शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्षबागा भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 23:24 IST

जिल्ह्यात द्राक्षपंढरी म्हणून परिचित असलेल्या निफाड तालुक्यातील निमगाव वाकडा व पाचोरे खुर्द शिवारात झालेल्या जोरदार वादळाच्या तडाख्यासह अवकाळी पावसामुळे द्राक्षबागा भुईसपाट झाल्या असून, शेतकऱ्यांचे लाखो रुपये डोळ्यांदेखत पाण्यात गेले आहेत.

ठळक मुद्देअवकाळी पावसाचा तडाखा : शेतकऱ्यांचे लाखो रुपये पाण्यात

लासलगाव : जिल्ह्यात द्राक्षपंढरी म्हणून परिचित असलेल्या निफाड तालुक्यातील निमगाव वाकडा व पाचोरे खुर्द शिवारात झालेल्या जोरदार वादळाच्या तडाख्यासह अवकाळी पावसामुळे द्राक्षबागा भुईसपाट झाल्या असून, शेतकऱ्यांचे लाखो रुपये डोळ्यांदेखत पाण्यात गेले आहेत.लासलगाव परिसरातील आसपासच्या गावांमध्ये गुरुवारी (दि. २६) सायंकाळी सुमारे एक तास लहान गारांसह तर शुक्र वारी (दि. २७) पहाटे मेघगर्जनेसह जोरदार वारा-वादळात सुमारे दीड तास अवकाळी पावसाने अक्षरश: झोडपून काढले. त्यामुळे निमगाव वाकडा, पाचोरे, लासलगाव, ब्राह्मणगाव, विंचूर परिसरातील द्राक्षबागा, कांदा, हरभरा व कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकरीवर्गाने केली आहे.गेल्या दोन दिवसांपासून निमगाव वाकडा व लासलगाव शहर परिसरात अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. तसेच वातावरणात मोठ्या प्रमाणात होणाºया बदलामुळे द्राक्ष बागायतदार शेतकरी हतबल झाल्याचे दिसून येत आहे. त्यात निफाड तालुक्यातील निमगाव वाकडा व पाचोरे खुर्द शिवारात गुरुवारी झालेला अवकाळी पाऊस व जोरदार वादळाचा फटका शेतकरी निवृत्ती गायकर यांच्या ११ एकरातील द्राक्षबागेला बसल्याने बागा अक्षरश: कोलमडून पडल्या आहेत.निर्यातक्षम द्राक्ष पिकविणाºया निफाडची ख्याती सातासमुद्रापार पोहचली असताना कोरोनामुळे नाशिक जिल्ह्यातील निर्यातक्षम व दर्जेदार द्राक्ष पिकांना याचा फटका बसला. परिणामी द्राक्ष पिकांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने द्राक्षमालाची उलाढाल पूर्णपणे थांबली आहेच त्यात तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकºयांपुढे दुहेरी संकट ओढवले आहे. शासनाने नुकसान झालेल्या द्राक्षबागेस लवकरात लवकर भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकºयांकडून करण्यात येत आहे.कोरोनामुळे द्राक्षे झाडावरचकोरोनाने जगभर थैमान घातले असताना निर्यातही पूर्णपणे थांबली आहे. त्यामुळे निर्यातक्षम द्राक्षे ही गेल्या काही दिवसांपासून झाडावरच आहेत. कोरोनाचे सावट दूर होईल आणि चार पैसे मिळतील या अपेक्षेवर शेतकरी असतानाच अस्मानी संकटाने शेतकºयांना घेरले आणि उद्ध्वस्त केले. त्यामुळे परिसरातील शेतकरीवर्गाचे अर्थकारण पूर्णत: कोलमडले आहे.निमगाव वाकडा व पाचोरे खुर्द शिवारात झालेला अवकाळी पाऊस व जोरदार वादळी वाºयामुळे माझ्या ११ एकरावरील द्राक्षबागेचे पूर्णपणे नुकसान होत बागा भुईसपाट झाल्या आहेत. त्यामुळे सुमारे ५० ते ६० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाकडून लवकरात लवकर भरपाई मिळाली पाहिजे.- निवृत्ती गायकर,नुकसानग्रस्त द्राक्ष बागायतदार

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी