शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

दमदार पावसाने शेतकरी सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 10:51 PM

मानोरी : मानोरी बुद्रुक परिसरात शुक्रवारी, दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे, तर खरीप हंगामातील मका, सोयाबीन तसेच टमाटा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देमानोरी परिसर । खरीप हंगामातील मका, सोयाबीन, टमाटा पिकांना जीवदान

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरी : मानोरी बुद्रुक परिसरात शुक्रवारी, दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे, तर खरीप हंगामातील मका, सोयाबीन तसेच टमाटा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे.पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसानंतर शेतकऱ्यांनी मका, सोयाबीन पेरणीसाठी मोठी धडपड केली तर पेरण्या झाल्यानंतर सुमारे दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाने सर्वत्र दडी मारल्याने परिसरातील पिके धोक्यात आली होती. मात्र, आताच्या पावसाने खाद्य टाकणे, खुरपणी, निंदणी, कोळपणी आदी कामांना आता वेग येणार असून, बळीराजा सुखावल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी मका लष्करी अळीच्या विळख्यात अडकल्याने शेतकरीवर्ग चिंतेत आहे. लष्करी अळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकरी मक्यावर औषध फवारणी करत आहेत. टमाटा लागवडीनंतर पाऊस गायब झाल्याने टमट्याची रोपे करपण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र पाऊस आल्याने टमाटा पिकाची लागवड पुन्हा तरारली असून, रोपे हिरवीगार झाली आहेत. अनेक ठिकाणी सोयाबीन उगवली नसल्याने दुबार पेरणी करण्याची वेळ बळीराजावर आली असून, काही ठिकाणी सोयाबीन तुरळक उगवल्याने हजारो रु पयांचा खर्च पाण्यात गेल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.नांदगाव तालुक्यात जोरदार पाऊसनांदगाव : तालुक्यात चौथ्या दिवशी पावसाने हजेरी लावल्याने पेरणीनंतर दुसºया व तिसºया आठवड्यात असलेली पिके जोमदार असून, काही ठिकाणी कोळपणी झाली आहे. शेतात पाणी साचले असून, नाले व छोट्या बंधाºयात पाणी आले आहे. श्री क्षेत्र नस्तनपूर मंदिर परिसरात मंदिराच्या मुख्य गाभारºयात पावसाचे पाणी जमले. पिंपरखेड, न्यायडोंगरी नस्तनपूर आदी भागातले ओहोळ नाले तुडुंब भरून वाहिले. हातगाव दोनचा ८० दशलक्ष घनफूट क्षमतेचा लघुबंधारा भरण्याच्या मार्गावर आहे. तालुक्यातील विविध भागात पावसाच्या जोरदार सरींनी कमीअधिक फरकाने सर्वदूर हजेरी लावल्याने शेतकरीवर्ग आनंदी झाला आहे. सहा ठिकाणी सहा मंडळात असलेल्या पर्जन्यमापन यंत्रात बुधवारी रात्री दोन तासात झालेल्या पावसाची सरासरी १७ मिमी अशी नोंद झाली. सर्वाधिक पावसाची नोंद नांदगाव शहरातील पर्जन्यमापन यंत्रात ४४ मिमी असून, मनमाडला ३६ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली. मनमाड व नांदगाव येथे चांगला पाऊस झाला असला तरी भौगालिक दृष्ट्या सरळरेषेतील अंतरावर असणाºया हिसवळ येथील पर्जन्यमापन यंत्रात फक्त एक मिली एवढीच पावसाची नोंद दर्शविण्यात आली आहे. असाच काहीसा प्रकार जातेगाव वेहेळगाव या महसुली मंडळात झाला असून, नस्तनपूर-न्यायडोंगरी-सावरगाव या महसुली सजेत असणाºया गावांची नोंद करणाºया जातेगावच्या पर्जन्यमापन यंत्रात अवघ्या तीन मिमीची तर वेहेळगावला ती पाच मिमी अशी नोंद झाली.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस