शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
3
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
4
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
5
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
6
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
7
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
8
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
9
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
10
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
11
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
12
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
13
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
14
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
15
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
16
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
17
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

अन्य पॅथींमध्ये ‘इलनेस’चा तर आयुर्वेदात ‘वेलनेस’चा विचार : मोहन भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 17:47 IST

नाशिक : प्रत्येक पॅथीचा अहंकार ज्ञानाला लपवून ठेवण्यास बाध्य करतो. अशा परिस्थितीत ज्ञानाचे काही पैलू आपल्याकडे तर काही दुसऱ्यांकडे आहेत. अन्य पॅथींमध्ये ‘इलनेस’ चा विचार आहे, तर आयुर्वेदात ‘वेलनेस’चा विचार आहे. अशा परिस्थितीत सर्व पॅथींचा समग्र विचार करण्यासाठी आयुर्वेदाने पुढाकार घेऊन नेतृत्व करण्याची गरज असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितले.

ठळक मुद्देसर्व पॅथींचा समग्र विचार करण्यासाठी आयुर्वेदाने पुढाकार घेण्याची गरज

नाशिक : प्रत्येक पॅथीचा अहंकार ज्ञानाला लपवून ठेवण्यास बाध्य करतो. अशा परिस्थितीत ज्ञानाचे काही पैलू आपल्याकडे तर काही दुसऱ्यांकडे आहेत. अन्य पॅथींमध्ये ‘इलनेस’ चा विचार आहे, तर आयुर्वेदात ‘वेलनेस’चा विचार आहे. अशा परिस्थितीत सर्व पॅथींचा समग्र विचार करण्यासाठी आयुर्वेदाने पुढाकार घेऊन नेतृत्व करण्याची गरज असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितले.

‘चरक सदन’ या आयुर्वेद व्यासपीठाच्या केंद्रीय कार्यालयाचे उदघाटन दूरनियंत्रक अर्थात रिमोटव्दारे सरसंघचालक भागवत यांनी केले. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी बोलताना भागवत यांनी कार्यालयाची वास्तू हा आयुर्वेद व्यासपीठाच्या प्रवासातील केवळ एक टप्पा असल्याचे सांगितले. पूर्वीच्या काळी आयुर्वेद घराघरापर्यंतच नव्हे तर अत्यंत दुर्गम भागातील झोपड्यांपर्यंतदेखील पोहोचलेले होते. त्यामुळेच अडुळशाच्या काढ्याने खोकला, अस्थमात आराम मिळतो, हे आपल्या आजी, पणजीला परंपरेतून माहिती झाले होते. त्याकाळच्या ऋषीमुनींनी सामान्य माणसांनी ते ज्ञान सर्वदूर पोहोचावे, यासाठी जसे व्रतस्थ प्रयास केले, तशाच प्रकारच्या प्रयासांची गरज असल्याचेही भागवत यांनी नमूद केले. प्राथमिक स्तरावर स्वस्तात आणि खेड्यापाड्यातही आयुर्वेदाचे उपचार करता येणे शक्य आहे. व्यक्ती आजारी पडू नये यासाठीचा विचार केवळ आयुर्वेदातच केल्याचे दिसून येते. ‘वेलनेस’ची चिंता केली तर ‘इलनेस’ची चिंता अत्यल्प करावी लागेल. संपूर्ण विश्वाला निरामय बनविण्यासाठी आयुर्वेदाने आणि भारतातील वैद्यांनी पुढाकार घ्यायला हवा, असेही भागवत यांनी नमूद केले. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. जयंत देवपुजारी यांनी शासन केवळ कायदा करु शकते, परिस्थिती बदलण्याचे काम संघटनेलाच करायचे असल्याचे सांगितले. यावेळी वैद्य नानासाहेब जाधव, ज्ञानेश्वर थोरात, रवींद्र जोशी, प्रवीण दवडघाक, कैलास साळुंखे, रणजीत पुराणिक, आशुतोष गुप्ता, शीतल देशपांडे मंदार भणगे, आनंद कट्टी, प्रसाद देशपांडे या वैद्यांसह चरक सदनची वास्तू प्रदान करणारे बांधकाम व्यावसायिक नेमीचंद पोद्दार यांचा सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आयुर्वेद व्यासपीठच्या अध्यक्ष वैद्य रजनी गोखले यांनी प्रास्ताविकात संस्थेचे कार्य विशद केले. आयुर्वेद व्यासपीठचे संस्थापक विनय वेलणकर यांच्या हस्ते मोहन भागवत यांचा सत्कार करुन मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर माजी अध्यक्ष संतोष नेवपुरकर, सचिव विलास जाधव आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य