शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

बेकायदेशीर ऊस वाहतूक सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 23:13 IST

महामार्गावरून सर्रासपणे अवैधपणे उसाची वाहतूक करणाºया ट्रॅक्टर ट्रॉलीचे अंबिकानगर येथील देवी मंदिरासमोर चाक निखळल्याने ट्रॉलीसह ट्रॅक्टर उलटला. या अपघातामुळे वाहतूक कोंडी होऊन खोळंबा झाला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी, ऊस वाहतुकीचे नियम धाब्यावर बसल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : ट्रॅक्टर ट्रॉलीचे चाक निखळल्याने महामार्ग ठप्प

पिंपळगाव बसवंत : महामार्गावरून सर्रासपणे अवैधपणे उसाची वाहतूक करणाºया ट्रॅक्टर ट्रॉलीचे अंबिकानगर येथील देवी मंदिरासमोर चाक निखळल्याने ट्रॉलीसह ट्रॅक्टर उलटला. या अपघातामुळे वाहतूक कोंडी होऊन खोळंबा झाला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी, ऊस वाहतुकीचे नियम धाब्यावर बसल्याचे समोर आले आहे.दैव बलवत्तर म्हणून रस्त्याच्या कडेने जाणारे नागरिक थोडक्यात बचावले. क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरल्याने वजन अधिक झाल्याने ट्रॉलीचे चाक निखळल्याचे काही ट्रॅक्टर चालकांनी सांगितले. नियमबाह्य ऊस वाहतुकीमुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू असल्याने तालुक्यातील विविध भागातून उसाची वाहतूक सुरू आहे. मात्र वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून सर्रास दोन ट्रोली जोडून उसाची वाहतूक केली जात असल्याचे चित्र निफाड तालुक्यातील विविध रस्त्यांवर दिसत आहे.निफाड-पिंपळगाव रस्त्यावर तीन वर्षांपूर्वी ऊस वाहतूक करणाºया ट्रॅक्टर ट्रॉलीचे अतिवजनामुळे चाक निखळल्याने ट्रॉली उलटून उसाच्या ढिगाºयाखाली दोन जण दाबले गेले होते. दैव बलवत्तर म्हणून ते वाचले. हा प्रसंग घडूनही या रस्त्यावरून दोन ट्रॉलींसह ऊस वाहतूक सर्रास सुरू आहे. त्याची पुनरावृत्ती वर्षाच्या प्रारंभीच झाली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. संबंधित विभागाने वेळीच यावर निर्णय घेणे गरजेचे आहे.या नियमांमुळे अवैध वाहतूकवाहतुकीनुसार ट्रॅक्टरमालकाला कारखान्याकडून भाडे अदा करण्यात येते. म्हणून ट्रॅक्टरचालक ट्रॅक्टरच्या क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरतात. त्यामुळे सर्रास दोन ट्रॉलींचा वापर करण्यात येतो. एका ट्रॉलीची क्षमता १४ ते १५ टन इतकी असते. परंतु, यामध्ये १८ ते २० टन भरण्यात येतो. नफा कमाविण्यासाठी बेकायदेशीरपणे अधिक ऊस भरला जातो. हे प्रकार जीवघेणे ठरत आहेत. त्यासाठी विनापासिंग ट्रॉलींचा वापर करण्यात येतो.

वाहतूक पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने अवैध ऊस वाहतूक थांबण्याचे नाव घेत नाही. यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. तसेच रस्त्यांचीही वाट लागत आहे. कारवाईसाठी वाहतूक विभाग मोठी दुर्घटना होण्याचा मुहूर्त पाहत आहे का, असा सवाल नागरिकांनी केला आहे. अंबिकानगर भागात झालेल्या अपघातामुळे वाहतूक कोंडी झाल्याने वाहधारकांनी संताप व्यक्त केला आहे.अनेक ट्रॅक्टर टॉलींना नंबरच नसतो. यामुळे अपघातानंतर ट्रॅक्टरचालक पसार होतात. दोन ट्रॉली एका ट्रॅक्टरला जोडून त्यामध्ये उसाची वाहतूक करणे बेकायदेशीर आहे. मात्र सर्रासपणे ही वाहतूक सुरू असून, आरटीओकडून ग्रामीण भागातील रस्त्यांवर सुरू असलेली ही जीवघेणी वाहतूक बंद का केली जात नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.- उद्धवराजे शिंदे, सामाजिक कार्यकर्ते, पिंपळगाव बसवंत

रस्त्यावरील अवैध वाहतूक रोखण्याची व संबंधितांवर कारवाई करण्याची जबाबदारी आरटीओ विभागावर आहे. पण नियम धाब्यावर ठेवून ऊस ट्रॅक्टर ट्रॉलीतून बेकायदेशीरपणे कारखान्याकडे पोहचविला जात आहे. यामुळे अनेक अपघातात घडत असून, पोलीस व आरटीओ विभागाने जागे होण्याची गरज आहे.- रोहित कापुरे, वाहनधारक, पिंपळगाव बसवंत

टॅग्स :Accidentअपघात