शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

सरकार कुणाचेही येवो, सामान्यांचा काय फायदा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 01:16 IST

नाशिक : विधानसभेच्या निवडणुकांसाठी येत्या २१ तारखेला राज्यभरात मतदान होणार असून, उमेदवारांनी आपल्या मतदारसंघात तयारी सुरू केली आहे. उमेदवारांचे मोर्चे आता ज्येष्ठ नागरिकांकडे वळाले आहेत. लोकप्रतिनिधी ज्येष्ठांना गाठत त्यांच्या पाया पडत आम्हालाच मत द्या, असे सांगत असले तरी प्रत्यक्षात ज्येष्ठ नागरिकांच्या कट्ट्यावर उमेदवारांविषयी वेगळ्याच चर्चा सुरू असल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देस्थळ : निरामय ज्येष्ठ नागरिक संघ

वेळ : सायंकाळी ५ वाजतास्थळ : निरामय ज्येष्ठ नागरिक संघनाशिक : विधानसभेच्या निवडणुकांसाठी येत्या २१ तारखेला राज्यभरात मतदान होणार असून, उमेदवारांनी आपल्या मतदारसंघात तयारी सुरू केली आहे. उमेदवारांचे मोर्चे आता ज्येष्ठ नागरिकांकडे वळाले आहेत. लोकप्रतिनिधी ज्येष्ठांना गाठत त्यांच्या पाया पडत आम्हालाच मत द्या, असे सांगत असले तरी प्रत्यक्षात ज्येष्ठ नागरिकांच्या कट्ट्यावर उमेदवारांविषयी वेगळ्याच चर्चा सुरू असल्याचे दिसत आहे.निवडणूक आली की तेव्हाच लोकप्रतिनिधी बघायला मिळतात, मात्र निवडून आल्यानंतर पुढील पाच वर्षं त्यांचा चेहरा बघायला मिळत नसल्याचे निरामय ज्येष्ठ नागरिक संघातील एकाने सांगितले. त्यावर एकाने राजकारणी हे उत्कृष्ट कलाकार असतात, निवडणूक आली की ज्याला ओळखत नाही अशा लोकांच्या पाया पडतात. मात्र, त्यांना हे पण माहीत नसते की तो मतदार त्यांच्या मतदारसंघातील नाही. त्यावर एकाने सगळे राजकारणी एकच माळीचे मणी असल्याचे सांगत नगरसेवक, आमदार, खासदारांसह मुख्यमंत्र्यांनाही यात ओढले. तसेच सरकार कोणतेही आले तरी सामान्यांना कुठलाही फायदा होत नसल्याचे एकाने सांगितले, तर एकाने मी अनेक निवडणुका बघितल्या असून, उमेदवार हे फक्त त्यांचे पोट भरण्यातच समाधानी असतात. तर एकाने त्यांच्या भागातील समस्यांचा पाढा वाचत संताप व्यक्त केला. त्यावर सगळ्यांनीच त्यांच्या त्यांच्या भागातील समस्या सांगितल्या. चालायला रस्ते नाही, बसायला जागा नाही, आहे त्या जागेचीही मोठी दुरवस्था झाल्याचे सांगितले.(या चर्चेत संघाचे अध्यक्ष गंभीर रामोळे, डॉ. कृष्णाजी आपटे, सूर्यकांत धटिंगण, चंद्रशेखर खैरनार, राजेंद्र जोगदंड, नाना चव्हाण, रंगनाथ चव्हाण, पंडितराव बोढारे, शिवाजी बोढारे आदींनी सहभाग घेतला होता.)निवडणूक आली की उमेदवारांचे आश्वासने ऐकून घेण्यासारखे असतात, मात्र त्यावर अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. निवडून येण्याची आधी लोकप्रतिनिधी घरोघरी फिरून जो दिसेल त्याला नमस्कार करतात, तर एकादा ज्येष्ठ दिसला की त्याच्या पाया पडायचे नाटकही करतात व गोड गोड बोलत कधीही आवाज द्या तुमच्यासाठी मध्यरात्रीही येईल, असे सांगतात. मात्र प्रत्यक्षात गरज पडल्यावर हेच लोकप्रतिनिधी सापडत नाही, असे विविध चर्चेत ज्येष्ठ नागरिकांनी बोलून दाखविले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nashikनाशिक