शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
2
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
3
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
4
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
5
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
6
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
7
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
8
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
9
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
10
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
11
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
12
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
13
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
14
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
15
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
16
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
17
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
18
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
19
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
20
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
Daily Top 2Weekly Top 5

कमी दरामुळे कांद्याची आठवडे बाजारात होते आहे हातविक्र ी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 19:20 IST

मानोरी : मागील दीड महिन्यापासून येवला तालुक्यातील पूर्व आणि पश्चिम भागात शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसत आहे. आजच्या परिस्थितीत शेतकरी सर्वच बाजूने त्रस्त झालेला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी तसेच शेतमालाला योग्य प्रमाणात भाव मिळत नसल्याने आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात मंदावली आहे.

ठळक मुद्देमजूर वर्गाला देखील काम मिळवणे आवाक्याबाहेर

मानोरी : मागील दीड महिन्यापासून येवला तालुक्यातील पूर्व आणि पश्चिम भागात शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसत आहे. आजच्या परिस्थितीत शेतकरी सर्वच बाजूने त्रस्त झालेला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी तसेच शेतमालाला योग्य प्रमाणात भाव मिळत नसल्याने आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात मंदावली आहे. वर्षभर शेतातील काळ्यामातीत घाम गाळून रब्बी आणि खरीप हंगामातील पिकांची मेहनत घेत असतात. काळी मातीच शेतकºयांच खर सोन असून या काळ्या मातीतच यंदा मेहनतीसाठी पाऊस आणि जमिनीत पाणी नसल्याने मेहनतीऐवजी आपल्याच शेतात काम नसल्याने दुसºयांच्या शेतात काम करण्याची वेळ शेतकºयांवर आली असून मजूर वर्गाला देखील काम मिळवणे आवाक्याबाहेर झाले आहे.सध्या स्थिती लक्षात घेता मानोरी बुद्रुक आणि खडकीमाळ परिसरात काही शेती हिरवीगार तर निम्म्याहून अधिक शेती पाण्याअभावी ओस पडलेली असून बºयाच शेतकºयांनी आपली शेती नांगरून ठेवलेली बघायला मिळत आहे.येथील एका शेतकºयाने आपल्या दीड एकर शेतात पाण्याअभावी केवळ दीड गुंठाच बागायत केलेली आहे. या दिड गुंठ्यात कांद्याचे बी तयार करण्यासाठी डोंगळे लावल्याचे दिसत आहे. विहिरीत पाणी साठा शिल्लक नसल्याने रब्बीच्या हंगामाला यंदा लगाम लागल्या गत आहे.यंदा भर पावसाळ्यात पावसाने पाठ फिरवल्याने खरिपाची ५० टक्के पेक्षा जास्त पिके पाण्याअभावी करपून गेली असल्याने यात उत्पादन खर्च देखील फिटला नसल्याने शेतकरी हवालिदल झाला आहे.खरीप हंगामातील केलेल्या कांदा लागवडीला कवडीमोल भाव मिळत आहे. सध्याची परिस्थिती लक्षात कांद्याचे निर्यात मूल्य शून्य असून देखील कांद्याला १०० रु पयांपासून सरासरी २०० ते २५० ते रु पये प्रति क्विंटल दराने भाव मिळत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकºयांचा उत्पादन खर्च भरून निघणे देखील कठीण झाले आहे.सर्व प्रकारच्या आर्थिक अडचणीत शेतकरी सापडला आहे. अजूनही मोठ्या प्रमाणात मार्च महिन्यात साठवून ठेवलेल्या कांद्याच्या चाळी आजही जशात तशा भरलेल्या असून कांदा सडायला देखील सुरु वात झाली आहे. शासनाने जाहीर केलेल्या हमी भावाची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणार कधी ? अशी अपेक्षा शेतकºयांना लागली आहे. येवला तालुक्यातील शेतकºयांनी विक्र ीसाठी नेलेला कांदा कवडीमोल भावात खरेदी केल्याने कांदा रस्त्यावर ओतून आपला रोष व्यक्त केला होता. तसेच कांद्याची दरवाढ व्हावी, कांद्याला हमी भाव मिळावा यासाठी नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने, मोर्चा, महामार्गावर रास्ता रोको करून देखील सरकार अस्वस्थ का बसलं आहे ? असा सवाल शेतकरी करत आहेत. मानोरी बुद्रुक, खडकीमाळ, देशमाने, मुखेड, शिरसगाव, सत्यगाव, पिंपळगाव लेप आदी परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी आणि परिवहन महामंडळाकडून मोफत बस पास उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.मानोरी बुद्रुक येथील बहुतांश शेतकºयांनी सत्यगाव येथून गेलेल्या नांदूरमध्यमेश्वर कॅनॉल परिसरातून पाईपलाईनद्वारे सुमारे १० किलोमीटर अंतर पारकरून मानोरी परिसरात शेतीसाठी पाणी आणल्याने रब्बी हंगामातील पिकांना या पाण्याचा फायदा होणार आहे. तर निम्म्याहून अधिक शेतकरी हे पाऊस आणि पालखेड डावा कालव्याच्या आवर्तनावर अवलंबून असल्याने सध्या पालखेड डावा कालव्यातून येवला तालुक्यात पिण्याचे पाणी आणि शेती सिंचनासाठी आवर्तन असून वितरिका नंबर २१ आणि २५ पाणी येणार कधी ? अशी अपेक्षा शेतकºयांना लागली असून पालखेड आवर्तनाच्या भरवशावर शेतकºयांचं पुढील पाच ते सात महिन्यांचं भवितव्य अवलंबून आहे. रब्बी हंगामातील हरभरा पिकाला मानोरी बुद्रुकच्या शेतकºयांनी पसंती दिली असून या पिकाला कमी प्रमाणात पाणी लागत असल्याने हरबरा पिकातून उत्पादन नाही निघाले तरी चालेल पण जनावरांचा चारा तर मिळेल या आशेने शेतकरी हरभरा पिकांची लागवड करत आहेत. त्यात पालखेड आवर्तनातून तात्काळ पाणी सोडण्याची मागणी शेतकरी करत आहेत.शेतकºयांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्च फिटणे देखील अवघड झाले आहे. कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने आठवडे बाजारात कांदा हात विक्र ी करण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. त्यामुळे शासनाने कांद्याला २००० रु पये कांद्याला तरी भाव देऊन शेतकºयांना दिलासा द्यावा.- राजेंद्र उत्तम शेळके,शेतकरी.