शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

महाराष्ट्रात वणवा पेटला तर विझवणं कठीण जाईल, संजय राऊतांचा बंडखोर आणि भाजपाला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 14:21 IST

Sanjay Raut: बंडखोरांना मदत करणाऱ्या भाजपालाही संजय राऊत यांनी इशारा दिला आहे. महाराष्ट्रात वणवा पेटला तर विझवणं कठीण होईल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

नाशिक - शिवसेनेतील ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड करत शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. त्यानंतर या बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रिपद मिळवले आहे. या सर्व घटनाक्रमामुळे शिवसेनेला जबर धक्का बसला आहे. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांविरोधात कमालीचे आक्रमक झाले आहेत. तसेच बंडखोरांना मदत करणाऱ्या भाजपालाही संजय राऊत यांनी इशारा दिला आहे. महाराष्ट्रात वणवा पेटला तर विझवणं कठीण होईल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

काही आमदार गेले म्हणजे शिवसेना फुटली असं होत नाही. शिवसैनिक जागेवरच आहे. अजूनही १०० आमदार आणि २५ खासदार निवडून आणण्याची ताकद शिवसेनेमध्ये आहे. ही ताकद शिवसेनेचीच आहे. गुलाबरावांचा जुलाबराव होईल, ५० खोकी पचणार नाही. ही बेईमानी पचणार नाही. हा खरा आणि खोट्यातील वाद नाही तर ईमानदार आणि बेईमानीमधील वाद आहे.

आम्ही लाल किल्ल्याला सलाम नाही मारत आम्ही रायगडाला सलाम करतो. आमचे हायकमंड दिल्ली नाही मातोश्री आहे. दिल्लीवाल्याना मुंबई तोडायची आहे, म्हणून शिवसेना तोडली. यांना  महाराष्ट्रचे तीन तुकडे करायचे आहेत, असा दावाही त्यांनी केला. तसेच धनुष्यबाण हा शिवसेनेचा आणि शिवसैनिकांचा पंचप्राण आहे. आमचे धनुष्यबाण कोणीही हिरावून देऊ शकत नाही,  शिवसैनिक पेटले तर विझवणे मुश्किल होईल, हा महाराष्ट्र आदेशाची वाट पाहत आहे, असा इशाराही राऊत यांनी भाजपाला दिला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा