शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गारपिटीमुळे द्राक्षबागांना रोगाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 01:25 IST

मान्सून मुंबईच्या वेशीवर येऊन धडकल्याने शहर व जिल्हा परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, त्यामुळे पिकांवर रोगांच्या प्रादुर्भावाची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषत: या ढगाळ वातावरणाचा द्राक्षपिकाला रोगराईचा धोका निर्माण झाला आहे.

नाशिक : मान्सून मुंबईच्या वेशीवर येऊन धडकल्याने शहर व जिल्हा परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, त्यामुळे पिकांवर रोगांच्या प्रादुर्भावाची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषत: या ढगाळ वातावरणाचा द्राक्षपिकाला रोगराईचा धोका निर्माण झाला आहे. याशिवाय कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर पावसापासून कांदा वाचवण्याचे संकट उभे ठाकले असतानाच वादळी पाऊस आणि गारपिटीपासून फळभाज्या व पालेभाज्या वाचविण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.  मान्सून आगमनाच्या काळात होणाºया गारपिटीमुळे पाने फाटणे, हिरव्या काडीवर जखमा होण्याचे प्रकार घडू शकतात. त्यामुळे जिवाणू करपा किंवा मोट्रीओडिप्लोडियासारख्या बुरशा काडीमध्ये वाढण्याची शक्यता असते. द्राक्ष उत्पादक शेतकºयांसमोर अशाप्रकारे करपा नियंत्रणाचे आव्हान असताना, कांदा उत्पादक व फळभाज्या-पालेभाज्या उत्पादक शेतकरीही संकटात आहे. मान्सूनचा पाऊस तोंडावर आलेला असताना भाव वाढण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या कांदा उत्पादक शेतकºयांना कांदा साठविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे, तर फळभाज्या व पालेभाज्यांना गेल्या जानेवारी महिन्यापासून समाधानकारक बाजारभाव न मिळाल्याने शेतकºयांनी संपाचे अस्त्र उपसले असून, त्यामुळे १ व २ जून रोजी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील संपूर्ण व्यवहार कोलमडल्याचे दिसून आले. या संपाच्या झळा अद्यापही कायम असून, सध्या बाजार समितीच्या आवारात काहीसे समाधानकारक भाव मिळत असले तरी ही परिस्थिती कायमस्वरूपी टिकण्यासाठी सरकाने सकारात्मक पाऊले उचलण्याची गरज शेतकºयांमधून व्यक्त होत आहे.संपकाळात तीन कोटींची उलाढाल ठप्पराष्ट्रीय किसान महासंघाने पुकारलेल्या देशव्यापी संपामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १ व २ जून या दोन दिवसांत जवळपास तीन ते साडेतीन कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. त्यामुळे संपाचा अप्रत्यक्षरीत्या शेतकºयांना मोठ्या प्रमाणात फटका सहन करावा लागला. संपामुळे शेतकरी व्यापाºयांसोबतच मालवाहतूकदारांनाही मोठा फटका बसल्याचे दिसून आले. संपाच्या पहिल्या दिवशी बाजारपेठेत केवळ ३० टक्के माल आल्याने मुंबई तथा परराज्यात शेतमाल वाहतूक करणाºया व्यावसायिकांनाही फटका बसला, तर दुस-या दिवशी ३६४ व तिसºया दिवशी ५९२ वाहनांमधून मालाची वाहतूक झाल्याने आता बाजार समिती पूर्वपदावर येत आहे.कांदा साठविण्याच्या कामाला वेगउन्हाळ कांद्याला संपूर्ण हंगामात केवळ तीनशे ते सहाशे रुपयांपर्यंत भाव मिळाला. शेवटच्या टप्प्यात भाव काही प्रमाणात वधारले असले तरी उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकºयांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळेच १ जूनपासूनच्या संपकाळात शेतकºयांनी कांदा बाजारपेठेत आणणे थांबविले असून, कांद्याचे नुकसान टाळण्यासाठी कांदा साठविण्याच्या कामाला वेग आला आहे. परंतु पुरेशी आणि तंत्रशुद्ध यंत्रणा नसल्याने घरात, गोठ्यात जशी जागा उपलब्ध होईल तसा कांदा साठविण्याची नामुष्की शेतकºयांवर आली आहे.कांद्याप्रमाणेच जानेवारीपासून टमाटेही कवडीमोल भावाने विकावा लागला. गेल्या काही दिवसांपासून टमाट्याच्या बाजारभावात काही प्रमाणात वाढ झालेली दिसत असताना, शेतकरी संपामुळे बाजार समितीत येणारा माल थांबवला गेल्याने शेतक ºयांना काही प्रमाणात त्याचा फटका बसला. परंतु बाजार समितीतील आवक व लिलावप्रक्रिया पूर्ववत झाल्याने टमाटा उत्पादकांना येत्या काळात चांगला भाव मिळण्याची शक्यता असली तरी वादळी पाऊस व गारपिटीपासून टमट्याचे संरक्षण करण्याचे आव्हान शेतकºयांसमोर आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी