शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

मालेगावी लिलाव नसताना बेकायदा वाळू उपसा

By admin | Updated: January 29, 2015 00:01 IST

मालेगावी लिलाव नसताना बेकायदा वाळू उपसा

मालेगाव : लिलाव झालेला नसताना येथील गिरणा व मोसम नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा केला जात असल्याने नदीकाठच्या विहिरींनी तळ गाठला आहे. तालुक्यात गेल्या वर्षी एकाच ठिकाणचा वाळू लिलाव झालेला असताना दोन्ही नदीपात्रातील वाळू नाहीशी झालेली आहे. त्यामुळे या वाळूची चोरी करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.येथील गिरणा नदीपात्रातील दाभाडी, रोकडोबा आदि ठिकाणी रात्रभर वाळूचा उपसा करून सोयगाव, कॅम्प, नववसाहत भागात वाळू टाकण्यात येत आहे. चंदनपुरी, म्हाळदे आदि ठिकाणी वाळूचा उपसा करून ती शहरासह इतर भागात वाहिली जात आहे. सुमारे सहा महिन्यापासून वाळू लिलाव बंद असूनही शहरात वाळूचा तुटवडा जाणवत नाही. महसूलच्या कर्मचाऱ्यांवर हल्ले केले जात असल्याने संबंधित कर्मचारी त्याकडे काणाडोळा करत असल्याची वास्तविकता आहे. ग्रामीण भागात वाळू रक्षणाची जबाबदारी तलाठी व ग्रामपंचायतीवर आहे. मात्र काळाच्या ओघात सोन्याचे अंडे ठरलेल्या वाळू व्यवसायात सर्वांचेच आर्थिक हितसंबंध गुंतलेले असल्याने कुंपनच शेत खाऊ लागले आहे. त्यातूनच वाळूची चोरी केली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. (वार्ताहर)