शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

१९९५ मध्ये सर्वाधिक ४७१४ उमेदवार, तर सर्वाधिक ७१.६९ टक्के मतदानाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 05:33 IST

यंदा वाढणार मतांचा टक्का?; मागील निवडणुकीत ६४.३३% मतदान

नाशिक : शिवसेना-भाजपने पुन्हा एकदा सत्ता राखण्यासाठी बांधलेला चंग आणि विरोधकांचेही पणाला लागलेले अस्तित्व पाहता एकेका मतांची जमवाजमव करताना राजकीय पक्षांसह उमेदवारांची धडपड दिसून येत आहे. त्यामुळे यंदा मतांचा टक्का वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आजवर झालेल्या बारा निवडणुकीत १९९५ मध्ये सर्वाधिक ७१.६९ टक्के मतदान नोंदविले गेले होते. त्यावेळी पुरुषांच्या बरोबरीने महिलांनीही मतदानाचा हक्क बजावत विक्रम घडविला होता. तो अद्यापही मोडला गेलेला नाही. २०१४ मध्ये ६४.३३ टक्के मतदान झाले होते. यंदा त्यात भर पडण्यासाठी निवडणूक आयोगही कामाला लागला आहे.

२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने मतांचा टक्का वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जागृती केली होती. त्याचे परिणाम प्रत्यक्ष मतदानावेळी दिसून आले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही मतांचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न झाले होते. ज्यावेळी परिवर्तनाची चाहूल लागते तेव्हा मतांचा टक्का वाढल्याचा इतिहास आहे. १९७८ मध्ये झालेल्या निवडणुकीत पहिल्यांदा मतांचा टक्का ६७.५९ टक्क्यांवर जाऊन पोहोचला होता. त्यात पुरुष मतदारांची संख्या ७०.४९ टक्के तर महिला मतदारांची टक्केवारी ६४.५५ टक्के इतकी होती. त्यावेळी जनता पक्षाने शंभरहून अधिक जागा मिळविल्या होत्या. त्यानंतर १९९५ मध्ये ७१.६९ टक्के मतदान झाले आणि कॉँग्रेसचे सरकार जावून सेना-भाजप युती सत्तेवर आली. त्यात ७२.६८ टक्के पुरुष तर ७०.६४ टक्के महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

आजवर नोंदवलेले गेलेले हे सर्वाधिक मतदान ठरले आहे. १९६२ मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत ६०.३६ टक्के मतदान झाले होते. तर १९६७ मध्ये ६४.८४ टक्के, १९७२ मध्ये ६०.६३ टक्के, १९८० मध्ये ५३.३० टक्के, १९८५ मध्ये ५९.१७ टक्के, १९९० मध्ये ६२.२६ टक्के, १९९९ मध्ये ६०.९५ टक्के, २००४ मध्ये ६३.४४ टक्के, २००९ मध्ये ५९.५० टक्के मतदान नोंदविले गेले. यंदा १९९५ चा मतदानाचा विक्रम मोडला जाणार काय, याबाबत औत्सुक्य वाढले आहे.

सर्वाधिक उमेदवार

१९९५ मध्ये सर्वाधिक मतदान नोंदविले गेले त्याच निवडणुकीत सर्वाधिक मतदार रिंगणात उतरल्याचाही विक्रम आहे. या निवडणुकीत ४७१४ उमेदवार रिंगणात होते. त्यात ४४६७ पुरुष तर २४७ महिला उमेदवारांचा समावेश होता. त्याखालोखाल मागील निवडणुकीत २०१४ मध्ये ४११९ उमेदवारांनी नशिब आजमावले. त्यात ३८४२ पुरुष तर २७७ महिला उमेदवारांचा समावेश होता.यंदा निवडणुकीत ३२३७ उमेदवार रिंगणात असून त्यात २३५ महिला उमेदवार आहेत. भाजपने सर्वाधिक १७ महिलांना उमेदवारी दिली आहे तर त्याखालोखाल कॉँग्रेस-१५, वंचित बहुजन आघाडी १०, राष्टÑवादी ९, शिवसेना-८, मनसे-५ याप्रमाणे महिला उमेदवारांची संख्या आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Votingमतदान