शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांमधील खर्चाचा उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 01:25 IST

मागासवगीर्यांच्या सर्वांगीण कल्याणासाठी  सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये नाशिकच्या समाजिक न्याय विभागाने ९१ ते ९९ टक्के खर्च करून गेल्या पाच वर्षांपेक्षा यंदा चांगली कामगिरी केली आहे. 

ठळक मुद्देपाच वर्षांत आलेख उंचावला; ९९.२ टक्के निधी झाला खर्च

नाशिक : मागासवगीर्यांच्या सर्वांगीण कल्याणासाठी  सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये नाशिकच्या समाजिक न्याय विभागाने ९१ ते ९९ टक्के खर्च करून गेल्या पाच वर्षांपेक्षा यंदा चांगली कामगिरी केली आहे. मागील वर्षभरापासून राज्यावर कोरोनाचे संकट असल्याने शासकीय यंत्रणेवरदेखील त्याचा परिणाम झाला आहे. अशा काळातही नाशिक समाजकल्याण विभागाने प्राप्त झालेल्या  निधीचा संपूर्ण खर्च करण्याची सर्वोत्तम कामगिरी बजावली आहे. शासनाकडून चालू वर्षात (२०२०-२१) प्राप्त झालेल्या राज्यस्तरीय योजनांच्या ९१.७७ टक्के निधी, तर अनुसूचित जाती घटक कार्यक्रम जिल्हा वार्षिक योजनेचा प्राप्त झालेला ९९.२२ टक्के निधी विभागाने खर्च केला आहे.सन २०२०-२१ मध्ये राज्य शासनाकडून नाशिक समाजकल्याण विभागास    १७८ कोटी १८ लाख इतका निधी प्राप्त झालेला होता. त्यापैकी विभागाने  १६३ कोटी ५२ लाख खर्च केल्याने ९१.७७ टक्के निधी खर्च झाला आहे, तर जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाकरिता सन २०२०-२१ मध्ये  ३७८ कोटी ५ लाख विभागास प्राप्त झाले होते. त्यापैकी विभागाने ३७५ कोटी ८ लाख ६४ हजार खर्च केल्याने ९९.२२ टक्के निधी खर्च झाला आहे.भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, राजर्षी छत्रपती शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजना, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी शासकीय वसतिगृह योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यास अनुदान योजना, स्वयंसेवी संस्थांना अनुदान योजना, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत पीडित व्यक्तींना अनुदान, तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या योजनांच्या प्रचार प्रसिद्धी या योजनांवर प्रामुख्याने निधी विभागाने खर्च केला आहे. यंदा प्रथमच मोठ्या प्रमाणावर निधीचा विनियोग झाला आहे.

टॅग्स :NashikनाशिकSocial welfare divisional officeसमाजकल्याण उपायुक्त कार्यालय