सूक्ष्म सिंचनातून जगवली दीडशे वृक्ष
By Admin | Updated: August 9, 2014 00:28 IST2014-08-09T00:14:03+5:302014-08-09T00:28:05+5:30
उपक्रम : फांगदर शाळेच्या विद्यार्थ्यांच्या अनोख्या प्रयत्नांना यश

सूक्ष्म सिंचनातून जगवली दीडशे वृक्ष
वसमत : गुटखा व्यवसायाच्या नाड्या समजल्या फेरीवाल्यांविरोधात आजवर कधी कारवाई झालेली नाही. परवाना मिळाल्यासारखे फेरीवाले शहर व तालुक्यात खुलेआम गुटखा वितरित करतात. या फेरीवाल्यांत एवढी बेफिकीरी कशी आली व त्यांच्यावर आजवर कारवाईचा बडगा का उगारला गेला नाही, याचे गौडबंगाल मात्र कायम आहे.
शासनाने गुटखा बंदी केली मात्र वसमत गुटखा तस्करीचे नवे केंद्र बनल्याचे चित्र आहे. ट्रान्सपोर्ट व रेल्वेच्या माध्यमातून कोट्यावधींचा गुटखा वसमतमध्ये दाखल होत आहे. शहराच्या चारही बाजूला असलेल्या फाट्यांवर चोवीस तास तडफदार पोलिस कर्मचाऱ्यांचा ‘जागता’ पहारा असतो; परंतु या फाट्यांवर आजवर एकदाही गुटखा घेऊन येणारा ट्रक, टेंम्पो, कार, जीप सापडलेली नाही. तर मग या फाट्यांवर तपासणी होते तरी कशाची? हा प्रश्न कायम राहत आहे.
शहरात दाखल झालेला गुटखा किराणा दुकान, पानटपरी, जर्दा स्टोअर्स आदीवर पोहोचवण्यासाठी किमान ५० फेरीवाले तैनात आहेत. हे फेरीवाले दुचाकीवर भर बाजारपेठेतून गुटखा वितरणाचे काम करून गुटखा बंदीचे तिनतेरा वाजवत असतात. त्यांना गुटखा बंदी असल्याचे सांगितले तर ते वसमतमध्ये बंदी नाही, असे पानटपरीवाल्यांना सांगून गुटखा विक्रीसाठी प्रोत्साहित करत असल्याचेही वृत्त आहे. आजवर गुटखा वितरित करण्याऱ्या फेरीवाल्याची धरपकड न होणे व पानटपऱ्यांवर विक्री होणारा गुटखा जप्त न होणे हे गुटखा विक्रीस अभय मिळत असल्याचे संकेत आहेत. वसमत येथे डीवायएस पियुष जगताप यांनी दोन ट्रक गुटखा जप्त केला करा; परंतु ज्या ट्रकमधून गुटखा वसमतमध्ये दाखल झाला होता, त्या ट्रकचालक व मालकावर मात्र कारवाई झालेली निदर्शनास आलेली नाही. ज्या ट्रान्सपोर्टने गुटख्याचे ट्रक आले त्या ट्रान्सपोर्टवाल्यांवरही कारवाई नाही. त्यामुळे हा गुटखा कोठून आला होता व कोणाकडे जाणार होता, हा तपास लागणार की नाही, हे सुद्धा एक कोडे बनले आहे. गुटख्यासह पकडलेल्या आरोपींची जामिनावर सुटका झाल्याने आता पुढचा तपास कसा लागतो व गुटख्याचे मुख्य सुत्रधार पकडले जातील का? हा प्रश्नही अनुत्तरीत राहिला आहे. गुटख्यावर छापा पडल्यानंतर मुळापर्यंत तपास जात नाही हे सुद्धा गुटखा व्यवसाय वाढविण्यामागचे प्रमुख कारण समजले जाते. (वार्ताहर)