शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

ओटीपोटात सतत दुखतंय, गर्भाशयात गाठ तर नाही ना?; 'या' महिलांना सर्वाधिक धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 14:42 IST

नाशिक - गर्भाशयातल्या गाठी, ही महिलांमध्ये दिसणारी एक महत्त्वाची समस्या आहे. बहुतेकवेळा गर्भाशयात गाठी असल्या तरी त्यांची बाह्य लक्षणे नसतात.त्यामुळे ...

नाशिक - गर्भाशयातल्या गाठी, ही महिलांमध्ये दिसणारी एक महत्त्वाची समस्या आहे. बहुतेकवेळा गर्भाशयात गाठी असल्या तरी त्यांची बाह्य लक्षणे नसतात.त्यामुळे बरेचदा त्याचं वेळेत निदान होत नाही. अनेकवेळा वेगळ्याच आजारासाठी रुग्णाची तपासणी केल्यावर गर्भाशयात गाठी असल्याचं डॉक्टरांना लक्षात येते. त्यामुळे ओटीपोटात सतत दुखत असल्यास गर्भाशयात गाठ तर नाही ना? याची खातरजमा तज्ज्ञाच्या सल्ल्याने करून घेणे आवश्यक असते.

मासिक पाळीच्या दिवसात अतिरक्तसाव, पोटात तीव्र वेदना, वेळेआधी पाळी येणे अशा समस्या अनेक कारणांनी निर्माण होऊ शकतात. फायब्रॉइड्स अर्थात गर्भाशयातील गाठी हेदेखील त्यापैकी एक कारण असू शकते. गर्भाशयात असणाऱ्या गाठी औषधे आणि शस्त्रक्रिया करून काढता येतात. मासिक पाळीत खूप जास्त रक्त जात असेल, रुग्ण अशक्त झाल्यास अशा रुग्णांना तातडीने उपचार करावे लागतात. पाळीत खूप जास्त रक्त जात नसेल तर अशावेळी फक्त औषधोपचारही पुरेसे असतात. बहुतेकवेळा रुग्णांना हार्मोन नियंत्रणाची औषधे देऊन उपचार केले जातात. मात्र, काही रुग्णांना ऑपरेशनशिवाय दुसरा पर्याय नसतो. शस्त्रक्रियेत फक्त गाठ काढणे ही छोटी शस्त्रक्रिया असते. तर दुसरी गर्भाशयच काढून टाकण्याची दुसरी शस्त्रक्रिया थोडी अवघड आणि खर्चिक असते.

या वयातील महिलांना सर्वाधिक धोका

सुमारे ३० ते ५० वर्ष वयोगटातल्या महिलांमध्ये गर्भाशयात गाठी होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. लठ्ठ महिलांच्या शरीरात एस्ट्रोजेन संप्रेरकाचं प्रमाण अधिक असतं आणि त्यामुळे त्यांच्या गर्भाशयात गाठी होण्याचं प्रमाणही अधिक असतं. ज्या महिलांना कधीच गर्भधारणा झालेली नाही, अशा स्त्रियांमध्येही ही समस्या आढळून येते. विभिन्न वयोगटात आणि स्थितीत या गाठींचा आकार शेंगदाण्यापासून ते अगदी कलिंगडाएवढासुद्धा असू शकतो. अर्थात गाठ जेवढी मोठी तिचा त्रास तेवढाच जास्त होतो. गर्भाशयातल्या कुठल्या भागात गाठ आहे, यावरून ती कुठल्या प्रकारची आहे, हे ठरते. बहुतांशवेळा गर्भाशयाच्या त्वचेवर गाठी येतात.

या महिलांमध्ये प्रमाण अधिक

आई आजीला फायब्रॉइड्सचा त्रास असल्यास मुलगी, नातीलाही हा त्रास होऊ शकतो. गर्भधारणेची क्रिया विस्कळीत झालेली असल्यास, इस्ट्रोजेनचा प्रभाव प्रोजेस्टेरॉनपेक्षा जास्त असल्यास म्हणजेच अविवाहित स्त्रिया, वंध्यत्व असलेल्या स्त्रिया, एखादेच मूल असलेल्या स्त्रियांमध्ये फायब्रॉइड्स अधिक प्रमाणात आढळून येतात.

पस्तीशीनंतरच गर्भाशय काढण्याचा पर्याय

गाठींची संख्या जास्त असतील, मोठ्या असतील तर कधी शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसतो. स्त्रीचे वय ३५ पेक्षा कमी असेल आणि मूल व्हावे अशी इच्छा असेल तर केवळ गाठी काढून गर्भाशय तसेच ठेवले जाते. पस्तिशी उलटलेल्या स्त्रीमधील गर्भाशय काढून टाकणे योग्य ठरते.कोणत्याही रिपोर्टमुळे घाबरून जाऊ नये. अनेक स्त्रियांमध्ये गाठींचा काहीच त्रास होत नसेल तर शस्त्रक्रिया करण्याची गरज नसते. मात्र त्यावर लक्ष ठेवून त्या वाढत नाहीत हे पाहावे. अनेक स्त्रियांमध्ये या गाठी वाढत नाहीत उलट रजोनिवृत्तीनंतर आक्रसतात. त्यामुळे शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय पूर्ण विचारांती घ्यावा. दुसऱ्या बाजूला खूप त्रास होऊनही आणि पोटाला गाठी लागत असूनही भीती, संकोच आणि निष्काळजीपणामुळे दुखणे अंगावर काढू नये. गाठी खूप वाढल्यास शस्त्रक्रिया गुंतागुंतीची होते.

-------------------------

टॅग्स :Healthआरोग्यWomenमहिला