शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
3
धक्कादायक खुलासा! डॉक्टर शाहीन निघाली दहशतवादी फंडिंगची मास्टरमाईंड; बिटकॉइन आणि हवालातून कोट्यवधींचा व्यवहार
4
आमदार-खासदारांशी कसं वागावे? शासनानं काढलं परिपत्रक; कर्मचाऱ्यांना दिला ९ कलमी कार्यक्रम
5
'मुलगा गोरा कसा?'; संशयी पतीने क्रौर्याची सीमा ओलांडली! बाळाच्या रंगावरून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला अन्.. 
6
एक-एक घुसखोराला हाकलून लावू..; गृहमंत्री अमित शांहाचा हल्लाबोल
7
कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
8
Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
9
JCB वर बसून काढत होते पदयात्रा, अचानक घडलं असं काही, रस्त्यावर धपकन पडले भाजपाचे नेते 
10
Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
11
Sangli: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नवा अध्याय; 'तारा'चा मुक्त संचार सुरू, रेडिओ कॉलरद्वारे ठेवणार लक्ष
12
BMC Election: शरद पवार गट मुंबईत कोणाशी करणार युती, उद्धवसेना की काँग्रेस?
13
Numerology 2026: ६ मूलांकांचे दु:खाचे दिवस सरणार, सुवर्ण काळ येणार; २०२६ला मालामाल-भाग्योदय!
14
उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
15
Smriti Mandhana : समझो हो ही गया... स्मृती मंधानाने केली साखरपुड्याची अनोखी घोषणा, रविवारी होणार विवाह
16
किलर स्माईल ते किलर्स स्माईल! माधुरी दीक्षितची सस्पेन्स सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज
17
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
18
धक्कादायक! शाळेच्या छतावरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवले, नेमके कारण काय?
19
असं काय झालं की, लग्नाला फक्त ३ दिवस बाकी असताना नवरदेवाने संपवले आयुष्य; ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
20
"युट्यूबमधून मी जास्त पैसे कमावते...", फराह खानचा खुलासा; कोरिओग्राफी-दिग्दर्शनाबद्दल म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

१९९५ मध्ये सर्वाधिक ४७१४ उमेदवार, तर सर्वाधिक ७१.६९ टक्के मतदानाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 05:33 IST

यंदा वाढणार मतांचा टक्का?; मागील निवडणुकीत ६४.३३% मतदान

नाशिक : शिवसेना-भाजपने पुन्हा एकदा सत्ता राखण्यासाठी बांधलेला चंग आणि विरोधकांचेही पणाला लागलेले अस्तित्व पाहता एकेका मतांची जमवाजमव करताना राजकीय पक्षांसह उमेदवारांची धडपड दिसून येत आहे. त्यामुळे यंदा मतांचा टक्का वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आजवर झालेल्या बारा निवडणुकीत १९९५ मध्ये सर्वाधिक ७१.६९ टक्के मतदान नोंदविले गेले होते. त्यावेळी पुरुषांच्या बरोबरीने महिलांनीही मतदानाचा हक्क बजावत विक्रम घडविला होता. तो अद्यापही मोडला गेलेला नाही. २०१४ मध्ये ६४.३३ टक्के मतदान झाले होते. यंदा त्यात भर पडण्यासाठी निवडणूक आयोगही कामाला लागला आहे.

२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने मतांचा टक्का वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जागृती केली होती. त्याचे परिणाम प्रत्यक्ष मतदानावेळी दिसून आले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही मतांचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न झाले होते. ज्यावेळी परिवर्तनाची चाहूल लागते तेव्हा मतांचा टक्का वाढल्याचा इतिहास आहे. १९७८ मध्ये झालेल्या निवडणुकीत पहिल्यांदा मतांचा टक्का ६७.५९ टक्क्यांवर जाऊन पोहोचला होता. त्यात पुरुष मतदारांची संख्या ७०.४९ टक्के तर महिला मतदारांची टक्केवारी ६४.५५ टक्के इतकी होती. त्यावेळी जनता पक्षाने शंभरहून अधिक जागा मिळविल्या होत्या. त्यानंतर १९९५ मध्ये ७१.६९ टक्के मतदान झाले आणि कॉँग्रेसचे सरकार जावून सेना-भाजप युती सत्तेवर आली. त्यात ७२.६८ टक्के पुरुष तर ७०.६४ टक्के महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

आजवर नोंदवलेले गेलेले हे सर्वाधिक मतदान ठरले आहे. १९६२ मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत ६०.३६ टक्के मतदान झाले होते. तर १९६७ मध्ये ६४.८४ टक्के, १९७२ मध्ये ६०.६३ टक्के, १९८० मध्ये ५३.३० टक्के, १९८५ मध्ये ५९.१७ टक्के, १९९० मध्ये ६२.२६ टक्के, १९९९ मध्ये ६०.९५ टक्के, २००४ मध्ये ६३.४४ टक्के, २००९ मध्ये ५९.५० टक्के मतदान नोंदविले गेले. यंदा १९९५ चा मतदानाचा विक्रम मोडला जाणार काय, याबाबत औत्सुक्य वाढले आहे.

सर्वाधिक उमेदवार

१९९५ मध्ये सर्वाधिक मतदान नोंदविले गेले त्याच निवडणुकीत सर्वाधिक मतदार रिंगणात उतरल्याचाही विक्रम आहे. या निवडणुकीत ४७१४ उमेदवार रिंगणात होते. त्यात ४४६७ पुरुष तर २४७ महिला उमेदवारांचा समावेश होता. त्याखालोखाल मागील निवडणुकीत २०१४ मध्ये ४११९ उमेदवारांनी नशिब आजमावले. त्यात ३८४२ पुरुष तर २७७ महिला उमेदवारांचा समावेश होता.यंदा निवडणुकीत ३२३७ उमेदवार रिंगणात असून त्यात २३५ महिला उमेदवार आहेत. भाजपने सर्वाधिक १७ महिलांना उमेदवारी दिली आहे तर त्याखालोखाल कॉँग्रेस-१५, वंचित बहुजन आघाडी १०, राष्टÑवादी ९, शिवसेना-८, मनसे-५ याप्रमाणे महिला उमेदवारांची संख्या आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Votingमतदान