शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

आरोग्य जागृतीसाठी दुचाकीवर देशभ्रमंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 00:21 IST

प्रत्येक माणसाच्या आयुष्याचे तीन टप्पे असतात. पहिला टप्पा बालपण व शिक्षणात खर्च होतो तर दुसरा नोकरी व संसारात स्थिरस्थावर होण्याचा असतो. या दुसऱ्या संघर्षमय टप्प्यात मनुष्य इतका व्यस्त होऊन जातो की, स्वत:च्या आरोग्याकडेही तो पुरेसा वेळ देऊ शकत नाही, परिणामी अखेरच्या टप्प्यातील व्याधीवर उपचार करण्यात आयुष्यभराची पुंजी खर्च करावी लागते. ही वेळ कोणावरही येऊ नये म्हणून सामाजिक आरोग्य जागृतीचा संदेश देण्यासाठी मी दुचाकीवर भारतभ्रमंती करीत असल्याचे दिल्ली येथील शरत शर्मा यांनी सांगितले.

ठळक मुद्देशरत शर्मा यांचा उपक्रम नाशिकमध्ये आगमन झाल्यानंतर ‘लोकमत’ला भेट

नाशिक : प्रत्येक माणसाच्या आयुष्याचे तीन टप्पे असतात. पहिला टप्पा बालपण व शिक्षणात खर्च होतो तर दुसरा नोकरी व संसारात स्थिरस्थावर होण्याचा असतो. या दुसऱ्या संघर्षमय टप्प्यात मनुष्य इतका व्यस्त होऊन जातो की, स्वत:च्या आरोग्याकडेही तो पुरेसा वेळ देऊ शकत नाही, परिणामी अखेरच्या टप्प्यातील व्याधीवर उपचार करण्यात आयुष्यभराची पुंजी खर्च करावी लागते. ही वेळ कोणावरही येऊ नये म्हणून सामाजिक आरोग्य जागृतीचा संदेश देण्यासाठी मी दुचाकीवर भारतभ्रमंती करीत असल्याचे दिल्ली येथील शरत शर्मा यांनी सांगितले.आयुष्याची निम्मी वर्ष$ं प्रसिद्धी माध्यमात घालवून निवृत्त झालेल्या शर्मा यांना समाजात आरोग्याबद्दलची जी बेफिकिरी दिसून आली, ती दूर होण्यास हातभार लागावा यासाठी देशभ्रमंती करण्याचा निश्चय त्यांनी केला. आपल्या मोटारबाइकवरून २३ राज्यांची सैर केल्यानंतर शुक्रवारी नाशिकमध्ये आले असता शर्मा यांनी ‘लोकमत’च्या मुख्य कार्यालयाला भेट दिली व आपल्या या बाइक सफरीतील अनेक अनुभव यावेळी कथन केले.मला स्वत:ला ‘ए’ राज्याच्या शहरी किंवा ग्रामीण भागात असे काही बिघडले असल्याचे दिसले नाही. या प्रवासात मी समाजाच्या सर्व स्तरातील लोकांशी बोलतो. मदतीला सर्व तत्पर असतात. गप्पा मारतात, अनुभव विचारतात, काही मदत हवी आहे का, असे आपुलकीने विचारतात. मग कटुता कुठे आहे, तर ती काही लोकांच्या मनात आहे. ती घालवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे शर्मा यांनी सांगितले. या सफरीसाठी कोणीही प्रायोजक मिळवला नसून निवृत्तीनंतर मिळालेली सर्व रक्कम यात गुंतवल्याचे शर्मा यांनी या भेटीत नमूद केले.

टॅग्स :Healthआरोग्यIndiaभारत