शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हरणांच्या कळपाकडून पिकांची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 18:03 IST

अडीच महिन्यांपासून येवला तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या यातना सहन करत असताना मानोरी बुद्रुक, खडकीमाळ आदी परिसरातील शेतकऱ्यांनी यंदा पाण्याअभावी रब्बी हंगामातील पिकांचे कमी उत्पादन घेतले आहे. दुसरीकडे हरणांचे कळप धुमाकूळ घालत पिकांची नासधुस करत आहे. गेल्या आठ दिवसांपासून वीस हरणांचा कळप मानोरी बुद्रुक परिसरातील शेतशिवारातील पिकांची नासाडी करत असल्याची माहिती शेतकºयांनी दिली आहे.

मानोरी : अडीच महिन्यांपासून येवला तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या यातना सहन करत असताना मानोरी बुद्रुक, खडकीमाळ आदी परिसरातील शेतकऱ्यांनी यंदा पाण्याअभावी रब्बी हंगामातील पिकांचे कमी उत्पादन घेतले आहे. विहिरीतील आणि बोअरवेलमधील पाण्याची साठवण करून गहू, हरभरा, कांदा पिके जगविण्यासाठी धडपड असाताना दुसरीकडे हरणांचे कळप धुमाकूळ घालत पिकांची नासधुस करत आहे. गेल्या आठ दिवसांपासून वीस हरणांचा कळप मानोरी बुद्रुक परिसरातील शेतशिवारातील पिकांची नासाडी करत असल्याची माहिती शेतकºयांनी दिली आहे.येवला तालुक्यातील राजापूर, ममदापूर भागात मोठ्या प्रमाणात हरणांचे वास्तव्य आहे. यातीलच अनेक हरणांचे कळप पाण्याच्या व अन्नाच्या शोधात भटकंती करत आहे. हे वीस हरणांचे कळपदेखील अन्न आणि पाण्याच्या शोधात मानोरी बुद्रुक परिसरात आले असल्याची चर्चा आहे. शेतातील हरभरा, तूर, गवत, हिरवा घास खाण्यासाठी आल्यानंतर मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडून पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे आपली पिके वाचवण्यासाठी काही शेतकरी शेताची राखण करत आहे. अशावेळी शेतात व्यक्तीला बघितल्यानंतर हरणांचा कळप धूम ठोकत शेतातील उभ्या पिकातून पळत सुटल्याने उभी पिके भुईसपाट होऊन नुकसान होत असल्याने शेतकरी धास्तावले आहे. दोन ते तीन दिवसांपासून शेतकरी या हरणांच्या कळपाला हुसकवण्याचा प्रयत्न करत असून, हरणांचे कळप दिवसाऐवजी रात्रीच्या वेळी शेतात धुडगूस घालत आहे. हिरवा घास हरिण खाऊन जात असल्याने घरच्या जनावरांच्या चाºयाचा प्रश्न ऐरणीवर आल्याने शेतकरी चिंतित आहे. सहा ते सात कुत्र्यांची एक टोळी या हरणांच्या कळपाच्या मागावर असून, अनेकदा हरीण पकडण्याचा प्रयत्न कुत्र्यांनी केला आहे. पंधरा दिवसांपूर्वी दोन वानर पाण्याच्या शोधात मानोरीत आले होते. या वानरांनी तब्बल बारा दिवस मानोरीत मुक्काम ठोकून आपली तहान भागवत होती. वनविभागाने हरणांच्या पिण्याच्या पाण्याची अन्नाची सोय करणे गरजेचेअसल्याच ेशेतकर्यांनी सांगितलेआहे. 

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरीagricultureशेती