शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

उमेदवारी नाकारल्यास विचारणार जाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 01:25 IST

गेल्यावेळी राष्टवादी कॉँग्रेसच्या ज्या उमेदवाराला भाजपाने अडीच लाख मतांनी पराभूत केले त्या डॉ. भारती पवार यांनी नुकताच मुंबई येथे भाजपात प्रवेश केला असून, त्यामुळे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नाशिक : गेल्यावेळी राष्टवादी कॉँग्रेसच्या ज्या उमेदवाराला भाजपाने अडीच लाख मतांनी पराभूत केले त्या डॉ. भारती पवार यांनी नुकताच मुंबई येथे भाजपात प्रवेश केला असून, त्यामुळे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पवार यांना उमेदवारी दिली तर तो माझ्यावर अन्यायच ठरेल अशी भावना व्यक्त करणाऱ्या चव्हाण यांनी यासंदर्भात निर्णय घेण्यासाठीे पक्षाचा मेळावाही आयोजिला आहे.खासदारकीची हॅट््ट्रिक करणाऱ्या चव्हाण यांना सहजासहजी उमेदवारी मिळणार नाही अशी भाजपात चर्चा होती. गेल्या लोकसभा निवडणुकीत हरिश्चंद्र चव्हाण यांनी भारती पवार यांचा दोन लाख ४७ हजार मतांनी पराभव केला होता. आताही त्या राष्टÑवादीच्या संभाव्य उमेदवार मानल्या जात होत्या. परंतु शिवसेनेतून राष्टÑवादीत दाखल झालेल्या धनराज महाले यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर भारती पवार यांची आशा संपुष्टात आली. त्यानंतर त्या भाजपात दाखल झाल्या. परिणामी खासदार हरिश्चंद्र चव्हाण उमेदवारीसाठी वेटिंगवर आहेत. त्यापार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. २२) दुपारी चव्हाण यांच्या नाशिकमधील निवासस्थानी समर्थकांची तातडीची बैठक घेण्यात आली. यात चव्हाण यांना डावलून भारती पवार यांना प्रवेश देण्यात आल्याने संघटनेवरच तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. पक्षाशी संबंधित नसलेल्यांना अशाप्रकारे पक्षात स्थान देणे गैर आहे, असे सांगतानाच यावेळी मतदारसंघातील समर्थकांची बैठक घेऊन भूमिका निश्चित करण्याचे ठरविण्यात आले.दरम्यान, भारती पवार यांच्या प्रवेशाचे स्वागतच, मात्र मला डावलून त्यांना तिकीट मिळाले तर तो माझ्यावर अन्याय ठरेल, असे खासदार चव्हाण यांचे म्हणणे आहे. भारती पवार यांच्या प्रवेशाबाबत मला कुठलीही विचारणा झाली नव्हती असे सांगून आपल्या उमेदवारीबाबत अद्याप दिल्लीत कोणत्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही, परंतु पक्ष विचार करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. गेली पंधरा वर्षे संसदेतील माझे कामकाज पक्षाचे वरिष्ठ नेते बघत आहेत. त्यामुळे त्यांनी माझ्या कामगिरीची तुलना करून निर्णय घेतला पाहिजे, असेही ते म्हणाले.मग तो सर्व्हे कोणता?हरिश्चंद्र चव्हाण यांची उमेदवारी अडचणीत आणण्याला एक सर्व्हे कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. मग, राष्टवादीला ज्या उमेदवाराच्या विजयाची खात्री नव्हती, तो उमेदवार भाजपाच्या सर्व्हेत यशस्वी कसा ठरला, असा प्रश्न कार्यकर्त्यांनी यावेळी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणElectionनिवडणूकHarishchandra Chavanहरिश्चंद्र चव्हाणBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस