शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

...तर राजकारणातून संन्यास घेईन, चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य

By संकेत शुक्ला | Updated: March 2, 2024 17:28 IST

मोदी यांचे विचार सामान्य माणसाला पटतात, असं देखील ते म्हणाले.

संकेत शुक्ल, नाशिक : पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या कामांमुळे मोदी सरकार स्ट्राॅंग आहे. कलम ३७० हटवणे, भारताने चंद्रावर लावलेला झेंडा यासह मोदी यांनी केलेली कामे सामान्य माणसांनाही पटतात. त्यांचे म्हणणे पटत नाही, असे म्हणत जर सामान्य पुढे आले तर सक्रिय राजकारणातून संन्यास घेईन, असे मत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

भोसला महाविद्यालयाच्या कार्यक्रमासाठी नाशिक येथे आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. मंत्रालयात नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि आमदार थोरवे यांच्यात झालेल्या वादाबद्दल विचारले असता, त्याबद्दल माहिती नसल्याचे सांगत त्यावर प्रतिक्रिया देणे टाळले. शिखर बँकेचे प्रकरण अजूनही न्यायालयात आहे. ते संपलेले नाही. जो काही निर्णय व्हायचा तो न्यायालयात होईल. कोणत्याही प्रकारचा अहवाल द्यायला न्यायालय स्वायत्त असल्याने निर्णय आल्यानंतर पुढची प्रक्रिया होईल, असेही पाटील म्हणाले. भारतात परदेशी गुंतवणूक वाढत आहे. चीनमधून बाहेर पडलेल्या उद्योगांनी भारताला प्राधान्य दिल्याचेही त्यांनी सांगितले.

जागा वाटपासाठी भाजपमध्ये एक प्रक्रिया असते. त्यात निर्णय घेणाऱ्यांमध्ये मी नाही. कुणाचे तिकीट अंतिम झाले हे मला माहिती नाही. पहिल्या टप्प्यात केंद्रीय स्तरावरील नेत्यांचे स्थान असेल. १० तारखेच्या आत आम्हाला दौरे संपवायचे असल्याने त्यादृष्टीने देशभरात दौरे सुरू असल्याचे सांगत पाटील यांनी अप्रत्यक्षरीत्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाची तयारी सुरू असल्याचे संकेत दिले. याबरोबरच सर्वच ठिकाणी नेत्यांची जबाबदारी पक्की असल्याचे त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांना आलेल्या धमकीबद्दल विचारले असता, त्याबाबत योग्य ती कारवाई केली जाईल, असे सांगत भुसे आणि थोरवे यांच्यात झालेल्या वादाबाबत बोलण्यास त्यांनी नकार दिला.

टॅग्स :Nashikनाशिकchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपा