शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

"धाकटे बंधू गोपीनाथ मुंडे हयात असते, तर जेलमध्ये गेलो नसतो!"

By अमोल यादव | Updated: March 18, 2023 18:52 IST

आयुष्यभर जनतेवर निरपेक्ष प्रेम करणारे मुंडे साहेब हयात असते, तर मी अडीच वर्ष जेलमध्ये गेलोच नसतो. ते पहाडाप्रमाणे माझा पाठीशी खंबीरपणे उभे राहिले असते, अशा भावना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या.

नाशिक : लोकनेते गोपीनाथ मुंडे हे माझे धाकटे बंधू होते. त्यांचा गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतचा राजकीय प्रवास अभिमानस्पद होता. ओबीसी चळवळीत ते मला मोठा बंधू मानत. आयुष्यभर जनतेवर निरपेक्ष प्रेम करणारे मुंडे साहेब हयात असते, तर मी अडीच वर्ष जेलमध्ये गेलोच नसतो. ते पहाडाप्रमाणे माझा पाठीशी खंबीरपणे उभे राहिले असते, अशा भावना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या. नांदूर शिंगोटे (ता. सिन्नर) येथे साकारण्यात आलेल्या गोपीनाथ गडाचा लोकार्पण सोहळा शनिवारी (दि. १८) पार पडला. याप्रसंगी भुजबळ बोलत होते. व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आदींसह मान्यवर उपस्थित होते. भुजबळ म्हणाले, स्व. मुंडे यांनी राज्यातील ओबीसींसह पीडित सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आयुष्यभर लढा दिला. त्याच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. त्यामुळे शेवटचा श्वास असेपर्यंत त्यांचे काम सुरू ठेऊ असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.याप्रसंगी बोलतांना भुजबळ, स्व.गोपीनाथराव मुंडे यांनी राज्यात सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आपले आयुष्य खर्च केले. माजी खासदार समीर भुजबळ यांचे वडील व माझे मोठे भाऊ मगन भुजबळ यांचे दुःखद निधन झाले तेव्हा मला अतिव दुःख झाले होते. धाकटे बंंधू गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनाने देखील तितकेच दुख: झाले, अशा भावना भुजबळ यांनी व्यक्त केल्या.भारतीय जनता पक्ष घराघरात पोहचवण्यासाठी मुंडे व प्रमोद महाजन यांनी संघर्ष केला. राज्यात ‘माधव’चा प्रयोग यशस्वी करण्यातही त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. ओबीसी चळवळीसाठी त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. खासदार समीर भुजबळ यांनी संसदेत ओबीसी जनगणनेचा प्रस्ताव पुढे ठेवला, तेव्हा आपल्या पक्षाच्या भूमिकेचा विचार लक्षात न करता ओबीसी बांधवांची गणना का होत नाही? असा प्रश्न मुंडे यांनी उपस्थित केला होता. आज ते असते तर जनजणनेचा प्रश्न नक्कीच मार्गी लागला असता, असा विश्वास देखील भुजबळ यांनी व्यक्त केला.

ओबीसींसह, गरजू, वंचितांना न्याय देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पुर्ण करावे. हीच मुंडे यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल, असे भुजबळ यांनी सांगीतले. तसेच पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडे यांचा वारसा समर्थपणे पुढे चालवत असून ही अभिमानास्पद बाब असे सांगत अखेरच्या क्षणापर्यंत मुंडे यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी काम करण्याचे आश्वासन भुजबळ यांनी दिले. 

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळGopinath Mundeगोपीनाथ मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा