शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अभोणा परिसरात तासभर जोरदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 00:30 IST

दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर शनिवारी (दि.२५) दुपारी ४ वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह शहर व परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे तासभर कोसळलेल्या या पावसाने कोमेजून गेलेल्या खरिपाच्या पिकांना दिलासा मिळणार आहे.

ठळक मुद्देपिकांना जीवदान : बळीराजा आनंदला; चणकापूर धरणात ५२३ दलघफू साठा

अभोणा : दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर शनिवारी (दि.२५) दुपारी ४ वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह शहर व परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे तासभर कोसळलेल्या या पावसाने कोमेजून गेलेल्या खरिपाच्या पिकांना दिलासा मिळणार आहे.जूनच्या प्रारंभीच निसर्ग चक्रीवादळामुळे सलग तीन दिवस पावसाची संततधार सुरू होती. या पावसावर शेतकऱ्यांनी मका, बाजरी, भुईमूग, सोयाबीन आदी पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली, तर पश्चिम आदिवासी पट्ट्यात भात, नागलीची रोपे टाकण्यात आली होती. समाधानकारक पावसाने खरीप पिकांसह रोपेही जोमात होती. मात्र गत पंधरवड्यापासून पावसाने ओढ दिल्याने पिके वाळू लागली होती.भात, नागलीची रोपेही पिवळी पडू लागल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली होती. मात्र शनिवार झालेल्या पावसाने शेतकरी सुखावला आहे. दरम्यान, शनिवारी १८ मिमी पावसाची नोंद झाली, तालुक्यात आत्तापर्यंत २७९ मिमि पाऊस झाला. चणकापूर धरणक्षेत्रात २५ मिमी पाऊस झाला असून, आत्तापर्यंत २७२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आजमितीस धरणात ५२३ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. अभोणा मंडलामध्ये ३५ मिमी पाऊस पडला.या पावसाने शहरातील सर्वच रस्ते जलमय झाले होते. गावातील सिमेंटच्या रस्त्याला ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. ग्रामपालिका प्रशासनाने तत्काळ खड्डे बुजवावेत, अशी मागणी नागरिकांनी केलीआहे.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊसFarmerशेतकरी