शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
2
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
3
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
5
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
6
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
7
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
9
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
10
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
11
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
12
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
13
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
14
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
15
आता पहिलीपासूनच शिका शेती; शालेय अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने कृषी विषयाचा समावेश
16
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
17
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
18
चिंताजनक ‘लडाख फाइल्स’! सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात सडविणे दिसते तितके सोपे नाही
19
ट्रम्प, जिमी किमेल आणि गुदगुल्यांचा ‘खंजीर’! ही एकी जगभरातील माध्यमांसाठी एक संदेशच...

परतीचा बेफाम पाऊस, रस्त्यातील खड्डे आणि प्रशासनाला लागले फटाके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2022 23:59 IST

यंदाचा पावसाळा वेगळाच आहे. प्रत्येक महिन्यात दमदार पाऊस कोसळला. वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस सर्वच तालुक्यांमध्ये झाला आहे. ढगफुटीसदृश, अतिवृष्टी, मुसळधार अशा प्रकारचा पाऊस अनेक ठिकाणी झाला. राज्य सरकारने तिजोरी खुली केली असल्याने अतिवृष्टीग्रस्तांना मदतीचा हात दिला जात आहे. पण पाऊस एवढा आहे की, खरीप हंगाम पाण्यात गेला. हाताशी आलेली पिके सडली आहेत. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी मनसे नेते राज ठाकरे यांनी केली आहे. मदत देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकच्या दौऱ्यात केली. अतिवृष्टीमुळे रस्ते, महामार्गांवर प्रचंड खड्डे पडले आहेत. यंत्रणा खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेते आणि लगेच पाऊस कोसळतो, अशी स्थिती झाल्याने प्रशासन हतबल झाले आहे. पाऊस थांबत नाही आणि दुरुस्ती करता येत नाही, अशी गत प्रशासनाची झाली आहे. खड्ड्यांनी त्रस्त झालेल्या जनतेने आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्याचे फटके मालेगावात तसेच नाशिक-मुंबई रस्त्याची देखभाल करणाऱ्या न्हाईला बसले.

ठळक मुद्देमहामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी आजी-माजी पालकमंत्र्यांचा अल्टिमेटम फलदायी ठरणार काय?टोलनाका बंद होणार?मालेगावातील नुरा कुस्तीग्रामपंचायतीतही घराणेशाहीयुवराजांची राजकीय भूमिका

