शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

अन्न पाण्याच्या शोधार्थ हरणाची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 5:54 PM

राजापूर : राजापूर व परिसरात मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी काळवीट व हरणांच्या संकेत समाधानकारक वाढ झाली असून ममदापूर संवर्धन राखीव झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूच्या प्रमाणात देखील घट झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

ठळक मुद्देराजापूर : यावर्षी काळवीट व हरणांच्या संकेत समाधानकारक वाढ

राजापूर : राजापूर व परिसरात मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी काळवीट व हरणांच्या संकेत समाधानकारक वाढ झाली असून ममदापूर संवर्धन राखीव झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूच्या प्रमाणात देखील घट झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.दरम्यान यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे राजापूर व परिसरातील काही प्रमाणात अन्न पाण्याच्या शोधासाठी भटकंती करण्याची वेळ हरणांवर आली आहे. राजापूर वन विभागाला मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र लाभले असून या परिसरात राजापूर, ममदापुर, सोमठाणजोश, खरवंडी, देवदरी, रेंडाळा, कोळगाव आदी गावांचा समावेश होतो.या आठ गावातील मिळून साडेसात हजार वनक्षेत्र असून यापैकी साडेपाच हजार हेक्टर क्षेत्रावर ममदापुर राखीव हा प्रकल्प तयार केला आहे. यामध्ये राजापूर, ममदापुर, खरवंडी, देवदरी, सोमठाणजोश या पाच गावांचा वन क्षेत्राचा समावेश असून प्रत्येक गावात पशुपक्ष्यांच्या संरक्षणासाठी २०१४ मध्ये पथके निर्माण केली. त्यामुळे हरणांच्या व काळविटांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.राजापूर व परिसरात हरणांची संख्या ही जास्त असल्याने दुष्काळी परिस्थितीचा सामना हरिण व काळविटांना करावा लागत आहे. पाण्याच्या शोधासाठी भटकंती करण्याची वेळ हरणावर आली आहे.आत्तापर्यंत विहिरींना कठडे नसल्यामुळे अनेक हरण दगावल्याच्या घटना या परिसरात घडल्या आहेत. त्यांच्या बजावाकरीता वन संवर्धनाच्या नावाखाली लाखो रुपये खर्च वन विभागाने केले आहे.हरणाना पिण्याच्या पाण्यासाठी त्यांनी ठीक ठिकाणी पानवठे तयार करण्यात आली असून त्यामध्ये उन्हाळ्यात टँकरद्वारे पाणी सोडण्यात येत,े तर राजापूर येथील पानवठ्यात पाणी भरण्यासाठी सौर उर्जेवरील पंप बसविण्यात आल आहे. त्याने दररोज पाणी त्यात भरण्यासाठी बोरवेल घेण्यात आला आहे, व त्यामधून पाणी काढण्यात येते संवर्धन झाल्यानंतर हरणासाठी गवताची लागवड करण्यात आली असून भविष्यात जंगलात निवारा शेड व वेगवेगळ्या जातीच्या गवताची लागवड करण्यात येणार आहे. तसेच शिकार थांबण्यासाठी रस्त्यावर चेक पोस्ट उभारण्यात येणार आहे.सध्या दुष्काळी परिस्थिती जास्त असल्याने अन्न, पाण्याच्या शोधासाठी हरणांना रानोमाळ भटकंती शिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही वन विभागाने ठिकठिकाणी कुंड्या ठेवून पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

सन २०१८ मध्ये राजापूर परिक्षेत्रातील हरिण आणि काळविट यांची संख्या १४२० झाली आहे. येवला तालुक्यातील हरिण आणि काळवीटाची संख्या २४७५ च्या वर पोहचली आहे. अन्न व पाण्याच्या शोधासाठी काही हरिण देखील स्थालांतरित झाले असल्याचा अंदाज वनविभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. राजापूर परिसरात सगळी शेतीची नांगरट झाली असल्याने हरणांना खाण्यासाठी काहीच नाही. त्यामुळे हरणाचे कळप भटकंती करताना दिसत आहेत.