ठळक मुद्देअचानक आलेल्या पावसाने चांगलीच तारांबळ उडाली.
पेठ : शहर व परिसरात गुरुवारी (दि.२४) दुपारी जोरदार पावसाने हजेरी लावली.
कोरोना निर्बंध शिथिल झाल्याने प्रथमच बाजारपेठेत दाखल झालेले ग्राहक व व्यावसायिकांची या अचानक आलेल्या पावसाने चांगलीच तारांबळ उडाली. हा पाऊस भात व नागलीच्या रोपांसाठी उपयुक्त असल्याने शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे.