शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
4
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
5
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
6
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
7
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
8
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
9
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
10
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
11
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
12
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
13
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
14
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
15
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
16
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
17
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
18
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
19
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
20
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?

प्रदूषित गोदावरीत स्नान तरी कसे करावे

By admin | Updated: February 9, 2015 01:47 IST

प्रदूषित गोदावरीत स्नान तरी कसे करावे

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत देवेंद्र फडणवीस सरकार प्रचंड निष्क्रिय ठरले आहे. सिंहस्थ कामाचे कोणतेही नियोजन नाही असा आरोप करीत गोदावरी प्रदूषण मुक्तीसाठी एक इंचही काम झाले नसल्याचा आरोप करीत त्र्यंबकेश्वर येथील आखाड्यांच्या महंतांनी नाशिकमध्ये कुंभमेळा का घ्यावा? आणि प्रदूषित गोदावरीत स्नान तरी कसे करावे असा प्रश्नही उपस्थित केला आहे. सिंहस्थ कामासाठी मंजूर झालेल्या २३८० करोडमधून दहा करोडदेखील त्र्यंबकेश्वरला खर्च झाले नाहीत असा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. उत्तर प्रदेश आणि अलाहाबाद येथे भरणाऱ्या कुंभमेळ्याबाबत तेथील राज्य सरकारांकडून ज्या तत्परतेने नियोजन केले जाते तशी तत्परता महाराष्ट्र शासनामध्ये नसल्याचा आरोप अखिल भारतीय दर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष सागरानंद आणि श्री निरंजनी आखाड्याचे राष्ट्रीय सचिव नरेंद्रगिरी महाराज यांनी पत्रकार परिषदेत केला. गोदावरीची स्वच्छता आणि घाट सुशोभिकरण्याबाबत कोणतेही नियोजन राज्य शासनाने केलेले नाही. गोदावरीतील सांडपाण्यामुळे पात्र पूर्णपणे प्रदूषित झाले आहे. पाण्यात दोन-दोन इंचांपर्यंतची किडे पडले आहेत. घाण, चिखल आणि दुर्गंधीयुक्त पाण्यातच कुंभ होणार असेल, तर गोदावरीत स्नान करू नका, असे साधुंना सागावे लागेल, असा इशारा अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महंत हरिगिरी यांनी दिला.शहरातील सर्व सांडपाणी गोदावरी पात्रात सोडण्यात आले आहे. वास्तविक त्र्यंबकेश्वर ते नाशिक अशी सुमारे २० किलोमीटर स्वतंत्र सांडपाणी वाहणारी पाइपलाइन शहराबाहेर सोडण्याबाबत आम्ही प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. परंतु याबाबत सरकारकडून कोणतेही उत्तर दिले जात नाही. सिंहस्थ नियोजनात त्र्यंबकेश्वरच्या कोणत्याही आखाड्याला विश्वासात घेतले जात नसल्याचाही आरोप हरिगिरी महाराज यांनी केला. कुंभमेळ्याचे पावित्र्य राखले जाणार नसेल आणि धार्मिक महत्त्व आबाधिक ठेवण्यासाठी राज्य शासनाकडून कोणतीही उपाययोजना होणार नसले तर यंदाचा कुंभमेळा केवळ म्हणजे केवळ पर्यटनच आहे का? असाही सवाल महंत हरिगिरीजी महाराज यांनी उपस्थित केला.