संकटांशी मैत्री केली तर यशाचा मार्ग : सपकाळ
By Admin | Updated: January 20, 2017 23:25 IST2017-01-20T23:24:59+5:302017-01-20T23:25:20+5:30
संकटांशी मैत्री केली तर यशाचा मार्ग : सपकाळ

संकटांशी मैत्री केली तर यशाचा मार्ग : सपकाळ
देवळाली कॅम्प : जगा आणि जगू द्या, हा मंत्र आयुष्यात आत्मसात करत समोर आलेल्या संकटांशी मैत्री केली, तर यशाचा मार्ग सापडतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांनी केले. देवळालीतील सुभाष खालकर यांनी आयोजित केलेल्या व्याख्यान कार्यक्रमप्रसंगी बोलताना सपकाळ म्हणाल्या की, घरातील प्रत्येक माणसाची काळजी घ्या. घरातील बाई हीच आई आहे. मी १७५ गायींचे पालनपोषण सोबत १७५ जावई, २३० मुली व अनेक नातवंडांची माय बनून त्यांच्या शिक्षणासह सर्व जबाबदारी सांभाळत आहे. हे सारे करताना मी सरकारकडे काही मदत मागितली, पण ती मिळाली नाही. मात्र जनता या अनाथांच्या उन्नतीसाठी मदत करतील, असा विश्वास असल्याने लोक सहभागातून हे कार्य पुढे नेत असल्याचे सपकाळ यांनी स्पष्ट केले. प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उपनेते बबनराव घोलप, खासदार हेमंत गोडसे, माजी खासदार राजाभाऊ गोडसे, आमदार योगेश घोलप आदि उपस्थित होते. प्रास्ताविक जगदीश गोडसे यांनी केले.