शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
2
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
3
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
4
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
5
वयाच्या १५ व्या वर्षीच अक्षय कुमारच्या लेकाने सोडलंय घर, आरवच्या सवयी वाचून व्हाल शॉक!
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
7
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
8
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
9
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
10
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
11
खवळलेल्या समुद्रातून २४ पर्यटकांची सुटका, दोन तास थरार, तटरक्षक दलाच्या शाैर्याचे सर्वत्र काैतुक
12
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
13
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?
14
विदेशी नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा धंदा जोरात, परराष्ट्र मंत्रालयाकडून सावधगिरीचा इशारा
15
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
16
आता औषधे संशयाच्या भोवऱ्यात; दर्जाबाबत शंका आल्याने भारतीय कंपन्यांची उत्पादने परत पाठविली
17
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
18
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
19
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
20
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ

इगतपुरीत पावसाचा दणका; भातपिकावर संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 11:20 PM

भाताचे कोठार आणि पावसाचे माहेरघर असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात भातपिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. यंदा पावसाने सुरुवातीला चांगली हजेरी लावल्याने पीकही बहरले आहे; मात्र तीन दिवसांपासून संततधार पावसाने या पिकाला दणका दिला आहे.

वैतरणानगर : भाताचे कोठार आणि पावसाचे माहेरघर असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात भातपिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. यंदा पावसाने सुरुवातीला चांगली हजेरी लावल्याने पीकही बहरले आहे; मात्र तीन दिवसांपासून संततधार पावसाने या पिकाला दणका दिला आहे. भातपिकाला धोका निर्माण झाला असून, करपा आणि कडा करपा या रोगांनी पिकावर आक्रमण केल्याने पिकावर संक्रांत आली आहे. यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.ढगाळ वातावरणामुळे दोन्ही रोगांचा प्रभाव प्रामुख्याने पीकवाढीच्या सर्वच अवस्थेवर परिणाम झाल्याने तसेच ऐन बहरात आलेले भातपीक करपा व विविध रोग सदृश परिस्थितीमुळे भातपिकाच्या उत्पादनात घट होणार आहे. त्यामुळे आधीच नुकसान सोसल्याने व परतीच्या पावसामुळे रब्बी हंगाम लांबत जाणार असल्यामुळे बळीराजा धास्तावला आहे. इगतपुरी तालुक्यात सलग तीन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे जनजीवनही विस्कळीत झाले आहे. पिकांचे नुकसान झाले असून, याकडे तालुका कृषी विभागाचा काणाडोळा होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तत्काळ पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.भात लागवडीसाठी लाखो रुपयांची कर्जे घेऊन हातातोंडाशी आलेला घासही निसर्गाच्या अवकृपेमुळे निघून जाण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी ऐन सणासुदीत चिंता व्यक्त करीत आहे.द्राक्ष उत्पादक चिंतितपांडाणे : दिंडोरी तालुक्यातील चौसाळा, करंजखेड, सारसाळे, खोरीपाडा, माळे दुमाला परिसरात बुधवारी सायंकाळी ५ वाजता पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे द्राक्षबागायतदार व भात उत्पादकांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे.दिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील भात, नागली, वरी, उडीद, मूग पिकाचे नुकसान झाले असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे बळीराजा चिंतित आहे. भुईमूग व भात पीक उतरून पडणार की काय अशी स्थिती निर्माण झाली असून, नुकसान झालेल्या पिकांचा त्वरित पंचनामा करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीagricultureशेती