शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

बळीराजा मेटाकुटीला! दीड एकरावरील द्राक्ष पिकावर घातली कुऱ्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 19:02 IST

निफाड तालुक्यात ऊस, कांदा या नगदी पिकांबरोबरच द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते. दोन वर्षांपासून द्राक्ष कोरोनाच्या महामारीने पिकवता ...

निफाड तालुक्यात ऊस, कांदा या नगदी पिकांबरोबरच द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते. दोन वर्षांपासून द्राक्ष कोरोनाच्या महामारीने पिकवता आले; पण विकता आले नाही. त्यातच व्यापाऱ्यांनी लूट भावात द्राक्ष घेतली, परंतु काहींना गंडा ही घालण्याचे प्रकार घडले. त्यामुळे बळीराजा मेटाकुटीला आला.

कधी विजेचा लपंडाव तर कधी बेमोसमी हवामानाचा फटका, फवारणीचा वाढलेला खर्च त्यामुळे वाढत चाललेला कर्जाचा बोजा सद्याच्या बेमोसमी व अवकाळी पर्जनवृष्टीमुळे शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झाला असून अगोदरच कर्जबाजारी झालेल्या बळीराजाला या पावसामुळे मोठा आर्थिक फटका बसला असून कधीही भरून न निघणारे नुकसान दरवर्षी वाढतच आहेत.

एकीकडे निसर्गाचा लहरीपणा, दुसरीकडे शेतकऱ्यांच्या शेतीपंपांचा खंडित होणारा वीज प्रवाह या दुहेरी संकटात सापडलेल्या दिक्षीच्या ज्ञानेश्वर तांबडे या युवक शेतकऱ्याने यंदा द्राक्ष बागा फेल गेल्याने मोठ्या कष्टाने उभी केलेली दीड एकर द्राक्षबाग कुऱ्हाडीचे घाव घालून उद्ध्वस्त केली.

कमी दाबाच्या क्षेत्रामुळे समुद्रावरून आलेली व सध्या ३-४ दिवसांच्या पावसाळी वातावरणामुळे हवेत वाढलेली आर्द्रता व उत्तर तसेच ईशान्य भारतातून असलेल्या आपल्याकडे येत असलेल्या थंड हवेचा रेटा, सूर्यप्रकाशाचा अभाव, पहाटे खाली सरकत जाणारे जमिनीचे तापमान, वाऱ्याची शांतता ह्या सर्वांच्या एकत्रित परिणामामुळे सध्या धुक्याचे अधिक प्रमाण जाणवते.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीने द्राक्ष पिकवले तर विकता आले नाही त्यात व्यापाऱ्यांनी फसवणुकीची भीती. यंदा बाग फेल आणि अस्मानी संकटात सापडलो कर्जाचा बोजा वाढत चालला त्यामुळे आता द्राक्ष बागच नको म्हणून उद्ध्वस्त केली.

- ज्ञानेश्वर तांबडे, शेतकरी, दिक्षी

 

टॅग्स :FarmerशेतकरीNashikनाशिक