शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
3
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
4
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
5
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
6
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
7
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
8
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
9
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
10
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
11
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
12
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
13
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
14
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
15
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
16
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
17
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
18
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
19
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
20
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती

हृदयद्रावक! जनावरांना वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रकची बाईकला धडक; अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 16:53 IST

टनेनंतर संतप्त नागरिकांनी काही काळ रास्ता रोको आंदोलन केले.

Nashik Accident: मनमाड - चांदवड रस्त्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर सोमवारी सायंकाळी मोकाट जनावरांना वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दोन्हीही विद्यार्थी मनमाड येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात दहावी इयत्तेत शिकत होते. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी काही काळ रास्ता रोको आंदोलन केले.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी ६:०० वाजेच्या सुमारास मक्याचा भुसा घेऊन जाणारा सोळा चाकी ट्रक (क्रमांक एमएच १८ बीजी ६६८१) चांदवडहून मनमाडकडे येत असताना मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर रस्त्यावर ठिय्या मांडून बसलेली मोकाट जनावरे अचानक उठली. या जनावरांना वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रकने पुढे जाणाऱ्या दुचाकीला (क्रमांक एमएच ४१ एन १३९८) जोरदार धडक दिली. वैष्णवी प्रवीण केकाण (१५) आणि आदित्य मुकेश सोळसे (१५, दोघेही रा. हनुमाननगर, मनमाड) हे डोणगाव रस्त्यावरील स्वामी विवेकानंद विद्यालयातील दहावीचे विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर दुचाकीवरून जात होते. दुचाकीला ट्रकने जबर धडक दिल्याने अपघातात या दोन्ही विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत ट्रकचालक राकेश दादाजी खैरनार यास ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दोन्ही मृतदेह विच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. सदर अपघात रस्त्यावरील मोकाट जनावरांमुळे घडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, मोकाट जनावरांचा प्रश्न त्यानिमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला आहे. पालिका प्रशासनाने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.

शाळेत शोककळा 

दोन्ही विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर शाळेवरही शोककळा पसरली. स्वामी विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक जे. डी. साळुंखे यांनी हा प्रसंग अतिशय दुर्दैवी असल्याचे सांगत मंगळवारी (दि. ७) शाळेचे कामकाज बंद ठेवून विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार असल्याचे सांगितले. परिसरातील नागरिक राजेंद्र माळी यांनी सदर रस्त्याचे काम अपूर्ण स्थितीत असल्याचे सांगत दोन्ही बाजूने होणाऱ्या अतिक्रमणामुळेही अपघातांमध्ये भर पडत असल्याचे निदर्शनास आणून दिले. 

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात