शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

इगतपुरी तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 5:21 PM

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुका हा आदिवासी तालुका असून येथील शेतकऱ्यांचे जीवन भात पिकांवर अवलंबून असल्याने तसेच पावसाने उशिरा हजेरी लावल्यामुळे हे पीक धोक्यात आले आहे. शेतकºयांच्या हाता-तोंडाशी आलेले भात पीक गवतासारखे वाळले असल्यामुळे शासनाने त्वरित इगतपुरी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा असे निवेदन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी तहसिलदार वंदना खरमाळे यांना दिले आहे.

ठळक मुद्दे शेतकर्यांनी तहसिलदार वंदना खरमाळे यांना दिले

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुका हा आदिवासी तालुका असून येथील शेतकऱ्यांचे जीवन भात पिकांवर अवलंबून असल्याने तसेच पावसाने उशिरा हजेरी लावल्यामुळे हे पीक धोक्यात आले आहे. शेतकºयांच्या हाता-तोंडाशी आलेले भात पीक गवतासारखे वाळले असल्यामुळे शासनाने त्वरित इगतपुरी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा असे निवेदन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी तहसिलदार वंदना खरमाळे यांना दिले आहे.या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामीण भागातील भारनियमन कायमचे बंद करून शेतकºयांसाठी दिवसा वीज उपलब्ध करु न देण्यात यावी. भात, सोयाबीन, नागली व इतर पिके पावसाअभावी अक्षरश: करपून गेली असून सदर पिकांचे पंचनामे करुन एकरी पन्नास हजार रु पये नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच अतिरिक्त भार असलेल्या रोहित्राच्या जागी नवीन रोहित्र बसविण्यात यावे. त्याचप्रमाणे आॅनलाईन उतारे काढणाºया शेतकºयांची होणारी लूट त्विरत थांबविण्यात यावी अशा महत्वपूर्ण मागण्यांचे निवेदन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी तहसिलदार वंदना खरमाळे यांना दिले आहे.याप्रसंगी रामकृष्ण बोंबले, भगवान बोराडे, प्रभाकर थोरात, भिमराव बोराडे, बाळकृष्ण नाठे, सुनिल चौधरी, संजय सहाणे, तुकाराम सहाणे, दिलीप सहाणे, तानाजी झाडे, लक्ष्मण मते, शांताराम मते, योगेश हळकुंडे, रामदास सहाणे, बाळू पागेरे, चंद्रशेखर पाटील, बाळासाहेब कुकडे, सखाराम सहाणे, भागवत गुंजाळ आदी शेतकरी उपस्थित होते.