शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर मनपा आयुक्तांची कठोर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 01:09 IST

शहरासाठी असलेले मुबलक पाणी त्यातच होणारा अपव्यय यामुळे महापालिका आयुक्तांनी जलापव्यय करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.

नाशिक : शहरासाठी असलेले मुबलक पाणी त्यातच होणारा अपव्यय यामुळे महापालिका आयुक्तांनी जलापव्यय करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. विशेषत: जिल्हा प्रशासनाने पाणीकपातीबाबतचा अभिप्राय मागविल्यानंतर प्रशासन अधिक सक्रिय झाले आहे.गंगापूर धरणात पुरेसा साठा असून, जलसंपदा विभागानेच दिलेल्या आरक्षणानुसार मुकणे आणि दारणा धरणांतूनदेखील पाणी मिळत आहे. महापालिकेने आरक्षणानुसार पाण्याचा वापर सुरू केला आहे, मात्र जिल्ह्याच्या आणि राज्याच्या अनेक भागात दुष्काळसदृश स्थिती असून, पाण्याच्या टंचाईमुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे शहराच्या काही भागात पाण्याचा दुरुपयोग आणि अपव्ययदेखील होत आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाच्या रडारवर महापालिका असून, दि. १४ मे रोजी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या पत्रात महापालिका कसा वाढीव पाणीपुरवठ्याचा वापर करीत आहे याबाबतचा तपशील देतानाच पाणी काटकसरीने वापरण्यास सांगावे, असे नमूद करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानेदेखील महापालिकेला पत्र पाठविले असून, त्यात पाणी आरक्षण त्याचा वापर आणि पाणी कपातीबाबतचा अभिप्राय मागविण्यात आल्याचे महापालिकेच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने पाण्याची काटकसर करणे सुरू केले आहे. परंतु पाण्याचा अपव्यय करणाºयांवर कठोर कारवाईदेखील केली आहे. त्याचप्रमाणे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनीदेखील तातडीने सर्व संबंधित नागरिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.महापालिकेचा काटकसरीने वापरमहापालिकेच्या वतीने पाणी काटकसरीने वापरले जात असून, मुकणे धरणातून वापर सुरू झाल्यानंतर गंगापूर धरणातून होणारा जलउपसा कमी करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनानेदेखील अगोदरच काटकसर सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :WaterपाणीNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका