शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

अध्यक्ष नसलो तरी महंत आहे ना?

By admin | Updated: August 25, 2015 23:57 IST

मौन सोडले : ग्यानदास महाराजांचा नरमाईचा पवित्रा

नाशिक : भले मी आखाडा परिषदेचा अध्यक्ष नसलो, तरी निर्वाणी अनी आखाड्याचा महंत तर आहे ना, असा सवाल करीत श्री महंत ग्यानदास यांनी आज अखेर एक पाउल मागे घेतले. कुंभमेळ्यातील शाहीस्नान हे अध्यक्षाचे नव्हे, महंतांचेच असते. अध्यक्ष तर केवळ कामे करवून घेण्यासाठी असतो, अशी पुस्तीही त्यांनी जोडल्याने त्यांचा नरमाईचा पवित्रा अधोरेखित झाला. गेल्या काही महिन्यांपासून श्री महंत ग्यानदास यांच्या अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या अध्यक्षपदावरून वाद सुरू आहेत. त्र्यंबकेश्वर येथील दहा शैव आखाड्यांनी त्यांना अध्यक्ष मानण्यास यापूर्वीच नकार दिला आहे, तर रविवारी वैष्णव पंथातील सर्वांत मोठ्या दिगंबर अनी आखाड्यानेही ग्यानदास यांचा पाठिंबा काढून घेतला. महंत ग्यानदास हे हुकूमशहाप्रमाणे वागत असून, साधू-संतांना अपमानित करीत आहेत. त्यांच्याकडून पदाची प्रतिष्ठा राखली जात नसल्याने त्यांचे अध्यक्षपद अमान्य करीत असल्याची घोषणा दिगंबर आखाड्याने केली. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपासून साधुग्राममध्ये तणावाचे वातावरण होते. दिगंबर आखाड्याकडून टीकास्र सोडले जात असताना, महंत ग्यानदास यांनी मात्र याबाबत मौन बाळगले होते. आज दुपारपर्यंत त्यांच्याशी कोणाचा संपर्क होऊ शकला नव्हता. ते त्रिवेणीधाम डाकोरधाम खालशाच्या ध्वजारोहणासाठी आले; मात्र काही मिनिटेच थांबत त्यांनी निर्वाणी आखाड्यात प्रयाण केले. अखेर सायंकाळी पत्रकारांशी वार्तालाप करीत त्यांनी काही बाबी स्पष्ट केल्या. शाहीस्नान ठरल्याप्रमाणेच होणार असून, त्यासाठी आखाड्यांचा क्रम निश्चित करण्यात आला आहे; मात्र तो पोलिसांच्या वतीने अधिकृतरीत्या जाहीर केला जाईल. सध्या चर्चेत असलेला वाद अनेक दिवसांपासून सुरू असून, त्यात नवे काहीच नाही. भावा-भावात भांडणे होतात; पण नंतर ते एकत्र येतातच. पाण्यात काठी मारल्यावर पाण्याचे दोन भाग होतात; पण ते लगेच एकत्रही येते. आम्हा साधूंचे तसेच आहे. आम्ही घरदार सोडून देव, देशकार्यासाठी आलो आहोत, एकमेकांशी भांडण्यासाठी नव्हे. समजा, मी अध्यक्ष नसलो, तरी अखिल भारतीय श्री पंच रामानंदीय निर्वाणी अनी आखाड्याचा श्री महंत तर आहेच. शाहीस्नानात खरे महत्त्व हे अध्य्यक्षपदाला नव्हे, तर श्री महंतपदाला असते. अध्यक्ष फक्त कामे करवून घेण्यासाठी असतो. आमच्यातील वाद शाहीस्नानापर्यंत मिटेल. ईश्वरच तशी सद्बुद्धी देईल. माध्यमांनी कितीही प्रयत्न केले, तरी परिस्थिती बिघडणार नाही, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)