शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

जलदिनी केली कंधाणेतील ऐतिहासिक बारवची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 00:48 IST

बागलाण तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने अत्यल्प पर्जन्यमान असल्याने यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील पाण्याचे नैसर्गिक स्रोतही आटले आहेत.

सटाणा : बागलाण तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने अत्यल्प पर्जन्यमान असल्याने यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील पाण्याचे नैसर्गिक स्रोतही आटले आहेत. या पार्श्वभूमीवर गडकिल्ल्यांचे संवर्धन करणाऱ्या दुर्गवीर प्रतिष्ठानचे रोहित जाधव यांनी युवकांसह कंधाणे येथील वरदर शिवारातील होळकर धाटणीच्या ‘बारव’ची ‘जागतिक जलदिना’निमित्त स्वच्छता केली. टंचाईवर मात करण्यासाठी पाण्याचे नैसर्गिक स्रोत जिवंत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकरांनी पाण्याचे महत्त्व ओळखून दुष्काळावर मात करण्यासाठी ठिकठिकाणी सार्वजनिक पाणीपुरवठ्यासाठी बारव (पायविहिरी) बांधल्या. नद्या-नाले बारमाही प्रवाहित राहण्यासाठी या बारव मोठे काम करायच्या. त्यामुळे या बारव जनहिताच्या होत्या.दुर्गवीर प्रतिष्ठानचे रोहित जाधव हे सध्या भूजलशास्त्राचा अभ्यास करीत असून, तालुक्यातील १२८ बारवांचा शोध घेऊन त्यांची नोंद लावण्याचे काम करीत आहे. पाणी हे जीवन असून, बारवांचे महत्त्व व रचना याबद्दल जाधव यांनी कंधाणे येथील वरदर शिवारातील स्थानिक युवकांना माहिती दिली. युवकांनी स्वयंस्फूर्तीने श्रमदानातून ऐतिहासिक विहिरीची साफसफाई केली. आजूबाजूचा कचरा-वाळलेली झाडे बाजूला करून सर्व पायऱ्या मोकळ्या केल्या. विहिरीतील वर्षांनुवर्षे जीर्ण झालेली माती व गाळ काढत असताना साधारण वरील जमिनीपासून तीस फुटांखाली व शेवटच्या पायरीपासून खाली ५ फुटांखाली पाण्याचा जिवंत झरा सापडला. त्यामुळे सर्वांचा आनंद ओसंडून वाहत होता. या पायविहिरीची धाटणी बघता ती १७६५-७५ या कालावधीतील असू शकते. श्रमदानात दादासाहेब बिरारी, सुयोग बिरारी, संदीप बिरारी, समाधान बिरारी, राजवर्धन बिरारी, नितीन सूर्यवंशी, शांताराम बिरारी, गिरीश मांडवडे आदी युवकांनी सहभाग घेतला.ऐतिहासिक विहिरींचे जतनबागलाण तालुक्यात एकूण १२८ पायविहिरी आहेत. त्यांच्यातील गाळ काढून संवर्धन केले तर पाण्याचा नैसर्गिक स्रोत सापडेल. नवे धरण बांधण्याची गरज येणार नाही. शिवार ओले होऊन जंगले वाढतील टंचाईची भीतीदेखील नाहीशी होईल. याकरिता गावागावांतील सर्व आबालवृद्धांनी एकत्र येऊन दुष्काळाविरु द्ध लढा देऊन ऐतिहासिक विहिरींचे जतन व संवर्धन केले पाहिजे.

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणी