शहरं
Join us  
Trending Stories
1
पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच भाजपाने तीन ठिकाणी उधळला गुलाल
2
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
3
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
4
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
5
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
6
सावधान! ChatGPT वर तुमची माहिती गुप्तपणे सेव्ह होते; टाळायचे असेल तर या ५ स्टेप्स फॉलो करा
7
अर्ज दाखल करताच अजित पवारांच्या उमेदवाराचा मृत्यू, ३ जणांना रात्री प्रवेश, सकाळी तिकीट; काँग्रेसचे २६ उमेदवार गेले कुठे...?
8
VHT 2025 : महाराष्ट्र संघासाठी 'संकटमोचक' ठरला ऋतुराज! शतकी खेळीसह टीम इंडियातील जागेवरही टाकला रुमाल
9
झटपट, पटापट! स्मार्टफोन, इंटरनेट नसेल तरी नो टेन्शन; 'हा' नंबर डायल, काही सेकंदात UPI पेमेंट
10
“राज ठाकरेंच्या जास्त जागा जिंकून याव्यात ही आमची इच्छा, आम्ही बहुमत मिळवू”: संजय राऊत
11
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
12
नववर्षाच्या आदल्या दिवशीच गुड न्यूज; सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, पटापट चेक करा १८, २२, २४ कॅरेटचे दर
13
Nashik Municipal Corporation Election : आयारामांची चांदी! भाजपचे २२, शिंदेसेनेचे १९; निष्ठावंतांच्या नशिबी सतरंज्या उचलण्याचीच वेळ
14
'ताज'चे नाव आता 'जीव्हीके' हॉटेल्सवरून हटणार; टाटा समुहाने संपूर्ण हिस्सा विकला, कोण आहे खरेदीदार?
15
बाबा वेंगा किंवा नास्त्रेदेमस नाही... मायक्रोसॉफ्टची भविष्यवाणी! २०२६ मध्ये या ४० क्षेत्रांतील लोकांच्या नोकऱ्या जाणार...
16
जिभेचे चोचले की निसर्गाचा चमत्कार? जगातला असा एकमेव बेट, जिथे चक्क माती खातात लोक!
17
"आमदार मेहतांच्या घमेंडीमुळे मीरा भाईंदरमध्ये महायुती तुटली"; मंत्री प्रताप सरनाईकांचा घणाघात
18
एबी फॉर्म दिला, जल्लोष झाला अन् तासाभरात उमेदवारी रद्द
19
संप सुरू होण्यापूर्वी Swiggy, Zomato बॅकफुटवर; डिलिव्हरी बॉईजसाठी आली चांगली बातमी
20
पैशांची चणचण, कर्जाचा डोंगर... यूट्यूबवरुन शिकले अन् पती-पत्नीने घरातच छापल्या नकली नोटा
Daily Top 2Weekly Top 5

अन्य पॅथींमध्ये ‘इलनेस’चा तर आयुर्वेदात ‘वेलनेस’चा विचार : मोहन भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 17:47 IST

नाशिक : प्रत्येक पॅथीचा अहंकार ज्ञानाला लपवून ठेवण्यास बाध्य करतो. अशा परिस्थितीत ज्ञानाचे काही पैलू आपल्याकडे तर काही दुसऱ्यांकडे आहेत. अन्य पॅथींमध्ये ‘इलनेस’ चा विचार आहे, तर आयुर्वेदात ‘वेलनेस’चा विचार आहे. अशा परिस्थितीत सर्व पॅथींचा समग्र विचार करण्यासाठी आयुर्वेदाने पुढाकार घेऊन नेतृत्व करण्याची गरज असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितले.

ठळक मुद्देसर्व पॅथींचा समग्र विचार करण्यासाठी आयुर्वेदाने पुढाकार घेण्याची गरज

नाशिक : प्रत्येक पॅथीचा अहंकार ज्ञानाला लपवून ठेवण्यास बाध्य करतो. अशा परिस्थितीत ज्ञानाचे काही पैलू आपल्याकडे तर काही दुसऱ्यांकडे आहेत. अन्य पॅथींमध्ये ‘इलनेस’ चा विचार आहे, तर आयुर्वेदात ‘वेलनेस’चा विचार आहे. अशा परिस्थितीत सर्व पॅथींचा समग्र विचार करण्यासाठी आयुर्वेदाने पुढाकार घेऊन नेतृत्व करण्याची गरज असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितले.

‘चरक सदन’ या आयुर्वेद व्यासपीठाच्या केंद्रीय कार्यालयाचे उदघाटन दूरनियंत्रक अर्थात रिमोटव्दारे सरसंघचालक भागवत यांनी केले. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी बोलताना भागवत यांनी कार्यालयाची वास्तू हा आयुर्वेद व्यासपीठाच्या प्रवासातील केवळ एक टप्पा असल्याचे सांगितले. पूर्वीच्या काळी आयुर्वेद घराघरापर्यंतच नव्हे तर अत्यंत दुर्गम भागातील झोपड्यांपर्यंतदेखील पोहोचलेले होते. त्यामुळेच अडुळशाच्या काढ्याने खोकला, अस्थमात आराम मिळतो, हे आपल्या आजी, पणजीला परंपरेतून माहिती झाले होते. त्याकाळच्या ऋषीमुनींनी सामान्य माणसांनी ते ज्ञान सर्वदूर पोहोचावे, यासाठी जसे व्रतस्थ प्रयास केले, तशाच प्रकारच्या प्रयासांची गरज असल्याचेही भागवत यांनी नमूद केले. प्राथमिक स्तरावर स्वस्तात आणि खेड्यापाड्यातही आयुर्वेदाचे उपचार करता येणे शक्य आहे. व्यक्ती आजारी पडू नये यासाठीचा विचार केवळ आयुर्वेदातच केल्याचे दिसून येते. ‘वेलनेस’ची चिंता केली तर ‘इलनेस’ची चिंता अत्यल्प करावी लागेल. संपूर्ण विश्वाला निरामय बनविण्यासाठी आयुर्वेदाने आणि भारतातील वैद्यांनी पुढाकार घ्यायला हवा, असेही भागवत यांनी नमूद केले. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. जयंत देवपुजारी यांनी शासन केवळ कायदा करु शकते, परिस्थिती बदलण्याचे काम संघटनेलाच करायचे असल्याचे सांगितले. यावेळी वैद्य नानासाहेब जाधव, ज्ञानेश्वर थोरात, रवींद्र जोशी, प्रवीण दवडघाक, कैलास साळुंखे, रणजीत पुराणिक, आशुतोष गुप्ता, शीतल देशपांडे मंदार भणगे, आनंद कट्टी, प्रसाद देशपांडे या वैद्यांसह चरक सदनची वास्तू प्रदान करणारे बांधकाम व्यावसायिक नेमीचंद पोद्दार यांचा सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आयुर्वेद व्यासपीठच्या अध्यक्ष वैद्य रजनी गोखले यांनी प्रास्ताविकात संस्थेचे कार्य विशद केले. आयुर्वेद व्यासपीठचे संस्थापक विनय वेलणकर यांच्या हस्ते मोहन भागवत यांचा सत्कार करुन मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर माजी अध्यक्ष संतोष नेवपुरकर, सचिव विलास जाधव आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य