शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

हरणांच्या कळपाकडून पिकांची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 18:03 IST

अडीच महिन्यांपासून येवला तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या यातना सहन करत असताना मानोरी बुद्रुक, खडकीमाळ आदी परिसरातील शेतकऱ्यांनी यंदा पाण्याअभावी रब्बी हंगामातील पिकांचे कमी उत्पादन घेतले आहे. दुसरीकडे हरणांचे कळप धुमाकूळ घालत पिकांची नासधुस करत आहे. गेल्या आठ दिवसांपासून वीस हरणांचा कळप मानोरी बुद्रुक परिसरातील शेतशिवारातील पिकांची नासाडी करत असल्याची माहिती शेतकºयांनी दिली आहे.

मानोरी : अडीच महिन्यांपासून येवला तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या यातना सहन करत असताना मानोरी बुद्रुक, खडकीमाळ आदी परिसरातील शेतकऱ्यांनी यंदा पाण्याअभावी रब्बी हंगामातील पिकांचे कमी उत्पादन घेतले आहे. विहिरीतील आणि बोअरवेलमधील पाण्याची साठवण करून गहू, हरभरा, कांदा पिके जगविण्यासाठी धडपड असाताना दुसरीकडे हरणांचे कळप धुमाकूळ घालत पिकांची नासधुस करत आहे. गेल्या आठ दिवसांपासून वीस हरणांचा कळप मानोरी बुद्रुक परिसरातील शेतशिवारातील पिकांची नासाडी करत असल्याची माहिती शेतकºयांनी दिली आहे.येवला तालुक्यातील राजापूर, ममदापूर भागात मोठ्या प्रमाणात हरणांचे वास्तव्य आहे. यातीलच अनेक हरणांचे कळप पाण्याच्या व अन्नाच्या शोधात भटकंती करत आहे. हे वीस हरणांचे कळपदेखील अन्न आणि पाण्याच्या शोधात मानोरी बुद्रुक परिसरात आले असल्याची चर्चा आहे. शेतातील हरभरा, तूर, गवत, हिरवा घास खाण्यासाठी आल्यानंतर मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडून पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे आपली पिके वाचवण्यासाठी काही शेतकरी शेताची राखण करत आहे. अशावेळी शेतात व्यक्तीला बघितल्यानंतर हरणांचा कळप धूम ठोकत शेतातील उभ्या पिकातून पळत सुटल्याने उभी पिके भुईसपाट होऊन नुकसान होत असल्याने शेतकरी धास्तावले आहे. दोन ते तीन दिवसांपासून शेतकरी या हरणांच्या कळपाला हुसकवण्याचा प्रयत्न करत असून, हरणांचे कळप दिवसाऐवजी रात्रीच्या वेळी शेतात धुडगूस घालत आहे. हिरवा घास हरिण खाऊन जात असल्याने घरच्या जनावरांच्या चाºयाचा प्रश्न ऐरणीवर आल्याने शेतकरी चिंतित आहे. सहा ते सात कुत्र्यांची एक टोळी या हरणांच्या कळपाच्या मागावर असून, अनेकदा हरीण पकडण्याचा प्रयत्न कुत्र्यांनी केला आहे. पंधरा दिवसांपूर्वी दोन वानर पाण्याच्या शोधात मानोरीत आले होते. या वानरांनी तब्बल बारा दिवस मानोरीत मुक्काम ठोकून आपली तहान भागवत होती. वनविभागाने हरणांच्या पिण्याच्या पाण्याची अन्नाची सोय करणे गरजेचेअसल्याच ेशेतकर्यांनी सांगितलेआहे. 

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरीagricultureशेती