शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

हॉलिडे एक्स्प्रेसला अपघात; दुपारपर्यंत वाहतूक विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:45 IST

बरेली येथून मुंबईकडे जाणाऱ्या ०२०६२ या धावत्या हॉलिडे एक्स्प्रेसच्या एसी डब्याचे चाक तुटल्याने उत्तर महाराष्ट्रातून मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, अनेक एक्स्प्रेस रखडल्या आहेत. मात्र, मोठा अपघात टळला आहे.

नांदगाव : बरेली येथून मुंबईकडे जाणाऱ्या ०२०६२ या धावत्या हॉलिडे एक्स्प्रेसच्या एसी डब्याचे चाक तुटल्याने उत्तर महाराष्ट्रातून मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, अनेक एक्स्प्रेस रखडल्या आहेत. मात्र, मोठा अपघात टळला आहे.नांदगाव रेल्वेस्थानकाजवळ ही घटना आज सकाळी घडली. नादुरुस्त गाडी नांदगावस्थानकात थांबविण्यात आली होती. बरोली-लोकमान्य टिळक टर्मिनस समर स्पेशल या वातानुकूलित गाडीच्या गार्डच्या अगोदरचा डब्याचे चाक तुटून पडले. ही घटना याच बोगीतून प्रवास करीत असलेल्या ओमप्रकाश मिश्रा यांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ साखळी ओढून गाडी थांबविली. प्रवासींच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.मध्य रेल्वेच्या देखभाल दुरुस्ती पथकाने नादुरु स्त बोगी बाजूला करून नांदगावस्थानकातील लूप साइडला गाडी आणली. या घटनेमुळे भुसावळ ते नाशिकदरम्यान धावणाºया अनेक गाड्यांचा खोळंबा झाला. तीन तासांच्या तांत्रिक दुरु स्तीनंतर खोळंबून पडलेली वाहतूक दुपारनंतर पूर्वपदावर आली.आज पहाटे भुसावळ स्थानकातून निघालेली ही गाडी इगतपुरीला थांबणार होती. मात्र पिंपरखेडस्थानक सोडून नांदगाव यार्डजवळ येत असताना डॉक्टरवाडी-बाभूळवाडी दरम्यान पोळ क्रमांक २२० जवळ या गाडीच्या बोगी क्र मांक बी१५च्या एका चाकाचा अर्ध्याहून अधिक भाग घर्षणातून झालेल्या अतिउष्णतेमुळे तुटून पडला. त्यातून मोठा आवाज होत भरधाव वेगात धावत असलेली गाडी हेलकावे खाऊ लागल्याने प्रवाशांत एकच घबराट उडाली.गँगमनची सतर्कता : अपघात टळला, प्रवाशांच्या अंगावर भीतीचा काटा गँगमन वाल्मीक बोराळे यांनीही हा प्रकार बघितला. त्यांनी तुषार पांडे व अन्य रेल्वेच्या वरिष्ठांना सदर घटना सांगितली. दरम्यान, याच बोगीतून प्रवास करीत असलेले ओमप्रकाश मिश्रा यांना सदर घटना लक्षात आली. त्यांनी तत्काळ साखळी ओढून गाडी थांबविली. त्यांनी बोगीचे अर्ध्यात तुटलेले चाक गार्डला दाखविले. गार्डने चालकाला व नांदगाव स्थानकात सदर घटना कळविली. स्थानक प्रबंधक अग्रवाल यांनी त्यासाठी वेगळा प्लॅटफार्म उपलब्ध करून दिला. मनमाडचे वाणिज्य अधिकारी नाना भालेराव यांनी गाडीतल्या सर्व प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी, चहा, बिस्किटे उपलब्ध करून दिले. या गाडीच्या पाठोपाठ गोवा, सचखंड, पटना, महानगरी या गाड्या धावत होत्या. अपघातामुळे या गाड्यांना उशीर झाला. हॉलीडेने मन्याड नदीवरील ब्रिटिशकालीन पूल ओलांडला व काही किमी अंतरावर हा प्रकार घडला. हा अपघात पुलावर घडला असता तर या कल्पनेने प्रवाशांच्या अंगावर भीतीचा काटा उभा राहिला.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेAccidentअपघात