शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगावमध्ये ठाकरेंच्या उमेदवाराची माघार अन् शिंदेसेनेचं खातं उघडलं! आमदार पुत्र गौरव सोनवणे बिनविरोध
2
भाजपाने केली मोठी खेळी, ठाकरेंचे बहुसंख्य उमेदवार ठरले असते बाद; पण ऐनवेळी डाव उलटला अन्...
3
गोव्याला विसरून जाल! भारतातील पाच जबरदस्त बीच, एक आहे कोकणातील, तुमची सुट्टी दुप्पट आनंददायी होईल
4
ना निष्ठा, ना विचारधारा ८ दिवसांत ३ पक्ष बदलले; कुख्यात गुंडाला ठाण्यात कुणी दिली उमेदवारी?
5
ठाण्यात शिंदेसेनेने जागा वाटपामध्ये भाजपचा केला ‘करेक्ट कार्यक्रम’; 'त्या' नऊ जागा बांधल्या भाजपच्या गळ्यात 
6
पदाचा गैरवापर केल्याचा ठाकरे गटाचा आरोप; राहुल नार्वेकर उत्तर देत म्हणाले, “संजय राऊत...”
7
किडनी रॅकेटचे केंद्र तामिळनाडूत; ८० लाखांपर्यंत सौदा, शेकडो लोकांच्या किडनी काढून करोडो जमवले; दोन नामांकित डॉक्टरांची नावे पुढे
8
"तर आम्ही कुठल्याही थराला जाऊ"; नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानच्या असीम मुनीरचा इशारा
9
मनसेच्या मुंबईतील उमेदवारांना राज ठाकरेंचा मोलाचा सल्ला, म्हणाले, ‘तुम्हाला ऑफर येतील, पण…’
10
'ऑपरेशन सिंदूर सुरूच...' लष्करप्रमुख जनरल द्विवेदी यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानला करून दिली आठवण
11
"जितकी मिरची ठाकरे गटाला...", नितेश राणेंचा उद्धवसेनेवर हल्ला, 'उत्तर भारतीय महौपार' मुद्द्यावर काय बोलले?
12
Gold Silver Price Today: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, चेक करा १८ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
13
टॅरिफमुळे US ची किती कमाई? "टीका करणारे मुर्ख" असं म्हणणारे ट्रम्प प्रत्येकाला $२००० देण्याचं वचन पूर्ण करणार का?
14
शिंदेसेनेला धक्का, पाच उमेदवारी अर्ज बाद; एबी फॉर्मवर खाडाखोड, झेरॉक्स जोडल्याने ठरले अवैध
15
बांगलादेशी खेळाडूंसाठी आयपीएलचे दरवाजे बंद होणार? मुस्तफिजुर रहमानसाठी शाहरुखच्या संघाने ९ कोटी मोजले...
16
२०२६ मध्ये या ५ राज्यात रंगणार सत्तेचा सारीपाट, बाजी कोण मारणार, NDA की ‘INDIA’?
17
ट्रम्प यांच्या निर्णयाचे पडसाद! 'या' दोन देशांनी अमेरिकन नागरिकांच्या प्रवेशावर घातली बंदी
18
जळगावात भाजपाला धक्का, माजी महापौरांचा अर्ज बाद; AB फॉर्ममधील त्रुटीचा उद्धवसेनेलाही फटका
19
Healthy Diet: अन्न तेच पण पद्धत वेगळी! जपानी लोक लठ्ठ का होत नाहीत? त्यामागे आहेत ५ सिक्रेट 
20
कोकण गाजवल्यावर शिंदेचा फायर ब्रँड नेता मुंबईत; ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात दिली मोठी जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्ष नसलो तरी महंत आहे ना?

By admin | Updated: August 25, 2015 23:57 IST

मौन सोडले : ग्यानदास महाराजांचा नरमाईचा पवित्रा

नाशिक : भले मी आखाडा परिषदेचा अध्यक्ष नसलो, तरी निर्वाणी अनी आखाड्याचा महंत तर आहे ना, असा सवाल करीत श्री महंत ग्यानदास यांनी आज अखेर एक पाउल मागे घेतले. कुंभमेळ्यातील शाहीस्नान हे अध्यक्षाचे नव्हे, महंतांचेच असते. अध्यक्ष तर केवळ कामे करवून घेण्यासाठी असतो, अशी पुस्तीही त्यांनी जोडल्याने त्यांचा नरमाईचा पवित्रा अधोरेखित झाला. गेल्या काही महिन्यांपासून श्री महंत ग्यानदास यांच्या अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या अध्यक्षपदावरून वाद सुरू आहेत. त्र्यंबकेश्वर येथील दहा शैव आखाड्यांनी त्यांना अध्यक्ष मानण्यास यापूर्वीच नकार दिला आहे, तर रविवारी वैष्णव पंथातील सर्वांत मोठ्या दिगंबर अनी आखाड्यानेही ग्यानदास यांचा पाठिंबा काढून घेतला. महंत ग्यानदास हे हुकूमशहाप्रमाणे वागत असून, साधू-संतांना अपमानित करीत आहेत. त्यांच्याकडून पदाची प्रतिष्ठा राखली जात नसल्याने त्यांचे अध्यक्षपद अमान्य करीत असल्याची घोषणा दिगंबर आखाड्याने केली. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपासून साधुग्राममध्ये तणावाचे वातावरण होते. दिगंबर आखाड्याकडून टीकास्र सोडले जात असताना, महंत ग्यानदास यांनी मात्र याबाबत मौन बाळगले होते. आज दुपारपर्यंत त्यांच्याशी कोणाचा संपर्क होऊ शकला नव्हता. ते त्रिवेणीधाम डाकोरधाम खालशाच्या ध्वजारोहणासाठी आले; मात्र काही मिनिटेच थांबत त्यांनी निर्वाणी आखाड्यात प्रयाण केले. अखेर सायंकाळी पत्रकारांशी वार्तालाप करीत त्यांनी काही बाबी स्पष्ट केल्या. शाहीस्नान ठरल्याप्रमाणेच होणार असून, त्यासाठी आखाड्यांचा क्रम निश्चित करण्यात आला आहे; मात्र तो पोलिसांच्या वतीने अधिकृतरीत्या जाहीर केला जाईल. सध्या चर्चेत असलेला वाद अनेक दिवसांपासून सुरू असून, त्यात नवे काहीच नाही. भावा-भावात भांडणे होतात; पण नंतर ते एकत्र येतातच. पाण्यात काठी मारल्यावर पाण्याचे दोन भाग होतात; पण ते लगेच एकत्रही येते. आम्हा साधूंचे तसेच आहे. आम्ही घरदार सोडून देव, देशकार्यासाठी आलो आहोत, एकमेकांशी भांडण्यासाठी नव्हे. समजा, मी अध्यक्ष नसलो, तरी अखिल भारतीय श्री पंच रामानंदीय निर्वाणी अनी आखाड्याचा श्री महंत तर आहेच. शाहीस्नानात खरे महत्त्व हे अध्य्यक्षपदाला नव्हे, तर श्री महंतपदाला असते. अध्यक्ष फक्त कामे करवून घेण्यासाठी असतो. आमच्यातील वाद शाहीस्नानापर्यंत मिटेल. ईश्वरच तशी सद्बुद्धी देईल. माध्यमांनी कितीही प्रयत्न केले, तरी परिस्थिती बिघडणार नाही, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)