शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
5
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
6
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
7
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
8
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
9
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
10
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
11
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
12
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
13
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
14
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
15
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
16
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
17
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
18
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
19
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू

कश्यपि आंदोलकांना कसे रोखायचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 14:51 IST

राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आत्महत्येचे सत्र सुरू झाले असून, जिल्ह्यात दरररोज आंदोलनाच्या घटना घडत आहेत, अशातच कश्यपि धरणग्रस्तांनी आपल्या २५ वर्षापुर्वीच्या मागण्यांच्या प्रश्नावर येत्या १५ आॅगष्ट रोजी कुटंूबासह धरणात उड्या घेण्याचा निर्वाणीचा इशारा दिल्यामुळे तणाव सदृष्य

ठळक मुद्देप्रशासनाला चिंता : यंत्रणेची एकमेकांवर चालढकलदोन वर्षापुर्वी काठोकाठ भरलेल्या धरणात उड्या

नाशिक : दोन वर्षापुर्वी काठोकाठ भरलेल्या धरणात उड्या घेवून पोलीस, महसूल, पाटबंधारे खात्याची दमछाक करणाऱ्या कश्यपि धरणग्रस्तांनी गेल्या दोन वर्षात सुमारे १५० हून अधिक ठिकाणी आपल्या मागण्यांच्या पुर्ततेसाठी पत्रव्यवहार केला परंतु न्याय मिळत नसल्याचे पाहून पुन्हा एकदा धरणात जलसमाधी घेण्याचा निर्धार केल्याने आंदोलकांना रोखायचे कसे असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. दोन दिवसांपुर्वी धरणग्रस्तांची बैठक घेवून त्यांची समजूत काढण्याचा केलेला प्रयत्न पुर्णत: फसल्यामुळे तर प्रशासन व्यवस्था आता एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करू लागली आहे.राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आत्महत्येचे सत्र सुरू झाले असून, जिल्ह्यात दरररोज आंदोलनाच्या घटना घडत आहेत, अशातच कश्यपि धरणग्रस्तांनी आपल्या २५ वर्षापुर्वीच्या मागण्यांच्या प्रश्नावर येत्या १५ आॅगष्ट रोजी कुटंूबासह धरणात उड्या घेण्याचा निर्वाणीचा इशारा दिल्यामुळे तणाव सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या आंदोलनाचा थेट संबंध महापालिकेशी असला तरी, महापालिकेने राज्य सरकारकडे चेंडू टोलविला आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती व प्रशासकीय होणारा खर्च पाहता, कश्यपि धरणग्रस्तांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेणे अशक्य असल्याचे म्हटले आहे, परिणामी महापालिकेचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी बांधण्यात आलेल्या कश्यपि धरणासाठी जागा देणारे तालुक्यातील देवरगाव, धोंडेगाव, गाळोशी, खाड्याची वाडी येथील शेकडो प्रकल्पग्रस्त आंदोलनाच्या पावित्र्यात उतरले आहेत. गेल्या दोन वर्षापासून प्रकल्पग्रस्त आपल्या मागण्यांसाठी पाठपुरावा करीत असून, जिल्हा ते मंत्रालय पातळीवर अनेक बैठका घेण्यात येवून प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्यास तत्वत: मान्यता देण्यात आली परंतु त्याची पुर्तता करण्यात येत नसल्याने आता पुन्हा हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या आठवड्यात प्रकल्पग्रस्तांनी भाजपाचे प्रवक्ते तथा राज्य पुनवर्सन तथा संनियंत्रण समितीचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांची भेट घेवून त्यांच्या कानी हा प्रकार टाकला, त्यांनी या संदर्भातील सविस्तर अहवाल मागविला आहे. परंतु आंदोलकांनी दिलेला अल्टीमेटम अवघ्या दहा दिवसांवर आला असल्याने या प्रश्नी खरोखरच आंदोलन चिघळले तर जबाबदार कोण असा प्रश्न पोलीस, महसूल, पाटबंधारे व महसूल खात्याला पडला आहे. त्यामुळे पोलिसांनी महसूल खात्याकडे, महसूल खात्याने महापालिकेकडे व महापालिकेने पाटबंधारे खात्याकडे आंदोलकांच्या मागण्यांचा चेंडू टोलविण्यास सुरूवात केली आहे. त्यातच महसूल व पोलीस खात्याने प्रकल्पग्रस्तांची भेट घेवून त्यांची समजूत काढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक