शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नरहरी झिरवाळ यांचे सर्वाधिक मताधिक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 01:16 IST

क्षणाक्षणाला बदलणाऱ्या राजकीय समीकरणांमुळे निर्माण झालेल्या वातावरणात उमेदवारी कोण करणार यापासून सुरू झालेली काटे की टक्कर मतदानापर्यंत कायम राहिली आणि मतांच्या टक्केवारीत अनेकांनी आश्चर्यकरीत्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली.

नाशिक : क्षणाक्षणाला बदलणाऱ्या राजकीय समीकरणांमुळे निर्माण झालेल्या वातावरणात उमेदवारी कोण करणार यापासून सुरू झालेली काटे की टक्कर मतदानापर्यंत कायम राहिली आणि मतांच्या टक्केवारीत अनेकांनी आश्चर्यकरीत्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली. यामध्ये ६० हजारांपेक्षा अधिक मताधिक्य दिंडोरीतून राष्टवादीचे नरहरी झिरवाळ यांनी मिळविले, तर जिल्ह्यात सर्वांत कमी मतांनी माणिकराव कोकाटे निवडून आले. त्यांना २०७२ इतके मताधिक्य मिळाले.विधानसभा निवडणुकीत गुरुवारी (दि.२४) जाहीर झालेल्या निकालात अनेक धक्कादायक निकाल समोर आले, तर काही मतदारसंघामधील चुरशीच्या लढतीचे जिल्'ाचेच नव्हे तर राज्याचे लक्ष लागले होते. राजकीय पक्षांमध्ये झालेली मेगा भरती आणि राजीनामा सत्रामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये कमालीची अस्वस्थता आणि अनिश्चितता निर्माण झालेली होती. त्यामुळे राजकीय पक्ष आणि उमेदवारांसाठीदेखील ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. अशा वातावरणात झालेल्या निवडणुकीत उमेदवारांना मिळालेल्या मतांनी राजकीय समीकरणे बदलली तर राजकीय पक्षांचे वर्चस्वही समोर आले.दिंडोरी मतदारसंघातून नरहरी झिरवाळ यांनी ६० हजारांपेक्षा अधिक मताधिक्य मिळविले त्यांनी भास्कर गावित यांचा पराभव केला. सिन्नर मतदारसंघातून माणिकराव कोकाटे यंदा हे सर्वांत कमी २०७२ मतांनी विजयी झाले. नांदगावमधील लढतही लक्षवेधी ठरली. विद्यमान आमदार पंकज भुजबळ यांना शिवसेनेच्या सुहास कांदे यांनी १३ हजार ८८९ मताधिक्याने पराभूत केले. निफाडच्या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. विद्यमान आमदार अनिल कदम यांचा राष्टÑवादीच्या दिलीप बनकर यांनी १७ हजार ६६८ इतक्या मताधिक्याने पराभव केला. कळवणच्या लढतीत नितीन पवार यांनी आमदार जे. पी. गावित यांना पराभूत करताना ६५९६ मतांची आघाडी घेत विजय मिळविला.चांदवडमधून राहुल आहेर यांनी शिरीष कोतवाल यांच्यावर २६,३४० मताधिक्य मिळविले. यंदा मताधिक्य वाढले आहे. येवल्यात राष्टÑवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी जिल्ह्यात दुसºया क्रमांकाचे मताधिक्य मिळविले. नाशिक पश्चिम पूर्वमधून राहुल ढिकले यांनी आमदार सानप यांचा दहा हजारांच्या मताधिक्याने पराभव केला.नाशिक मध्यमधून देवयानी फरांदे यांनी २८ हजारांच्या फरकाने विजय मिळविला. नाशिक पश्चिममधून सीमा हिरे यांनी ९६२२ मताधिक्य मिळविले, तर इगतपुरीतून हिरामण खोसकर यांनी निर्मला गावित यांंचा ३१,५५५ इतक्या मताधिक्याने पराभव केला. २०१४ मध्ये गावित यांनी १० हजारांचे मताधिक्य घेतले होते.मालेगावी चुरशीच्या लढतीमालेगावचे एमआयएमचे उमेदवार मोहमंद इस्माईल अब्दुल खालीक यांनी ३८,५१९ मताधिक्याने कॉँग्रेसच्या आसिफ शेख यांचा पराभव केला. मालेगाव बाह्यमधून दादा भुसे यांनी कॉँग्रेसच्या तुषार शेवाळे यांच्यावर ४७,६८४ मताधिक्य मिळविले आहे. बागलाणमधूनही आमदार दीपिका चव्हाण यांना पराभव पत्करावा लागला. भाजपच्या दिलीप बोरसे यांनी ३३,६९४ मताधिक्याने चव्हाण यांना मात दिली. २०१४ मध्ये ४१८१ मताधिक्य चव्हाण यांना मिळाले होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019dindori-pcदिंडोरीNarhari Jhariwalनरहरी झिरवाळ