शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मनमाडमध्ये मुसळधार पाऊस, 350 नागरिकांचे स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 09:30 IST

पांझन नदीला आलेल्या पुराच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने नागरी वस्तीत पाणी शिरले.

मनमाड /नाशिक - मनमाडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. अतिवृष्टीमुळे 350 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. शहरात शुक्रवारी रात्री दोननंतर पांझन नदीला आलेल्या पुराच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने नागरी वस्तीत पाणी शिरले. या पुरामध्ये दोन दुचाकी, एक रिक्षा, पाच टपऱ्या वाहून गेल्या आहे. काही चारचाकी वाहने वाहिली असली तरी ती कडेला अडकल्याने सापडली आहेत. इदगाह , टकार मोहल्ला, आंबेडकर चौक भागातील नागरिकांना या पुराचा मोठा फटका बसला आहे.नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे तर अनेक घरांच्या पुढे ठेवलेल्या पाण्याच्या टाक्या वाहून गेल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, शहराच्या दक्षिण व उत्तर भागाला जोडणाऱ्या इदगाह पूल वगळता अन्य सर्व पुलांवरून पाणी गेल्याने संपर्क तुटला होता. पालिकेचे मुख्यधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका कर्मचाऱ्यांच्या पथकाने तात्काळ मदत कार्य सुरू केले.या भागातील  साडेतीनशे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. या नागरिकांची गुरुद्वारा, एच ए के हायस्कुल, मराठी शाळा आदी ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात आली. पालिकेचे अग्निशमन केंद्र व गणेश कुंड सहा ते सात फूट पाण्याखाली होते. नदीकाठच्या दत्तमंदिर परिसरात पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. शहराशी संपर्क सुरू असलेला एकमेव इदगाह पुलाला हादरे बसत असल्याने हा पूलसुद्धा रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे. 

टॅग्स :RainपाऊसNashikनाशिकfloodपूर