शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

विचार पटत नसतील तर इथेच विरोध करा  : इंदोरीकर महाराजांचे विरोधकांना आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 18:42 IST

लोकमत न्युज नेटवर्क नाशिक : अपत्ये होण्यावरून समाजमाध्यम तसेच अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडून टिकेचे धनी झालेले किर्तनकार इंंदोरीकर महाराज यांनी ...

ठळक मुद्दे नंतर तक्रारी नकोगेल्या २६ वर्षांत जेवढा त्रास झाला नाही, त्यापेक्षा अधिक त्रास गेल्या आठ दिवसांपासून होत असल्याची खंत

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : अपत्ये होण्यावरून समाजमाध्यम तसेच अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडून टिकेचे धनी झालेले किर्तनकार इंंदोरीकर महाराज यांनी या वादावर पडदा टाकण्यासाठी जाहीर दिलगिरी व्यक्त केली असली तरी, त्यांच्या विरोधातील वाद शमत नसल्याचे पाहून मंगळवारी त्यांनी आडगाव येथे किर्तन करताना ‘माझे विचार पटत नसतील इथेच विरोध असल्याचे सांगा, पुढे मागे तक्रारी करू नका’ असे आवाहन केले. त्याचबरोबर ‘गेल्या २६ वर्षांत जेवढा त्रास झाला नाही, त्यापेक्षा अधिक त्रास गेल्या आठ दिवसांपासून होत असल्याची खंतही बोलून दाखविली.आडगाव येथे येथे सार्वजनिक शिवजयंती सोहळ्यानिमित्त मंगळवारी (दि.१८) रोजी ह.भ.प. निवृत्ती महाराज (देशमुख) इंदोरीकर यांचे किर्तन आयोजित करण्यात आले होते. भर उन्हात झालेल्या या किर्तनासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी प्रचंड गर्दी केली. दुपारी दिड वाजेच्या सुमारास ह.भ.प. इंदोरीकर महाराज यांचे आडगावमध्ये आगमन होताच त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. ढोलताशांच्या गजरात बैलगाडीवरून त्यांची स्वागत मिरवणूक काढण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून इंदोरीकर महाराज यांनी मुलगा-मुलगी जन्माबाबत केलेल्या वक्तव्यावरून वाद सुरू झाला असून, त्यातून चार दिवसांपुर्वी ‘वाद शमला नाही तर किर्तन सोडून शेती व्यवसाय करू’ असे उदिग्न होवून त्रागा बोलून दाखविला होता. त्यातून अनेक सामाजिक व राजकीय संघटना, लोकप्रतिनिधी इंदोरीकर महाराज यांच्या पाठीशी उभ्या राहिल्याने एकीकडे त्यांचे विरोधक व दुसरीकडे समर्थक असा सामना होण्याची शक्यता निर्माण झालेली असताना इंदोरीकर महाराजांनी वाद शमविण्यासाठी जाहीर दिलगिरी व्यक्त केली. त्यामुळे आडगावी होणाऱ्या किर्तनात महाराज काय बोलतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. परंतु फारसे वादात न पडता, इंदोरीकर महाराज यांनी किर्तनाच्या प्रारंभीच उपस्थितांना उद्देशून किर्तनात जे काही सांगेल, ते माझे विचार पटत नसतील तर इथेच विरोध करा, नंतर तक्रारी करू नका असे आवाहन करून आपली सामंजस्यपणाची भूमिका जाहीर केली. त्यानंतर मात्र त्यांनी नेहमीच्या शैलीत समाजप्रबोधनपर मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी प्रथम शिवरायांना अभिवादन केले. वयाच्या १६ व्या वर्षी स्वराज्य स्थापनेचा निश्चय करत स्वत:चे स्वराज्य निर्माण करणारे शिवराय हे पहिले राजे असल्याचे मत व्यक्त करून, एक गाव एक शिवजयंती साजरी करत गावाच्या एकत्रीकरणाची सुरवात करणाºया आडगाव ग्रामस्थांचे कौतुक केले.

 

टॅग्स :SocialसामाजिकNashikनाशिक