शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

नाशिकमध्ये हेल्मेट सक्ती नाही, म्हणून घातले नाही; मंत्री गिरीश महाजनांचा अजब युक्तीवाद...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 15:07 IST

आज स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्यावतीने तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

अनेक ठिकाणी हेल्मेट सक्ती आहे, अनेक ठिकाणी ती पाळली जात नाही. तसेच पुण्यासारखी अशी बरीच शहरे आहेत जिथे हेल्मेट सक्तीच नाहीय. जिथे सक्ती आहे तिथे आपला जीव वाचविण्यासाठी नाही तर पोलिसांपासून वाचण्यासाठी हेल्मेट घातले जाते. तसाच काहीसा रोख असलेला युक्तीवाद आज शिंदे-फडणवीस सरकारचे मंत्री गिरीष महाजन यांनी केला आहे. 

हेल्मेट खरेदीवेळी या गोष्टी नक्की पहा; दंड तर वाचेलच पण...

आज स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्यावतीने तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे ग्रामविकास आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत ही बाईक रॅली पार पडली. मात्र, या रॅलीत वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले. 

रॅलीत सहभागी झालेले मंत्री गिरीश महाजन तसेच कार्यकर्त्यांनी डोक्यावर हेल्मेट न घालताच दुचाकी चालवली. यावर मंत्री गिरीश महाजन यांना माध्यमांनी प्रश्न विचारला.  तेव्हा नाशिकमध्ये हेल्मेट सक्ती नाही, म्हणून हेल्मेट घातले नाही, अशी प्रतिक्रिया महाजन यांनी दिली. सगळेच लोक विनाहेल्मेट आहेत, म्हणून हेल्मेट घातले नाही, असे महाजन म्हणाले. 

आता हेल्मेट न वापरणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन काही एकटे नाहीत. यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील विनाहेल्मेट दुचाकी चालविल्या आहेत. आता हेल्मेट हे कशासाठी घालायचे? सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी घालायचे की नाही, सामान्यांनाच सक्ती कशासाठी आदी प्रश्न हे अनेकदा लोकांना जिवापेक्षा मोठे वाटतात. परंतू, जेव्हा अपघाताची वेळ येते आणि मार लागतो किंवा जीव जातो तेव्हा लोकांना हेल्मेट असले तर... असा पश्चाताप होतो. 

 

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजन