शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

हृदयद्रावक! पुराच्या पाण्यात शेती बुडाली, पाहून धक्का बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2023 11:54 IST

Haryana Flood News : हरयाणामध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. घरादारापासून शेतांपर्यंत सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. याचपुरादरम्यान, एक हृदयद्रावक घटना घडली आहे.

हरयाणामध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. घरादारापासून शेतांपर्यंत सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. याचपुरादरम्यान, एक हृदयद्रावक घटना घडली आहे. चेतंग नदीला पूर आल्याने यमुनानगर जिल्ह्यातील सुखदासपूर गावातील शेती पाण्याखाली बुडाली आहे. गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरही चार फूट पाणी भरले आहे. या पुरामुळे शेती पाण्यासाठी जाऊन नुकसान झाल्याने धक्का बसून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.

इंद्राज असं या ५० वर्षीय शेतकऱ्याचं नाव असून, पूर आल्याने त्यांना आपल्या शेतातील पिकांबाबत चिंता वाटत होती. ते शेतामध्ये गेले असता सगळं पिक पुराच्या पाण्याखाली गेलेलं दिसलं. सगळं पिक वाया गेल्याचं पाहून त्यांना धक्का बसला. घरी पोहोचेपर्यंत त्यांची प्रकृती बिघडली. रस्त्यावर पुराचं पाणी भरलेलं असल्याने कुटुंबीय त्यांना ट्रॅक्टरवरून कसेबसे डॉक्टरकडे नेण्यात आले. मात्र डॉक्टरकडे पोहोचेपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.

गावचे सरपंच भूपिंदर सैनी यांनी सांगितले की, गावाजवळून चेतंग नदी वाहते. या नदीला पूर आल्याने शेतांमध्ये पाणी भरलं होतं. दरम्यान, पुरामुळे इंद्राज यांच्यावर अंत्यसंस्कार करतानाही अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अंत्यसंस्कारासाठी ज्या नातेवाईकांना यायचं होतं त्यांना ट्रॅक्टर ट्रॉलीच्या मदतीने सरस्वतीनगर येथून सुखदासपूर येथे आणण्यात आलं. इंद्राज यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. तपासानंतर मृत्यूच्या खऱ्या कारणांचा शोध लागणार आहे.  

टॅग्स :floodपूरHaryanaहरयाणाFarmerशेतकरी