शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हतगड किल्ला सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 18:39 IST

कळवण तालुक्यातील कनाशी वनपरिक्षेञ कार्यालयात अंतर्गत असलेला हतगड किल्ला सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना वनविभागाने बंद करण्यात आलेला आहे. कनाशी वनपरिक्षेञ कार्यालयाकडून पर्यटनाक्षेत्रावर लाखोचा निधी खर्च पर्यटन क्षेत्राचा विकास केलेला आहे. मात्र हतगड किल्ला बंद असल्याने पर्यटकामधून नाराजी व्यक्त होत असून संमिश्र प्रतिक्रि या उमटत आहेत. हतगड किल्ल्यावर आता शुकशुकाट दिसत आहे.

कनाशी : कळवण तालुक्यातील कनाशी वनपरिक्षेञ कार्यालयात अंतर्गत असलेला हतगड किल्ला सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना वनविभागाने बंद करण्यात आलेला आहे. कनाशी वनपरिक्षेञ कार्यालयाकडून पर्यटनाक्षेत्रावर लाखोचा निधी खर्च पर्यटन क्षेत्राचा विकास केलेला आहे. मात्र हतगड किल्ला बंद असल्याने पर्यटकामधून नाराजी व्यक्त होत असून संमिश्र प्रतिक्रि या उमटत आहेत. हतगड किल्ल्यावर आता शुकशुकाट दिसत आहे.नाशिक-सापुतारा रस्त्यावर सापुतारयापासून फक्त पाच किमी अंतरावर असलेला हतगड किल्ला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी हतगड गाव असून किल्ला अतिशय विलोभनीय आहे. किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या काळातील वास्तू उभ्या आहेत.किल्ल्यावरील वातावरण अत्यंत आल्हाददायक असून पावसाळ्यात तर हिरवेगार गालीचे अंथरलेले वाटतात. किल्ल्यावर सेल्फी नादात दुर्घटना झाली होती.गुजरात राज्यात पावसाळ्यात शैक्षणकि सहलीचे आयोजन केले जाते. सापुतारा येथील विविध पर्यटनस्थळांचा आनंद घेतल्यावर पर्यटक हतगड किल्ला बघण्यासाठी येतात. परंतु किल्ला बंद असल्याने पर्यटक नाराज होऊन परत निघून जातात.कनाशी वनपरिक्षेञ कार्यालयाकडून हतगड किल्ल्याचे संवर्धन व किल्ल्याचा परिसर विकसीत करण्यासाठी लाखोचा खर्च करण्यात आलेला आहे.वनविभागाकडून पर्यटनस्थळी प्रवेश शुल्क निश्चित केले आहे. या रक्कमेतून पर्यटनस्थळांची देखरेख करण्यात येते. मात्र आता नेमकी पर्यटकाच्या माध्यमातून पैसे मिळवण्याच्या वेळ आली असताना वनविभागाने किल्ल्यावर प्रवेश केल्याने देखभाल दुरूस्तीचा खर्च भागवायचा असा प्रश्न वन व्यवस्थापन समतिीला पडला आहे. शिवाय पर्यटकांची एकदा पाठ वळली तर ते पुन्हा किल्ल्याकडे फिरकणार नाही.किल्ल्यावरील प्रवेश बंदी उठवावी अशी मागणी पर्यटकामधून होत आहे.चौकशी विभाग बंदवनविभागाने हतगड किल्ल्यावर प्रवेशाजवळ चौकशी विभाग सुरू करण्यात आला आहे. पण हा विभाग कायम बंद असतो. या खोलीला कायम कुलूप लागलेले असते. त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने येथे पर्यटकांना माहिती देण्यासाठी सुरक्षारक्षक नेताना.

टॅग्स :historyइतिहासFortगड