शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी, पिकांचं मोठं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 16:43 IST

वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.अनेक शेतकऱ्यांनी भाताची सोंगणी करून, पेंढ्या बांधून ...

वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.अनेक शेतकऱ्यांनी भाताची सोंगणी करून, पेंढ्या बांधून ठेवल्या आहेत तर काहीजणांनी भात सडकून खळ्यावरच डेपो मारुन ठेवला आहे. त्यामुळे भात भिजून त्याची प्रतवारी खालावण्याचा व पर्यायाने भाताला कमी भाव मिळण्याचा धोका निर्माण झाला आहे.

तसेच पशुधनाचा चारा असलेले तणस सडन काळे पडणार आहे, त्यामुळे अशा चाऱ्याला पशुधनही तोंड लावणार नाही. अजून किती दिवस व किती पाऊस पडेल याचा अंदाज नसल्याने गहू, हरभरा, मसूर, वाटाणा अशा खरिपाची लागवड लांबणार आहे. भाजीपाल्यालाही या अवकाळीचा फटका बसणार असून भाजीपाला सडण्याचा व करपा पडण्याची शक्यता असल्याची भीती बेझे येथील शेतकरी बाळासाहेब आबाजी चव्हाण यांनी सांगितले.

बागायती शेतीची ही नुकसान झाले आहे. द्राक्षपिकाला सर्वाधिक फटका बसून या पावसाने द्राक्षांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची माहिती द्राक्ष उत्पादक राजाराम चव्हाण, नवनाथ रामदास बोडके यांनी दिली. महसूल विभाग व कृषी विभाग यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करावे व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

दिवसभर रिपरिप पाऊस, सर्वत्र धुक्याचे आच्छादन व वातावरणातील प्रचंड गारवा यामुळे गर्दीवरही परिणाम झाला असून एरव्ही आकाशात विहार करणारे असंख्य पक्षीसुद्धक दिवसभर आडोशाला बसून असल्याचे दिसत होते.

 

टॅग्स :RainपाऊसNashikनाशिक