शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

पुरंदरे यांचा बालसाहित्यिक पुरस्काराने सन्मान सावाना : दिवेश मेदगेने साधला विद्यार्थ्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 00:18 IST

नाशिक : कल्पनेतून सुचणाºया साहित्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभवातून उतरणारे साहित्य अधिक सकस आणि परिपूर्ण असते.

ठळक मुद्देबालसाहित्यिक पुरस्कार २०१७-१८ प्रदान परीक्षण नोंदविलेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार

नाशिक : कल्पनेतून सुचणाºया साहित्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभवातून उतरणारे साहित्य अधिक सकस आणि परिपूर्ण असते आणि बालसाहित्यात अशा प्रकारची परिपूर्णता असली तरच ती लहान मुलांच्या पसंतीस उतरते. असे बालसाहित्य वरवरून सोपे वाटत असले, तरी सोपे लिहिणे अधिक कठीण असून, असे कठीण लेखनही माधुरी पुरंदरे यांनी अगदी सहजसोप्या शैलीत मांडले असल्यानेच त्यांचे बालसाहित्य विद्यार्थ्यांच्या पसंतीला उतरणारे असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री तथा वनाधिपती विनायकदादा पाटील यांनी केले.येथील सार्वजनिक वाचनालयाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात शुक्र वारी (दि. १२) वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या हस्ते ज्येष्ठ बालसाहित्यिक माधुरी पुरंदरे यांना बालसाहित्यिक पुरस्कार २०१७-१८ प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बालसाहित्यिक बाबा भांड, रमेश महाले, बालकलाकार दिवेश मेदगे, प्रा. विलास औरंगाबादकर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कार निवडीसाठी उत्कृष्ट परीक्षण नोंदविलेल्या विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. विनायकदादा पाटील पुढे म्हणाले, मुलांनी काय वाचावे आणि काय वाचू नये हे इतरांकडून सांगितले जाते; परंतु मुलांना काय आवडते हे विचारात घेतले जात नाही. त्यामुळे मुलांची आवडनिवड लक्षात घेऊन या साहित्याची निर्मिती होण्याची अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. शहरातील प्रमुख दहा शाळांमधून सहाशेच्या वर विद्यार्थ्यांनी या उपक्र मात सहभाग नोंदविला. त्यांना बाबा भांड यांचे ‘गोष्ट महाराजाची’, रमेश महाले यांचे ‘अंतराळातील स्टेशन’ आणि माधुरी पुरंदरे यांचे ‘त्या एका दिवशी’ ही पुस्तके वाचनासाठी देण्यात आली होती. ही पुस्तके वाचून मतदानाद्वारे उत्कृष्ट बालसाहित्यिकाची निवड करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी त्यांना भावलेल्या पुस्तकानुसार बालसाहित्यिकास मतदान केले. आणि त्यांना पुस्तक का आवडले, त्यांची लेखनशैली कशी वाटली याबाबतही परीक्षण नोंदविले आहे. यातील सर्वोत्कृष्ट परीक्षण नोंदविणाºया विद्यार्थ्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. संभाजी महाराजांचे चरित्र आणि कर्तृत्व इतके मोठे आहे क ी, त्यांची भूमिका साकारतानाही अंग पेटून उठते, असे मत बालकलाकार दिवेश मेदगे याने व्यक्त केले. यावेळी त्याने नाशिकमधून बालसाहित्यिक पुरस्काराची निवड करणाºया विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी दिवेशने चित्रीकरणादरम्यान आलेले अनुभव व चित्रीकरणासोबत अभ्यास आणि शालेय वेळापत्रकाची घातलेली सांगड याविषयी विद्यार्थ्यांशी दिलखुलास गप्पा मारल्या.