शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

परतीच्या पावसातून वाचविलेली द्राक्षे युरोपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 10:46 PM

भारतीय शेती पूर्णत: निसर्गावर अवलंबून आहे, मात्र, अलीकडील काळात शेती विरुद्ध निसर्ग असा सामना सुरू आहे. निसर्गाच्या या खेळाविरुद्ध लढा देऊन यश मिळते याचा प्रत्यय येवला तालुक्यातील पुरणगाव येथील प्रयोगशील तरु ण शेतकरी गणेश वरे यांना आला आहे. परतीच्या पावसातून द्राक्षबाग वाचवून त्या द्राक्षांची युरोपला निर्यात करून त्यांनी चांगले उत्पन्न मिळविले आहे.

ठळक मुद्देशुभ वर्तमान : पुरणगाव येथील शेतकऱ्याच्या प्रयोगाला यश; आर्थिक उत्पन्नात वाढ झाल्याने समाधान

जळगाव नेऊर : भारतीय शेती पूर्णत: निसर्गावर अवलंबून आहे, मात्र, अलीकडील काळात शेती विरुद्ध निसर्ग असा सामना सुरू आहे. निसर्गाच्या या खेळाविरुद्ध लढा देऊन यश मिळते याचा प्रत्यय येवला तालुक्यातील पुरणगाव येथील प्रयोगशील तरु ण शेतकरी गणेश वरे यांना आला आहे. परतीच्या पावसातून द्राक्षबाग वाचवून त्या द्राक्षांची युरोपला निर्यात करून त्यांनी चांगले उत्पन्न मिळविले आहे.गणेश वरे यांनी दोन एकर क्षेत्रावर द्राक्ष पीक घेऊन यावर्षी उत्कृष्ट गुणवत्तेचा माल निर्यात योग्य द्राक्ष उत्पादन घेऊन युरोप येथील बाजारपेठेत पाठविला. आपल्या शेतात सतत नवनवीन पिकांची लागवड करून नवीन प्रयोग करणारे शेतकरी म्हणून गणेश वरे यांची ओळख आहे. त्यांनी शेतात कारले, भोपळे, टमाटे, मेथी, कोथिंबीर, मका, कांदे, द्राक्ष अशा विविध पिकांची लागवड करीत निरीक्षण, प्रयोग व अद्ययावत तंत्राच्या माध्यमातून शेती फुलविली आहे.इच्छाशक्तीची जोड असल्यास कुठल्याही परिस्थितीवर मात करता येते. बाजारात मालाला दर कमी असले तरी अधिक उत्पन्न व उत्कृष्ट गुणवत्तेच्या जोरावर चांगला पैसा कमविता येतो. आता यापुढे आधुनिक तंत्र वापरून संधीचा शोध घेऊन योग्य पिकाची निवड करून शेतात वेगवेगळी पिके घेऊन आर्थिक प्रगती करता येईल, असे गणेश वरे सांगतात.

प्रगतिशील शेतकऱ्यांच्या शेतीला भेटी देऊन, मीडियाचा तसेच स्थानिक कृषी सेवा केंद्रांचा सल्ला घेऊन योग्य व कमी खर्चात उत्पादन घेणे शक्य झाले आहे. मेहनत, जिद्द आणि चिकाटीचे फळ नक्कीच मिळते. परतीच्या पावसाने उद्ध्वस्त झालेली बाग मेहनतीने सावरली असून, गुणवत्तेची द्राक्ष युरोपला निर्यात केल्याचे समाधान मिळत आहे.- गणेश वरे, द्राक्ष उत्पादक, पुरणगाव

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेती