅग्स :Nashikनाशिकdoctorडॉक्टर