शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

प्रदूषित गोदावरीत स्नान तरी कसे करावे

By admin | Updated: February 9, 2015 01:47 IST

प्रदूषित गोदावरीत स्नान तरी कसे करावे

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत देवेंद्र फडणवीस सरकार प्रचंड निष्क्रिय ठरले आहे. सिंहस्थ कामाचे कोणतेही नियोजन नाही असा आरोप करीत गोदावरी प्रदूषण मुक्तीसाठी एक इंचही काम झाले नसल्याचा आरोप करीत त्र्यंबकेश्वर येथील आखाड्यांच्या महंतांनी नाशिकमध्ये कुंभमेळा का घ्यावा? आणि प्रदूषित गोदावरीत स्नान तरी कसे करावे असा प्रश्नही उपस्थित केला आहे. सिंहस्थ कामासाठी मंजूर झालेल्या २३८० करोडमधून दहा करोडदेखील त्र्यंबकेश्वरला खर्च झाले नाहीत असा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. उत्तर प्रदेश आणि अलाहाबाद येथे भरणाऱ्या कुंभमेळ्याबाबत तेथील राज्य सरकारांकडून ज्या तत्परतेने नियोजन केले जाते तशी तत्परता महाराष्ट्र शासनामध्ये नसल्याचा आरोप अखिल भारतीय दर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष सागरानंद आणि श्री निरंजनी आखाड्याचे राष्ट्रीय सचिव नरेंद्रगिरी महाराज यांनी पत्रकार परिषदेत केला. गोदावरीची स्वच्छता आणि घाट सुशोभिकरण्याबाबत कोणतेही नियोजन राज्य शासनाने केलेले नाही. गोदावरीतील सांडपाण्यामुळे पात्र पूर्णपणे प्रदूषित झाले आहे. पाण्यात दोन-दोन इंचांपर्यंतची किडे पडले आहेत. घाण, चिखल आणि दुर्गंधीयुक्त पाण्यातच कुंभ होणार असेल, तर गोदावरीत स्नान करू नका, असे साधुंना सागावे लागेल, असा इशारा अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महंत हरिगिरी यांनी दिला.शहरातील सर्व सांडपाणी गोदावरी पात्रात सोडण्यात आले आहे. वास्तविक त्र्यंबकेश्वर ते नाशिक अशी सुमारे २० किलोमीटर स्वतंत्र सांडपाणी वाहणारी पाइपलाइन शहराबाहेर सोडण्याबाबत आम्ही प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. परंतु याबाबत सरकारकडून कोणतेही उत्तर दिले जात नाही. सिंहस्थ नियोजनात त्र्यंबकेश्वरच्या कोणत्याही आखाड्याला विश्वासात घेतले जात नसल्याचाही आरोप हरिगिरी महाराज यांनी केला. कुंभमेळ्याचे पावित्र्य राखले जाणार नसेल आणि धार्मिक महत्त्व आबाधिक ठेवण्यासाठी राज्य शासनाकडून कोणतीही उपाययोजना होणार नसले तर यंदाचा कुंभमेळा केवळ म्हणजे केवळ पर्यटनच आहे का? असाही सवाल महंत हरिगिरीजी महाराज यांनी उपस्थित केला.