मिलिंद कुलकर्णी यंदाचा पावसाळा वेगळाच आहे. प्रत्येक महिन्यात दमदार पाऊस कोसळला. वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस सर्वच तालुक्यांमध्ये झाला आहे. ढगफुटीसदृश, अतिवृष्टी, मुसळधार अशा प्रकारचा पाऊस अनेक ठिकाणी झाला. राज्य सरकारने तिजोरी खुली केली असल्याने अतिवृष्टीग्रस्तांना मदतीचा हात दिला जात आहे. पण पाऊस एवढा आहे की, खरीप हंगाम पाण्यात गेला. हाताशी आलेली पिके सडली आहेत. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी मनसे नेते राज ठाकरे यांनी केली आहे. मदत देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकच्या दौऱ्यात केली. अतिवृष्टीमुळे रस्ते, महामार्गांवर प्रचंड खड्डे पडले आहेत. यंत्रणा खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेते आणि लगेच पाऊस कोसळतो, अशी स्थिती झाल्याने प्रशासन हतबल झाले आहे. पाऊस थांबत नाही आणि दुरुस्ती करता येत नाही, अशी गत प्रशासनाची झाली आहे. खड्ड्यांनी त्रस्त झालेल्या जनतेने आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्याचे फटके मालेगावात तसेच नाशिक-मुंबई रस्त्याची देखभाल करणाऱ्या न्हाईला बसले.टोलनाका बंद होणार?नाशिक-मुंबई महामार्गावरील खड्ड्यांचा विषय १० ऑक्टोबरला झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत गाजला. महामार्गावर खड्डे पडल्यास ७२ तासांत देखभाल व दुरुस्तीचे काम असणाऱ्या टोल कंपनीच्या यंत्रणेने बुजविण्याची तरतूद असल्याची आठवण पालकमंत्री दादा भुसे यांनी करुन दिली. १५ दिवसांत महामार्गावरील खड्डे न बुजविल्यास टोलनाके बंद करण्याचा अल्टिमेटम पालकमंत्र्यांनी दिला आहे. दोन दिवसांनी अल्टिमेटमची मुदत संपणार आहे. मात्र खड्डे काही बुजवले गेले नाही, हे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या पाहणी दौऱ्यात आढळून आले. त्यांनीही अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. त्यांनीही ३१ ऑक्टोबरचा अल्टिमेटम दिला आहे. खड्डे न बुजविल्यास टोलनाके बंद करण्याचा इशारा दिला आहे. आजी आणि माजी पालकमंत्री यांनी टोकनाक्यांविषयी एक सूर लावल्याने खरोखर नाके बंद होतात की खड्डे बुजविले जातात, याची उत्सुकता सर्वसामान्यांना आहे.मालेगावातील नुरा कुस्तीमालेगावात आमदार मौलाना मुफ्ती व माजी आमदार रशीद शेख यांच्यात संघर्ष सुरू आहे. आगामी महापालिका निवडणूक आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून या दोघांच्या संघर्षाकडे पाहता येईल. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेवर असतानाही रशीद शेख व तत्कालीन महापौर ताहेरा शेख यांनी कॉंग्रेस सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे घड्याळ हातावर बांधले. मात्र सत्ता परिवर्तन घडले आणि समीकरण बदलले. आमदार मुफ्ती यांनी मंत्री दादा भुसे यांच्याशी जुळवून घेतले. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी थेट शिवसेनेच्या व्यासपीठावर गेले. विकासकामांसाठी सत्ताधाऱ्यांशी जुळवून घेण्यात गैर काय, असा टीकाकारांना प्रतिसवाल त्यांनी केला. रशीद शेख यांच्या राजकीय कारकिर्दीला ४० वर्षे पूर्ण झाली म्हणून नागरी सत्काराला अजित पवार व जयंत पाटील आले. त्यापाठोपाठ आमदारांनी महापालिकेच्या प्रश्नांवरून रास्ता रोको आंदोलन केले. महापालिका आयुक्तांवर गटारीचे पाणी फेकण्याचा प्रकार घडला. जनतेच्या हितासाठी ही लढाई आहे की, स्वत:चे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी नुरा कुस्ती चालली आहे, हे यथावकाश लक्षात येईल.ग्रामपंचायतीतही घराणेशाहीघराणेशाहीचा मुद्दा पंतप्रधानांनी उपस्थित केल्यापासून त्याची चर्चा गल्ली ते दिल्ली होत आहे. चर्चा होत असली तरी हा अपरिहार्य विषय असल्याच्या मानसिकतेत राजकीय नेते व पक्ष असल्याचे चित्र नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत दिसून आले. सत्ता कोणत्याही स्थितीत आपल्या आणि आपल्या कुटुंबीयांच्या ताब्यात रहावी, यासाठी नेते प्रयत्नशील राहिले. वर्षानुवर्षे गड राखला जातो, याचा अर्थ परिस्थितीनुरूप हे नेते भाकरी फिरवत आहेत, असाच काढला जातो. पेठ तालुक्याचे उदाहरण घेऊया. भास्कर गावीत यांचे पुत्र श्याम हे राजबारी, दामू राऊत यांचे पुत्र दिलीप हे माळेगाव, विशाल जाधव यांच्या पत्नी गीता या आसरबारी या गावातून निवडून आल्या. शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे मातब्बर नेत्यांची ही स्थिती आहे. इगतपुरीत रतनकुमार इचम, ज्ञानेश्वर लोंढे, पांडुरंग खताळे, तर सुरगाण्यात जे. पी. गावित व आमदार नितीन पवार यांनी आपापले गड राखले.युवराजांची राजकीय भूमिकाराज्यसभेची संधी हुकल्यानंतर राजकीय पक्षांपासून फटकून वागणाऱ्या युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आता जुळवून घेण्याचे ठरविलेले दिसतेय. या आठवड्यात कोल्हापुरात हसन मुश्रीफ या राष्ट्रवादी नेत्यासोबत व्यासपीठावर दिसलेले युवराज दोन दिवसांनी नाशकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपस्थित होते. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आणि रोजगार व प्रशिक्षणाचा विषय मार्गी लावायचा असेल तर सत्ताधारी आणि विरोधक या दोघांची मदत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे युवराजांनी हे पाऊल उचलले असावे. स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्य सुरू केले आहे. राज्यभर फिरून संवाद व संपर्क अभियान राबविले आहे. त्यांच्या यापूर्वीच्या राज्यव्यापी दौऱ्याने मराठा समाजात आरक्षणाप्रती जनजागृती केली. त्यातून मोठे आंदोलन उभे राहिले.

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसMalegaonमालेगांवgram panchayatग्राम पंचायतGovernmentसरकार