शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
3
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
4
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
5
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
6
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
7
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
8
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
9
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
10
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
11
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
12
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
13
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
14
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
15
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
16
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
18
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
19
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
20
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
Daily Top 2Weekly Top 5

जलदिनी केली कंधाणेतील ऐतिहासिक बारवची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 00:48 IST

बागलाण तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने अत्यल्प पर्जन्यमान असल्याने यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील पाण्याचे नैसर्गिक स्रोतही आटले आहेत.

सटाणा : बागलाण तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने अत्यल्प पर्जन्यमान असल्याने यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील पाण्याचे नैसर्गिक स्रोतही आटले आहेत. या पार्श्वभूमीवर गडकिल्ल्यांचे संवर्धन करणाऱ्या दुर्गवीर प्रतिष्ठानचे रोहित जाधव यांनी युवकांसह कंधाणे येथील वरदर शिवारातील होळकर धाटणीच्या ‘बारव’ची ‘जागतिक जलदिना’निमित्त स्वच्छता केली. टंचाईवर मात करण्यासाठी पाण्याचे नैसर्गिक स्रोत जिवंत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकरांनी पाण्याचे महत्त्व ओळखून दुष्काळावर मात करण्यासाठी ठिकठिकाणी सार्वजनिक पाणीपुरवठ्यासाठी बारव (पायविहिरी) बांधल्या. नद्या-नाले बारमाही प्रवाहित राहण्यासाठी या बारव मोठे काम करायच्या. त्यामुळे या बारव जनहिताच्या होत्या.दुर्गवीर प्रतिष्ठानचे रोहित जाधव हे सध्या भूजलशास्त्राचा अभ्यास करीत असून, तालुक्यातील १२८ बारवांचा शोध घेऊन त्यांची नोंद लावण्याचे काम करीत आहे. पाणी हे जीवन असून, बारवांचे महत्त्व व रचना याबद्दल जाधव यांनी कंधाणे येथील वरदर शिवारातील स्थानिक युवकांना माहिती दिली. युवकांनी स्वयंस्फूर्तीने श्रमदानातून ऐतिहासिक विहिरीची साफसफाई केली. आजूबाजूचा कचरा-वाळलेली झाडे बाजूला करून सर्व पायऱ्या मोकळ्या केल्या. विहिरीतील वर्षांनुवर्षे जीर्ण झालेली माती व गाळ काढत असताना साधारण वरील जमिनीपासून तीस फुटांखाली व शेवटच्या पायरीपासून खाली ५ फुटांखाली पाण्याचा जिवंत झरा सापडला. त्यामुळे सर्वांचा आनंद ओसंडून वाहत होता. या पायविहिरीची धाटणी बघता ती १७६५-७५ या कालावधीतील असू शकते. श्रमदानात दादासाहेब बिरारी, सुयोग बिरारी, संदीप बिरारी, समाधान बिरारी, राजवर्धन बिरारी, नितीन सूर्यवंशी, शांताराम बिरारी, गिरीश मांडवडे आदी युवकांनी सहभाग घेतला.ऐतिहासिक विहिरींचे जतनबागलाण तालुक्यात एकूण १२८ पायविहिरी आहेत. त्यांच्यातील गाळ काढून संवर्धन केले तर पाण्याचा नैसर्गिक स्रोत सापडेल. नवे धरण बांधण्याची गरज येणार नाही. शिवार ओले होऊन जंगले वाढतील टंचाईची भीतीदेखील नाहीशी होईल. याकरिता गावागावांतील सर्व आबालवृद्धांनी एकत्र येऊन दुष्काळाविरु द्ध लढा देऊन ऐतिहासिक विहिरींचे जतन व संवर्धन केले पाहिजे.

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणी