शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
4
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
5
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
6
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
7
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
8
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
9
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
10
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
12
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
13
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
14
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
15
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
16
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
17
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
18
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
19
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
20
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?

द्राक्षबागा भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 23:24 IST

जिल्ह्यात द्राक्षपंढरी म्हणून परिचित असलेल्या निफाड तालुक्यातील निमगाव वाकडा व पाचोरे खुर्द शिवारात झालेल्या जोरदार वादळाच्या तडाख्यासह अवकाळी पावसामुळे द्राक्षबागा भुईसपाट झाल्या असून, शेतकऱ्यांचे लाखो रुपये डोळ्यांदेखत पाण्यात गेले आहेत.

ठळक मुद्देअवकाळी पावसाचा तडाखा : शेतकऱ्यांचे लाखो रुपये पाण्यात

लासलगाव : जिल्ह्यात द्राक्षपंढरी म्हणून परिचित असलेल्या निफाड तालुक्यातील निमगाव वाकडा व पाचोरे खुर्द शिवारात झालेल्या जोरदार वादळाच्या तडाख्यासह अवकाळी पावसामुळे द्राक्षबागा भुईसपाट झाल्या असून, शेतकऱ्यांचे लाखो रुपये डोळ्यांदेखत पाण्यात गेले आहेत.लासलगाव परिसरातील आसपासच्या गावांमध्ये गुरुवारी (दि. २६) सायंकाळी सुमारे एक तास लहान गारांसह तर शुक्र वारी (दि. २७) पहाटे मेघगर्जनेसह जोरदार वारा-वादळात सुमारे दीड तास अवकाळी पावसाने अक्षरश: झोडपून काढले. त्यामुळे निमगाव वाकडा, पाचोरे, लासलगाव, ब्राह्मणगाव, विंचूर परिसरातील द्राक्षबागा, कांदा, हरभरा व कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकरीवर्गाने केली आहे.गेल्या दोन दिवसांपासून निमगाव वाकडा व लासलगाव शहर परिसरात अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. तसेच वातावरणात मोठ्या प्रमाणात होणाºया बदलामुळे द्राक्ष बागायतदार शेतकरी हतबल झाल्याचे दिसून येत आहे. त्यात निफाड तालुक्यातील निमगाव वाकडा व पाचोरे खुर्द शिवारात गुरुवारी झालेला अवकाळी पाऊस व जोरदार वादळाचा फटका शेतकरी निवृत्ती गायकर यांच्या ११ एकरातील द्राक्षबागेला बसल्याने बागा अक्षरश: कोलमडून पडल्या आहेत.निर्यातक्षम द्राक्ष पिकविणाºया निफाडची ख्याती सातासमुद्रापार पोहचली असताना कोरोनामुळे नाशिक जिल्ह्यातील निर्यातक्षम व दर्जेदार द्राक्ष पिकांना याचा फटका बसला. परिणामी द्राक्ष पिकांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने द्राक्षमालाची उलाढाल पूर्णपणे थांबली आहेच त्यात तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकºयांपुढे दुहेरी संकट ओढवले आहे. शासनाने नुकसान झालेल्या द्राक्षबागेस लवकरात लवकर भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकºयांकडून करण्यात येत आहे.कोरोनामुळे द्राक्षे झाडावरचकोरोनाने जगभर थैमान घातले असताना निर्यातही पूर्णपणे थांबली आहे. त्यामुळे निर्यातक्षम द्राक्षे ही गेल्या काही दिवसांपासून झाडावरच आहेत. कोरोनाचे सावट दूर होईल आणि चार पैसे मिळतील या अपेक्षेवर शेतकरी असतानाच अस्मानी संकटाने शेतकºयांना घेरले आणि उद्ध्वस्त केले. त्यामुळे परिसरातील शेतकरीवर्गाचे अर्थकारण पूर्णत: कोलमडले आहे.निमगाव वाकडा व पाचोरे खुर्द शिवारात झालेला अवकाळी पाऊस व जोरदार वादळी वाºयामुळे माझ्या ११ एकरावरील द्राक्षबागेचे पूर्णपणे नुकसान होत बागा भुईसपाट झाल्या आहेत. त्यामुळे सुमारे ५० ते ६० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाकडून लवकरात लवकर भरपाई मिळाली पाहिजे.- निवृत्ती गायकर,नुकसानग्रस्त द्राक्ष बागायतदार

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी