शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
3
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
5
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
6
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
7
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
8
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
10
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
11
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
12
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
13
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
15
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
16
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
17
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
18
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
19
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
20
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

मानवी ढवळाढवळ गंगापूरच्या पक्षी जीवनाला घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 00:40 IST

नाशिक : गंगापूर धरण परिसरातील वृक्षसंपदा व गवताळ प्रदेश हा विविध प्रकारच्या दुर्मिळ पक्ष्यांसाठी नैसिर्गक नंदनवन आहे. या परिसराला पक्ष्यांचे महत्त्वाचे अधिवास क्षेत्र असा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरावरील बर्डलाईफ या संस्थेकडून सात वर्षांपूर्वी देण्यात आला आहे. या क्षेत्रात मागील काही मिहन्यांपासून मानवी ढवळाढवळ भूतदयेतून होऊ लागल्याने कावळ्यांची भरमसाठ वाढलेली संख्या तेथील नैसिर्गक जैवविविधतेमध्ये असंतुलन निर्माण करणारी ठरत असल्याचे पक्षी अभ्यासकांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देअन्नसाखळी होतेय असंतुलित : गाठी शेव, चिवडा, बिस्किटे कावळ्यासाठी हानिकारक

अझहर शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गंगापूरधरण परिसरातील वृक्षसंपदा व गवताळ प्रदेश हा विविध प्रकारच्या दुर्मिळ पक्ष्यांसाठी नैसिर्गक नंदनवन आहे. या परिसराला पक्ष्यांचे महत्त्वाचे अधिवास क्षेत्र असा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरावरील बर्डलाईफ या संस्थेकडून सात वर्षांपूर्वी देण्यात आला आहे. या क्षेत्रात मागील काही मिहन्यांपासून मानवी ढवळाढवळ भूतदयेतून होऊ लागल्याने कावळ्यांची भरमसाठ वाढलेली संख्या तेथील नैसिर्गक जैवविविधतेमध्ये असंतुलन निर्माण करणारी ठरत असल्याचे पक्षी अभ्यासकांचे म्हणणे आहे.गंगापूरधरण क्षेत्र हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जलसंपदा विभागाकडून घोषित करण्यात आलेले आहे तरीदेखील काही हौशी लोक पर्यटनाच्या निमित्ताने चोरट्या मार्ग द्वारे या भागात प्रवेश करतात यावेळी फोटोसेशन करताना आपल्याजवळील मानवी खाद्यपदार्थ तेलकट शेवचिवडा, वेफर्स, गाठी शेव, बिस्किटे यांसारखी खाद्यपदार्थ येथील कावळ्यांना खाद्य म्हणून पुरवितात;मात्र हे मानवी खाद्य कावळ्याचे अजिबात नाही, हे लक्षात घेण्याची गरज आहे. या परिसराला महत्वाचे अधिवास स्थळ दर्जा मिळवून देण्यासाठी दिवंगत निसर्ग अभ्यासक व नेचर कॉन्सरवेशन सोसायटी आॅफ नाशिकचे संस्थापक विश्वरूप राहा यांनी विशेष प्रयत्न केले होते.गंगापूर धरणाच्या भिंती वरून मार्गस्थ होताना आजूबाजूला असलेल्या गवताळ प्रदेश व वृक्षसंपदेच्या सानिध्यात विविध प्रकारच्या पक्षी जीवन बहरलेले दिसून येते. या भागात स्थलांतरित पक्षी गवताळ प्रदेशात आढळणारे दुर्मिळ पक्षी हे घरटी करून वास्तव्यास आहे या पक्षांकडून जमिनीवर अंडी घातली जातात मात्र या पक्ष्यांची संख्या कावळ्यांची वाढत्या भरमसाठ संख्येमुळे धोक्यात आली आहे कावळा हा पक्षी इतर पक्ष्यांच्या घरट्यांचे वर हल्ले करतो आण ित्यांची अंडी देखील नष्ट करतो त्यामुळे या भागात कावळ्यांची वाढती संख्या पक्षी जीवनासाठी हात धरू लागली आहे नैसिर्गक जैवविविधतेची अन्नसाखळी संतुलित ठेवण्यासाठी केवळ एका प्रजातीच्या पक्ष्यांची वाढती संख्या पूरक ठरू शकत नाही त्यामुळे नागरिकांनी या भागातील कावळ्यांना सहजरीत्या खाद्यपदार्थ उपलब्ध करून देऊ नये, जेणेकरून गंगापूर क्षेत्रातील नैसिर्गक जैवविविधता अधिक समृद्ध होईल असे एनसीएसएनच्या पक्षीनिरीक्षक पूजा कोठुळे यांचे सांगितले.असे आहे गंगापूरचे पक्षी जीवनपानस्थळ जागेत आढळणारे उघड्या चोचीचा बलाक, मोठा रोहित (फ्लेमिंगो) शराटी, शेकाट्या, विविध प्रकारचे बदक, जलाशय काठावरील लहान पक्षी, मोर, चंडोल, माळिटटवी, हरियाल, गरु ड, सुगरण, स्वर्गीयनर्तक, हळद्या, खंड्या, जंगली मैना, भारद्वाज, लाजरी पाणकोंबडी, वेडा राघू, निलपंख, कापशी घार, किरपोपट, गांधारी, दयाळ, टोईपोपट, हुदहुद, पंकोळी, तारवाली भिंगरी, पांढरा धोबी, पिवळा धोबी, माळिभंगरी यांच्यासह तब्बल दीडशे पक्ष्यांच्या प्रजाती या भागात आढळून येतात.निसर्गात वावरणारे पक्षी, प्राणी हे त्यांच्या निसर्ग रूपी कौशल्याने आपली भूक भागवत असतात. मनुष्य प्राणी जेव्हा निसर्गाच्या सानिध्यात भटकंतीसाठी जातो तेव्हा आकर्षणापोटी निर्माण झालेल्या भूतदयेतून तो आपल्या जवळील खाद्यपदार्थ प्राणी, पक्ष्यांच्या पुढे करतो. मानवी खाद्यपदार्थ पक्ष्यांसाठी हानीकारक ठरु शकते. पोटाचे विकारिकंवा पिसांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. गंगापूर धरण परिसरात असलेली वृक्षसंपदा हे पक्ष्याचे रातथारा (रात्रीचे विश्रांतीस्थळ) आहे.- अनिल माळी, अध्यक्ष, उत्तर महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनपक्षीशास्र, जैवविविधता याबाबतीत सर्वसामान्यांमध्ये अज्ञान असते. कावळ्यांची संख्या एखाद्या नैसिर्गक अधिवासात जेव्हा वाढत जाते तेव्हा तेथील अन्य पक्षीजीवन धोक्यात सापडते. कावळा हा पक्षी अन्यप्रकारच्या गवताळ भागात आढळणार्या पक्ष्यांची अंडी खातो, त्यामुळे जैवसाखळी बिघडून असंतुलन वाढीस लागण्याचा धोका संभवतो. गंगापूर धरण परिसरात आयते मानवी खाद्यपदार्थ कावळ्याला टाकणे म्हणजेच हा धोका ओढवून निसर्गाची हानी करण्यासारखे आहे.- प्रतीक्षा कोठुळे, समन्वयक, नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी आॅफ नाशिक

टॅग्स :gangapur-acगंगापूरDamधरण