शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

अन्य पॅथींमध्ये ‘इलनेस’चा तर आयुर्वेदात ‘वेलनेस’चा विचार : मोहन भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 17:47 IST

नाशिक : प्रत्येक पॅथीचा अहंकार ज्ञानाला लपवून ठेवण्यास बाध्य करतो. अशा परिस्थितीत ज्ञानाचे काही पैलू आपल्याकडे तर काही दुसऱ्यांकडे आहेत. अन्य पॅथींमध्ये ‘इलनेस’ चा विचार आहे, तर आयुर्वेदात ‘वेलनेस’चा विचार आहे. अशा परिस्थितीत सर्व पॅथींचा समग्र विचार करण्यासाठी आयुर्वेदाने पुढाकार घेऊन नेतृत्व करण्याची गरज असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितले.

ठळक मुद्देसर्व पॅथींचा समग्र विचार करण्यासाठी आयुर्वेदाने पुढाकार घेण्याची गरज

नाशिक : प्रत्येक पॅथीचा अहंकार ज्ञानाला लपवून ठेवण्यास बाध्य करतो. अशा परिस्थितीत ज्ञानाचे काही पैलू आपल्याकडे तर काही दुसऱ्यांकडे आहेत. अन्य पॅथींमध्ये ‘इलनेस’ चा विचार आहे, तर आयुर्वेदात ‘वेलनेस’चा विचार आहे. अशा परिस्थितीत सर्व पॅथींचा समग्र विचार करण्यासाठी आयुर्वेदाने पुढाकार घेऊन नेतृत्व करण्याची गरज असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितले.

‘चरक सदन’ या आयुर्वेद व्यासपीठाच्या केंद्रीय कार्यालयाचे उदघाटन दूरनियंत्रक अर्थात रिमोटव्दारे सरसंघचालक भागवत यांनी केले. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी बोलताना भागवत यांनी कार्यालयाची वास्तू हा आयुर्वेद व्यासपीठाच्या प्रवासातील केवळ एक टप्पा असल्याचे सांगितले. पूर्वीच्या काळी आयुर्वेद घराघरापर्यंतच नव्हे तर अत्यंत दुर्गम भागातील झोपड्यांपर्यंतदेखील पोहोचलेले होते. त्यामुळेच अडुळशाच्या काढ्याने खोकला, अस्थमात आराम मिळतो, हे आपल्या आजी, पणजीला परंपरेतून माहिती झाले होते. त्याकाळच्या ऋषीमुनींनी सामान्य माणसांनी ते ज्ञान सर्वदूर पोहोचावे, यासाठी जसे व्रतस्थ प्रयास केले, तशाच प्रकारच्या प्रयासांची गरज असल्याचेही भागवत यांनी नमूद केले. प्राथमिक स्तरावर स्वस्तात आणि खेड्यापाड्यातही आयुर्वेदाचे उपचार करता येणे शक्य आहे. व्यक्ती आजारी पडू नये यासाठीचा विचार केवळ आयुर्वेदातच केल्याचे दिसून येते. ‘वेलनेस’ची चिंता केली तर ‘इलनेस’ची चिंता अत्यल्प करावी लागेल. संपूर्ण विश्वाला निरामय बनविण्यासाठी आयुर्वेदाने आणि भारतातील वैद्यांनी पुढाकार घ्यायला हवा, असेही भागवत यांनी नमूद केले. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. जयंत देवपुजारी यांनी शासन केवळ कायदा करु शकते, परिस्थिती बदलण्याचे काम संघटनेलाच करायचे असल्याचे सांगितले. यावेळी वैद्य नानासाहेब जाधव, ज्ञानेश्वर थोरात, रवींद्र जोशी, प्रवीण दवडघाक, कैलास साळुंखे, रणजीत पुराणिक, आशुतोष गुप्ता, शीतल देशपांडे मंदार भणगे, आनंद कट्टी, प्रसाद देशपांडे या वैद्यांसह चरक सदनची वास्तू प्रदान करणारे बांधकाम व्यावसायिक नेमीचंद पोद्दार यांचा सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आयुर्वेद व्यासपीठच्या अध्यक्ष वैद्य रजनी गोखले यांनी प्रास्ताविकात संस्थेचे कार्य विशद केले. आयुर्वेद व्यासपीठचे संस्थापक विनय वेलणकर यांच्या हस्ते मोहन भागवत यांचा सत्कार करुन मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर माजी अध्यक्ष संतोष नेवपुरकर, सचिव विलास जाधव आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य