शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

बळीराजा मेटाकुटीला! दीड एकरावरील द्राक्ष पिकावर घातली कुऱ्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 19:02 IST

निफाड तालुक्यात ऊस, कांदा या नगदी पिकांबरोबरच द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते. दोन वर्षांपासून द्राक्ष कोरोनाच्या महामारीने पिकवता ...

निफाड तालुक्यात ऊस, कांदा या नगदी पिकांबरोबरच द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते. दोन वर्षांपासून द्राक्ष कोरोनाच्या महामारीने पिकवता आले; पण विकता आले नाही. त्यातच व्यापाऱ्यांनी लूट भावात द्राक्ष घेतली, परंतु काहींना गंडा ही घालण्याचे प्रकार घडले. त्यामुळे बळीराजा मेटाकुटीला आला.

कधी विजेचा लपंडाव तर कधी बेमोसमी हवामानाचा फटका, फवारणीचा वाढलेला खर्च त्यामुळे वाढत चाललेला कर्जाचा बोजा सद्याच्या बेमोसमी व अवकाळी पर्जनवृष्टीमुळे शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झाला असून अगोदरच कर्जबाजारी झालेल्या बळीराजाला या पावसामुळे मोठा आर्थिक फटका बसला असून कधीही भरून न निघणारे नुकसान दरवर्षी वाढतच आहेत.

एकीकडे निसर्गाचा लहरीपणा, दुसरीकडे शेतकऱ्यांच्या शेतीपंपांचा खंडित होणारा वीज प्रवाह या दुहेरी संकटात सापडलेल्या दिक्षीच्या ज्ञानेश्वर तांबडे या युवक शेतकऱ्याने यंदा द्राक्ष बागा फेल गेल्याने मोठ्या कष्टाने उभी केलेली दीड एकर द्राक्षबाग कुऱ्हाडीचे घाव घालून उद्ध्वस्त केली.

कमी दाबाच्या क्षेत्रामुळे समुद्रावरून आलेली व सध्या ३-४ दिवसांच्या पावसाळी वातावरणामुळे हवेत वाढलेली आर्द्रता व उत्तर तसेच ईशान्य भारतातून असलेल्या आपल्याकडे येत असलेल्या थंड हवेचा रेटा, सूर्यप्रकाशाचा अभाव, पहाटे खाली सरकत जाणारे जमिनीचे तापमान, वाऱ्याची शांतता ह्या सर्वांच्या एकत्रित परिणामामुळे सध्या धुक्याचे अधिक प्रमाण जाणवते.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीने द्राक्ष पिकवले तर विकता आले नाही त्यात व्यापाऱ्यांनी फसवणुकीची भीती. यंदा बाग फेल आणि अस्मानी संकटात सापडलो कर्जाचा बोजा वाढत चालला त्यामुळे आता द्राक्ष बागच नको म्हणून उद्ध्वस्त केली.

- ज्ञानेश्वर तांबडे, शेतकरी, दिक्षी

 

टॅग्स :FarmerशेतकरीNashikनाशिक