शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
2
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
3
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
4
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
6
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
7
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
8
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
9
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
10
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
11
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
12
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
13
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
14
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
15
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
16
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
17
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
18
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
19
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
20
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 

१९९५ मध्ये सर्वाधिक ४७१४ उमेदवार, तर सर्वाधिक ७१.६९ टक्के मतदानाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 05:33 IST

यंदा वाढणार मतांचा टक्का?; मागील निवडणुकीत ६४.३३% मतदान

नाशिक : शिवसेना-भाजपने पुन्हा एकदा सत्ता राखण्यासाठी बांधलेला चंग आणि विरोधकांचेही पणाला लागलेले अस्तित्व पाहता एकेका मतांची जमवाजमव करताना राजकीय पक्षांसह उमेदवारांची धडपड दिसून येत आहे. त्यामुळे यंदा मतांचा टक्का वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आजवर झालेल्या बारा निवडणुकीत १९९५ मध्ये सर्वाधिक ७१.६९ टक्के मतदान नोंदविले गेले होते. त्यावेळी पुरुषांच्या बरोबरीने महिलांनीही मतदानाचा हक्क बजावत विक्रम घडविला होता. तो अद्यापही मोडला गेलेला नाही. २०१४ मध्ये ६४.३३ टक्के मतदान झाले होते. यंदा त्यात भर पडण्यासाठी निवडणूक आयोगही कामाला लागला आहे.

२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने मतांचा टक्का वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जागृती केली होती. त्याचे परिणाम प्रत्यक्ष मतदानावेळी दिसून आले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही मतांचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न झाले होते. ज्यावेळी परिवर्तनाची चाहूल लागते तेव्हा मतांचा टक्का वाढल्याचा इतिहास आहे. १९७८ मध्ये झालेल्या निवडणुकीत पहिल्यांदा मतांचा टक्का ६७.५९ टक्क्यांवर जाऊन पोहोचला होता. त्यात पुरुष मतदारांची संख्या ७०.४९ टक्के तर महिला मतदारांची टक्केवारी ६४.५५ टक्के इतकी होती. त्यावेळी जनता पक्षाने शंभरहून अधिक जागा मिळविल्या होत्या. त्यानंतर १९९५ मध्ये ७१.६९ टक्के मतदान झाले आणि कॉँग्रेसचे सरकार जावून सेना-भाजप युती सत्तेवर आली. त्यात ७२.६८ टक्के पुरुष तर ७०.६४ टक्के महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

आजवर नोंदवलेले गेलेले हे सर्वाधिक मतदान ठरले आहे. १९६२ मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत ६०.३६ टक्के मतदान झाले होते. तर १९६७ मध्ये ६४.८४ टक्के, १९७२ मध्ये ६०.६३ टक्के, १९८० मध्ये ५३.३० टक्के, १९८५ मध्ये ५९.१७ टक्के, १९९० मध्ये ६२.२६ टक्के, १९९९ मध्ये ६०.९५ टक्के, २००४ मध्ये ६३.४४ टक्के, २००९ मध्ये ५९.५० टक्के मतदान नोंदविले गेले. यंदा १९९५ चा मतदानाचा विक्रम मोडला जाणार काय, याबाबत औत्सुक्य वाढले आहे.

सर्वाधिक उमेदवार

१९९५ मध्ये सर्वाधिक मतदान नोंदविले गेले त्याच निवडणुकीत सर्वाधिक मतदार रिंगणात उतरल्याचाही विक्रम आहे. या निवडणुकीत ४७१४ उमेदवार रिंगणात होते. त्यात ४४६७ पुरुष तर २४७ महिला उमेदवारांचा समावेश होता. त्याखालोखाल मागील निवडणुकीत २०१४ मध्ये ४११९ उमेदवारांनी नशिब आजमावले. त्यात ३८४२ पुरुष तर २७७ महिला उमेदवारांचा समावेश होता.यंदा निवडणुकीत ३२३७ उमेदवार रिंगणात असून त्यात २३५ महिला उमेदवार आहेत. भाजपने सर्वाधिक १७ महिलांना उमेदवारी दिली आहे तर त्याखालोखाल कॉँग्रेस-१५, वंचित बहुजन आघाडी १०, राष्टÑवादी ९, शिवसेना-८, मनसे-५ याप्रमाणे महिला उमेदवारांची संख्या आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Votingमतदान